ETV Bharat / opinion

तथाकथित महाराजांचे स्तोम समाजाला घातक - The stranglehold of the Godmen

author img

By Milind Kumar Sharma

Published : Jul 18, 2024, 4:57 PM IST

नुकतीच हाथरसची घटना मती कुंठीत करुन गेली. तथाकथित महाराजांच्या दर्शनासाठी उडालेली झुंबड अनियंत्रित झाली. त्यातून चेंगराचेंगरी होऊन १२० जणांचा बळी गेला. काही महाराजांच्यामुळे समाजात वाईट गोष्टींना चालना मिळते. तर खऱ्या अर्थानं आध्यात्मिक काम करणाऱ्यांच्यामुळे समाजप्रबोधन होते. त्यातील चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. त्याचवेळी वाईट गोष्टींना लगाम घातला पाहिजे, या संदर्भातील प्रा. मिलिंद कुमार शर्मा यांचा लेख.

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र (File photo)

उत्तर प्रदेश (UP) मधील हाथरस येथे नुकतीच एक दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत एका कॉन्स्टेबलचा महाराज बनलेल्या या स्वयंघोषित महाराजानं आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे 120 लोक मरण पावले. ज्या समाजाने स्वयंघोषित दैवी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला आहे अशा समाजाच्या सामूहिक विवेकबुद्धीला हा एक इशारा आहे. एका बाजूनं विचार करायचा झाल्यास हे प्रशासकीय अपयश होतं. ज्यासाठी जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे आणि जबाबदार व्यक्तींना क्षिक्षा झाली पाहिजे. परंतु देशभरात स्वयंभू महाराजांचा प्रसार पाहता, या मोठ्या समस्येवर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. समाजाने त्यांना देवत्व दिलं, किंवा अलौकिक शक्तींनी संपन्न म्हणून दिलेला उच्च दर्जा अस्वस्थ करणारा आहे. हाथरस येथील भयंकर घटनेला जे लोक बळी पडले, त्यांच्यावर यांच्या संमोहनाचा प्रभाव होता, त्यामुळे ते अंशतः या सगळ्याला जबाबदार आहेत.

या घटनेची माहिती घेतली असता असं लक्षात येतं की, कथित महाराजांच्या चरणांचा स्पर्ष ज्या भूमिला झाला. त्या भूमिला वंदन करण्याच्या हेतूनं धावपळ करताना चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले. आध्यात्मिकतेने भारावलेल्या भारतासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अशा दैवी शक्तींचं अस्तित्व मानणाऱ्या लोकांचे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे काही नवखी गोष्ट नाही. त्याचवेळी आणखी एक गोष्ट अधोरेखित केली पाहिजे, ती म्हणजे काही स्वयंघोषित महाराज दुष्कृत्यात गुंतले आहेत, ज्यामुळे समाजाच्या नैतिक विवेकाला धक्का बसला आहे.

त्याचवेळी ही गोष्टही समजून घ्यायला पाहिजे की, एखाद्याच्या वैचारिक मांडणीमुळे ते आध्यात्मिक चेतना पुन्हा जागृत करतात आणि समाजांना एकत्र आणतात, अशा लोकांचे वाईट चित्रण करणेही टाळले पाहिजे. तसंच देवमाणसाचा मुखवटा घातलेले अनेक दांभिक लोक धर्मांधतेचे समर्थन करतात, जे मानवी चेतना आंधळी करतात आणि त्याला रूढीवादी विचारांची जोड देतात. त्यातून बौद्धिक आणि आध्यात्मिक वाढीस अडथळा निर्माण होतो.

'गॉडमन'चा प्रभाव जनमानसावर इतका असतो की, त्यांना पृथ्वीवरील मसिहा म्हणून लोक डोक्यावर घेतात. मात्र ते लोकांच्या मानसिक क्षमतांना क्षीण करतात आणि गंभीर विचार शक्तीला बाधा आणतात. मात्र आर्थिक आणि सामाजिक स्तराच्या उतरंडीतील सगळ्यात तळाशी असलेले लोक त्यांच्या चरणी मोक्ष शोधतात यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. जीवनातील दु:खापासून मुक्तीचे मार्गदर्शक म्हणून, हे महाराज आपल्या समाजातील एका मोठ्या वर्गाच्या शारीरिक आणि मानसिक भावनेवर जबरदस्त वर्चस्व गाजवतात.

हाथरस येथे घडलेल्या घटनेचा दोष तथाकथित महाराजांना द्यायचा का?

