ETV Bharat / entertainment

'नातीगोती' नाटकापासूनचा अभिनय प्रवास; अतुल परचुरेंची थक्क करणारी कारकीर्द

नातीगोती नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. तसेच नातीगोती नाटकात अतुल परचुरे यांनी गतिमंद मुलाची भूमिका साकारली होती.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 3 hours ago

atul parchure passed away
अतुल परचुरे यांचं निधन (Photo credit- instagram)

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालंय. त्यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात त्यांनी अजरामर भूमिका केल्यात. विनोदी किंवा गंभीर भूमिका असो अतुल परचुरे तितक्याच ताकदीनं त्या भूमिकेला न्याय द्यायचे. त्यामुळेच प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याबद्दल एक विशेष स्थान आहे. त्यांचा झी मराठी नाट्य गौरव 2024 च्या पुरस्कारानंही सन्मान करण्यात आला होता. नातीगोती नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली. नातीगोती नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. तसेच नातीगोती नाटकात स्वाती चिटणीस यांनी अतुल परचुरेंच्या आईची भूमिका साकारली होती. त्या नाटकात अतुल परचुरे यांनी गतिमंद मुलाची भूमिका साकारली होती. नातीगोती नाटकाचे त्यांनी अनेक प्रयोग केले होते.

व्यक्ती आणि वल्ली नाटकात भूमिका: खरं तर त्यांनी व्यक्ती आणि वल्ली या नाटकात पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारली होती. ‘माझा होशील ना’ या मालिकेतील ‘जेडी’ या खलनायकाची त्यांची भूमिकाही प्रचंड गाजली होती. खरोखर प्रेक्षकांना जेडीचा राग येईल इतकी चोख भूमिका अभिनेता अतुल परचुरेंनी निभावली होती. विशेष म्हणजे मराठीतच नव्हे, तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कर्करोगासारखा गंभीर आजार झाला होता. त्यावरही मात करत ते जिद्दीने उभे राहिलेत. 'खरं खरं सांग' या नाटकाच्या निमित्तानं त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं होतं.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांबद्दल वादग्रस्त विधान: अतुल परचुरे यांनी छोट्या पडद्यावरील एका विनोदी कार्यक्रमामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. अखेर अतुल परचुरेंना या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागावी लागली होती. 'पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेली बापू काणे ही व्यक्तिरेखा सादर करणे हाच माझा त्यामागील उद्देश होता. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पुण्यशोक अहिल्याबाई होळकर या आम्हाला वंदनीय आहेत. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो, असंही त्यावेळी अतुल परचुरे म्हणाले होते.'

पोटात ट्युमर अन् कॅन्सरचं निदान: अतुल परचुरे त्यांच्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात पर्यटनासाठी गेले असता सुट्टीदरम्यान त्यांना कमी भूक लागत होती. त्यामुळे काही तरी गडबड असल्याचं त्यांना जाणवल्यानंतर उपाय म्हणून त्यांनी काही औषधेही घेतली होती, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नव्हता. भारतात परतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी अल्ट्रासोनोग्राफी केली. त्यावेळी त्यांच्या पोटात ट्यूमर सापडला आणि त्यात कॅन्सर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. यातून ते बरे होतील, असा विश्वास डॉक्टरांनी त्यांना दिला. परंतु उपचारादरम्यान त्यांची तब्येत आणखी बिघडत गेली आणि शस्त्रक्रियेलाही विलंब झाला. कॅन्सर झाल्याचे कळल्यानंतर पहिल्यांदा घेतलेले उपचारच चुकले होते. त्यांच्यावर योग्य उपचार झाले नव्हते अन् अडचणीत वाढ झाली.

...अन् अतुल परचुरे बरे झाले: चुकीच्या उपचाराने त्यांची प्रकृती बिघडत गेली. त्यांना चालताना, बोलताना त्रास होत असताना डॉक्टरांनी त्यांना दीड महिने प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रिया करण्यात अनेक अडथळे असल्याचे व त्यातून परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा योग्य उपचारांना सुरुवात झाली आणि त्यांनी केमोथेरपी घेतली. या काळात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांना साथ दिली. योग्य उपचारानंतर अतुल परचुरे आता पूर्ण पणे बरे झाले होते. अद्यापही त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी ते पूर्ण बरे असल्याचे सांगितले जात होते. कॅन्सरमुळे द कपिल शर्मा शोमध्ये परफॉर्म करू शकले नाहीत., याबद्दलही अतुल परचुरेंना वाईट वाटत होते. कपिलची शोमधील पत्नी सुमोनाच्या वडिलांची भूमिका त्यांना करायची होती. परंतु तब्येतीच्या कारणास्तव त्यांना हा शो करता आला नाही. त्यांच्या विदेश दौऱ्यातही ते सहभागी होऊ शकले नाहीत. परंतु आता त्यांचं निधन झाल्याच्या बातमीनं सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचाः

हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं अकाली निधन

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालंय. त्यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात त्यांनी अजरामर भूमिका केल्यात. विनोदी किंवा गंभीर भूमिका असो अतुल परचुरे तितक्याच ताकदीनं त्या भूमिकेला न्याय द्यायचे. त्यामुळेच प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याबद्दल एक विशेष स्थान आहे. त्यांचा झी मराठी नाट्य गौरव 2024 च्या पुरस्कारानंही सन्मान करण्यात आला होता. नातीगोती नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली. नातीगोती नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. तसेच नातीगोती नाटकात स्वाती चिटणीस यांनी अतुल परचुरेंच्या आईची भूमिका साकारली होती. त्या नाटकात अतुल परचुरे यांनी गतिमंद मुलाची भूमिका साकारली होती. नातीगोती नाटकाचे त्यांनी अनेक प्रयोग केले होते.

व्यक्ती आणि वल्ली नाटकात भूमिका: खरं तर त्यांनी व्यक्ती आणि वल्ली या नाटकात पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारली होती. ‘माझा होशील ना’ या मालिकेतील ‘जेडी’ या खलनायकाची त्यांची भूमिकाही प्रचंड गाजली होती. खरोखर प्रेक्षकांना जेडीचा राग येईल इतकी चोख भूमिका अभिनेता अतुल परचुरेंनी निभावली होती. विशेष म्हणजे मराठीतच नव्हे, तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कर्करोगासारखा गंभीर आजार झाला होता. त्यावरही मात करत ते जिद्दीने उभे राहिलेत. 'खरं खरं सांग' या नाटकाच्या निमित्तानं त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं होतं.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांबद्दल वादग्रस्त विधान: अतुल परचुरे यांनी छोट्या पडद्यावरील एका विनोदी कार्यक्रमामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. अखेर अतुल परचुरेंना या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागावी लागली होती. 'पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेली बापू काणे ही व्यक्तिरेखा सादर करणे हाच माझा त्यामागील उद्देश होता. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पुण्यशोक अहिल्याबाई होळकर या आम्हाला वंदनीय आहेत. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो, असंही त्यावेळी अतुल परचुरे म्हणाले होते.'

पोटात ट्युमर अन् कॅन्सरचं निदान: अतुल परचुरे त्यांच्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात पर्यटनासाठी गेले असता सुट्टीदरम्यान त्यांना कमी भूक लागत होती. त्यामुळे काही तरी गडबड असल्याचं त्यांना जाणवल्यानंतर उपाय म्हणून त्यांनी काही औषधेही घेतली होती, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नव्हता. भारतात परतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी अल्ट्रासोनोग्राफी केली. त्यावेळी त्यांच्या पोटात ट्यूमर सापडला आणि त्यात कॅन्सर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. यातून ते बरे होतील, असा विश्वास डॉक्टरांनी त्यांना दिला. परंतु उपचारादरम्यान त्यांची तब्येत आणखी बिघडत गेली आणि शस्त्रक्रियेलाही विलंब झाला. कॅन्सर झाल्याचे कळल्यानंतर पहिल्यांदा घेतलेले उपचारच चुकले होते. त्यांच्यावर योग्य उपचार झाले नव्हते अन् अडचणीत वाढ झाली.

...अन् अतुल परचुरे बरे झाले: चुकीच्या उपचाराने त्यांची प्रकृती बिघडत गेली. त्यांना चालताना, बोलताना त्रास होत असताना डॉक्टरांनी त्यांना दीड महिने प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रिया करण्यात अनेक अडथळे असल्याचे व त्यातून परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा योग्य उपचारांना सुरुवात झाली आणि त्यांनी केमोथेरपी घेतली. या काळात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांना साथ दिली. योग्य उपचारानंतर अतुल परचुरे आता पूर्ण पणे बरे झाले होते. अद्यापही त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी ते पूर्ण बरे असल्याचे सांगितले जात होते. कॅन्सरमुळे द कपिल शर्मा शोमध्ये परफॉर्म करू शकले नाहीत., याबद्दलही अतुल परचुरेंना वाईट वाटत होते. कपिलची शोमधील पत्नी सुमोनाच्या वडिलांची भूमिका त्यांना करायची होती. परंतु तब्येतीच्या कारणास्तव त्यांना हा शो करता आला नाही. त्यांच्या विदेश दौऱ्यातही ते सहभागी होऊ शकले नाहीत. परंतु आता त्यांचं निधन झाल्याच्या बातमीनं सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचाः

हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं अकाली निधन

Last Updated : 3 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.