स्वामी विवेकानंद आणि श्री अरबिंदो यांच्यासारख्या आध्यात्मिकदृष्ट्या जागरूक आणि बौद्धिकदृष्ट्या जागृत व्यक्तिमत्त्वांपासून अलिकडचे हे स्वयंघोषित महाराज पूर्णपणे भिन्न आहेत. मनाचे प्रबोधन करणे आणि अज्ञानाचा अंधार दूर करणे वेगळे आणि भोळ्या भक्तीचा गैरफायदा घेणे वेगळे हे लोकांना कळले पाहिजे. खरे महाराज त्यांच्या शिकवणींचे सामाजिक परिणाम लक्षात घेतात आणि "अंधश्रद्धा" आणि कट्टरतेवर वार करुन "कारण" आणि "तर्कसंगतता" याला प्रोत्साहन देतात.

आपल्या सामाजिक जडणघडणीतील नैतिक अध:पतनाला आळा घालण्यासाठी समाजाने या विदारक वास्तवाशी जुळवून घेतले पाहिजे. शिवाय, अंधश्रद्धा आणि आंधळेपणापेक्षा लोकांमध्ये बौद्धिक तर्कसंगत गोष्टी जोपासणे आवश्यक आहे. त्यांनी जीवनातील असंख्य संघर्ष आणि वेदना कमी करण्यासाठी बाह्य मदतीवर अवलंबून राहण्यापेक्षा साधकाची आध्यात्मिक स्वायत्तता सक्षम आणि प्रोत्साहित केली पाहिजे.

अलिकडच्या काळात लोकांचे जीवनमान सुधारण्यापेक्षा भोंदू महाराजांच्यामुळे समाजाचे जास्त नुकसान झाले आहे. अशा व्यक्तींचे उपहासात्मक स्वरूप उघडकीस आणणे आणि त्यांच्या गैरकृत्यांसाठी त्यांना जबाबदार धरणे समाजाच्या सामूहिक हिताचे आहे. समाजातील असुरक्षित घटकांवर धर्मगुरुंचा गूढ प्रभाव रोखण्यासाठी सामाजिक आणि नैतिक शिकवण समाजापर्यंत पोहोचून तळागाळातील संवेदनशीलता जपणे ही काळाची गरज आहे.

समाजाचा नैतिक पाया मजबूत करण्याची वेळ आली आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या शब्दांत समाज आपली जाणीव अशा स्तरावर उंचावू शकेल की, “मन निर्भय आहे आणि डोके उंचावर आहे… आणि देश स्वातंत्र्याच्या स्वर्गात आहे”. समाजाचा नैतिक पाया मजबूत करण्याची वेळ आली आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या शब्दांत समाज आपली चेतना अशा स्तरावर उंचावू शकेल की, "मन निर्भय आहे आणि डोके उंच आहे... आणि स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गात" देश जागृत होवो.

(टीप - मिलिंद कुमार शर्मा हे प्रोफेसर आहेत आणि एमबीएम विद्यापीठ, जोधपूरच्या उत्पादन आणि औद्योगिक अभियांत्रिकी विभागात शिकवतात. या लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)

उत्तर प्रदेश (UP) मधील हाथरस येथे नुकतीच एक दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत एका कॉन्स्टेबलचा महाराज बनलेल्या या स्वयंघोषित महाराजानं आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे 120 लोक मरण पावले. ज्या समाजाने स्वयंघोषित दैवी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला आहे अशा समाजाच्या सामूहिक विवेकबुद्धीला हा एक इशारा आहे. एका बाजूनं विचार करायचा झाल्यास हे प्रशासकीय अपयश होतं. ज्यासाठी जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे आणि जबाबदार व्यक्तींना क्षिक्षा झाली पाहिजे. परंतु देशभरात स्वयंभू महाराजांचा प्रसार पाहता, या मोठ्या समस्येवर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. समाजाने त्यांना देवत्व दिलं, किंवा अलौकिक शक्तींनी संपन्न म्हणून दिलेला उच्च दर्जा अस्वस्थ करणारा आहे. हाथरस येथील भयंकर घटनेला जे लोक बळी पडले, त्यांच्यावर यांच्या संमोहनाचा प्रभाव होता, त्यामुळे ते अंशतः या सगळ्याला जबाबदार आहेत.

या घटनेची माहिती घेतली असता असं लक्षात येतं की, कथित महाराजांच्या चरणांचा स्पर्ष ज्या भूमिला झाला. त्या भूमिला वंदन करण्याच्या हेतूनं धावपळ करताना चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले. आध्यात्मिकतेने भारावलेल्या भारतासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अशा दैवी शक्तींचं अस्तित्व मानणाऱ्या लोकांचे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे काही नवखी गोष्ट नाही. त्याचवेळी आणखी एक गोष्ट अधोरेखित केली पाहिजे, ती म्हणजे काही स्वयंघोषित महाराज दुष्कृत्यात गुंतले आहेत, ज्यामुळे समाजाच्या नैतिक विवेकाला धक्का बसला आहे.

त्याचवेळी ही गोष्टही समजून घ्यायला पाहिजे की, एखाद्याच्या वैचारिक मांडणीमुळे ते आध्यात्मिक चेतना पुन्हा जागृत करतात आणि समाजांना एकत्र आणतात, अशा लोकांचे वाईट चित्रण करणेही टाळले पाहिजे. तसंच देवमाणसाचा मुखवटा घातलेले अनेक दांभिक लोक धर्मांधतेचे समर्थन करतात, जे मानवी चेतना आंधळी करतात आणि त्याला रूढीवादी विचारांची जोड देतात. त्यातून बौद्धिक आणि आध्यात्मिक वाढीस अडथळा निर्माण होतो.

'गॉडमन'चा प्रभाव जनमानसावर इतका असतो की, त्यांना पृथ्वीवरील मसिहा म्हणून लोक डोक्यावर घेतात. मात्र ते लोकांच्या मानसिक क्षमतांना क्षीण करतात आणि गंभीर विचार शक्तीला बाधा आणतात. मात्र आर्थिक आणि सामाजिक स्तराच्या उतरंडीतील सगळ्यात तळाशी असलेले लोक त्यांच्या चरणी मोक्ष शोधतात यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. जीवनातील दु:खापासून मुक्तीचे मार्गदर्शक म्हणून, हे महाराज आपल्या समाजातील एका मोठ्या वर्गाच्या शारीरिक आणि मानसिक भावनेवर जबरदस्त वर्चस्व गाजवतात.

हाथरस येथे घडलेल्या घटनेचा दोष तथाकथित महाराजांना द्यायचा का?

स्वामी विवेकानंद आणि श्री अरबिंदो यांच्यासारख्या आध्यात्मिकदृष्ट्या जागरूक आणि बौद्धिकदृष्ट्या जागृत व्यक्तिमत्त्वांपासून अलिकडचे हे स्वयंघोषित महाराज पूर्णपणे भिन्न आहेत. मनाचे प्रबोधन करणे आणि अज्ञानाचा अंधार दूर करणे वेगळे आणि भोळ्या भक्तीचा गैरफायदा घेणे वेगळे हे लोकांना कळले पाहिजे. खरे महाराज त्यांच्या शिकवणींचे सामाजिक परिणाम लक्षात घेतात आणि "अंधश्रद्धा" आणि कट्टरतेवर वार करुन "कारण" आणि "तर्कसंगतता" याला प्रोत्साहन देतात.

आपल्या सामाजिक जडणघडणीतील नैतिक अध:पतनाला आळा घालण्यासाठी समाजाने या विदारक वास्तवाशी जुळवून घेतले पाहिजे. शिवाय, अंधश्रद्धा आणि आंधळेपणापेक्षा लोकांमध्ये बौद्धिक तर्कसंगत गोष्टी जोपासणे आवश्यक आहे. त्यांनी जीवनातील असंख्य संघर्ष आणि वेदना कमी करण्यासाठी बाह्य मदतीवर अवलंबून राहण्यापेक्षा साधकाची आध्यात्मिक स्वायत्तता सक्षम आणि प्रोत्साहित केली पाहिजे.

अलिकडच्या काळात लोकांचे जीवनमान सुधारण्यापेक्षा भोंदू महाराजांच्यामुळे समाजाचे जास्त नुकसान झाले आहे. अशा व्यक्तींचे उपहासात्मक स्वरूप उघडकीस आणणे आणि त्यांच्या गैरकृत्यांसाठी त्यांना जबाबदार धरणे समाजाच्या सामूहिक हिताचे आहे. समाजातील असुरक्षित घटकांवर धर्मगुरुंचा गूढ प्रभाव रोखण्यासाठी सामाजिक आणि नैतिक शिकवण समाजापर्यंत पोहोचून तळागाळातील संवेदनशीलता जपणे ही काळाची गरज आहे.

समाजाचा नैतिक पाया मजबूत करण्याची वेळ आली आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या शब्दांत समाज आपली जाणीव अशा स्तरावर उंचावू शकेल की, “मन निर्भय आहे आणि डोके उंचावर आहे… आणि देश स्वातंत्र्याच्या स्वर्गात आहे”. समाजाचा नैतिक पाया मजबूत करण्याची वेळ आली आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या शब्दांत समाज आपली चेतना अशा स्तरावर उंचावू शकेल की, "मन निर्भय आहे आणि डोके उंच आहे... आणि स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गात" देश जागृत होवो.

(टीप - मिलिंद कुमार शर्मा हे प्रोफेसर आहेत आणि एमबीएम विद्यापीठ, जोधपूरच्या उत्पादन आणि औद्योगिक अभियांत्रिकी विभागात शिकवतात. या लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.