ETV Bharat / bharat

अवकाश संशोधन क्षेत्रात करिअरच्या संधी काय? वाचा भारताचे 'मून मॅन' डॉ. मैलास्वामी अन्नादुराई यांची मुलाखत

Space Science as Career : भारताचे मून मॅन डॉ. मैलास्वामी अन्नादुराई यांनी ईटीव्ही भारतचे वरिष्ठ पत्रकार शंकरनारायणन सुदलाई यांना एक विशेष मुलाखत दिली आहे. त्यात आन्नादुराई यांनी अंतराळ क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव तसंच या क्षेत्रातील तरुणांसाठी करिअरच्या उत्तम संधीबाबत भाष्य केलंय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 9:00 AM IST

Space Science as Career
Space Science as Career

चेन्नई Space Science as Career : या शतकाच्या उत्तरार्धापूर्वी एक व्यावसायिक क्षेत्र म्हणून अंतराळ संशोधन क्षेत्राकडं फारसं कुणाचं लक्ष नव्हतं. एका बाजूला, तारे, उपग्रह इस्रो तसंच नासासाठी वैज्ञानिक विषय होते. तर, दुसरीकडं दावेदारांसाठी केवळ भाषणाचे आकडे होते. मात्र,अलीकडच्या काळात, अंतराळ संशोधन, विज्ञानातील प्रगती देशांच्या अंतराळ संस्थेचा अंतराळ संशोधनाकडं पाहण्याचा दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला आहे. अलीकडंच भारतानं देखील अंतराळ संशोधनाच्या काही क्षेत्रांमध्ये 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी दिली आहे. ज्यामुळं संभाव्य गुंतवणूकदारांना अवकाशातील संशोधनासाठी भारतीय कंपन्या आकर्षित करणार आहे.

डॉ. मैलास्वामी अन्नादुराई यांची मुलाखत :

प्रश्न : केंद्र सरकारनं अवकाश संशोधनाच्या काही क्षेत्रांमध्ये 100 टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. यामुळं उद्योगात कोणते सकारात्मक बदल होतील असं तुम्हाला वाटतं?

डॉ. अण्णादुराई : याचं उत्तर अलीकडच्या उदाहरणांवरून तुम्हाला मिळू शकतं. जागतिक कोविड महामारीच्या काळातही एखाद्या क्षेत्रात प्रगती झाली असेल ती एरोस्पेस उद्योगात झाली आहे. गेल्या 65 वर्षांत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांपैकी 40 टक्क्यांहून अधिक उपग्रह हे महामारीनंतरच्या तीन वर्षांत प्रक्षेपित करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे इलॉन मस्कच्या स्पेस एक्स आणि वन वेबसारख्या खासगी अवकाश कंपन्यांनी 90 टक्क्यांहून अधिक उपग्रह पाठवले आहेत. भारताचा विचार करता, अवकाश क्षेत्रात सरकारनं विविध उपक्रम चालू केले आहेत. यात आम्ही चंद्र आणि मंगळावर यान पाठवत आहोत. आम्हाला आवश्यक असलेले अनेक उपग्रह आम्ही तयार केले आहेत. माझा विश्वास आहे की परदेशी गुंतवणुकीमुळं अंतराळ संशोधन क्षेत्रात प्रगती होईल. विमानं एकेकाळी केवळ हवाई दलासाठी होती. परंतु नंतर ती सामान्य लोकांसाठी वाहतुकीचं साधन बनली. जवळपास अशीच परिस्थिती अवकाश क्षेत्रात विकसित होण्याची शक्यता आहे. इतर देश यामध्ये आघाडीवर असताना भारताला मागं ठेवता येणार नाही. त्यांनी एक बदल घडवून आणला आहे. जेणेकरून खाजगी क्षेत्र देखील सरकारच्या मालकीच्या अवकाश उपक्रमात योगदान देऊ शकेल.

प्रश्न : अवकाश संशोधन केवळ विज्ञानापुरते मर्यादित नाही. लष्करी उपग्रहांच्या वापराचा विचार करताना राष्ट्रीय सुरक्षेचा समावेश आहे. या वातावरणात सरकारी हस्तक्षेपाशिवाय परकीय गुंतवणुकीला परवानगी देणं व्यवहार्य आहे, असं तुम्हाला वाटते का?

डॉ. अण्णादुराई : हे आव्हानात्मक असून जवळपास सेल फोन्ससारखंच आहे. सुरक्षा आणि वैयक्तिक वापरासाठी उपयुक्त असणाऱ्या ड्रोनचाही यात समावेश आहे. सरकारनं या क्षेत्राचं नियमन करण्याची गरज आहे. जेव्हा भरपूर उत्पादन करण्याची गरज असते, तेव्हा नवीन रणनीती आणि तंत्रे यावी लागतात. सध्याच्या युगात सर्व गुंतवणूक आणि विकास केवळ सरकार करू शकत नाही, खासगी कंपन्याचं देखील योगदान आवश्यक आहे.

प्रश्न : अवकाश क्षेत्रात भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता आहे. त्या बदल्यात करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्यास, विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे कसं जायचं? त्यात त्यांचं करिअर घडवण्यासाठी त्यांनी काय अभ्यास करावा?

डॉ. अन्नादुराई : बी. टेक मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स प्रोग्रामसाठी या क्षेत्रात उत्तम संधी आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये एरोनॉटिकल आणि एरोस्पेस सारखे अभ्यासक्रम निवडता येतात. जर तुम्हाला इस्रोच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तिरुवनंतपुरम येथे अभ्यास करण्याची संधी मिळाली, तर तुमच्यासमोर उज्ज्वल भविष्य आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सरकारी किंवा खाजगी अवकाश क्षेत्रात नोकरी मिळू शकते. त्यात त्यांनी चांगली कामगिरी केल्यास त्यांना नासा अकादमीमध्ये शिक्षण घेण्याची संधी निर्माण होते.

प्रश्न : मानवाला अवकाशात पाठवण्यासाठी गगनयान प्रकल्पाची स्थिती काय आहे?

डॉ. अन्नादुराई : गगनयान प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात क्रायोजेनिक मशीन वापरण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या चांद्रयान-३ कार्यक्रमातही त्याच्या चाचण्या झाल्या. प्रक्षेपण वाहन ट्रान्झिटमध्ये असताना बाह्य तापमानातील बदल किंवा इंधनातील किरकोळ बदलांमुळे मिशनमध्ये व्यत्यय येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसंच यात प्रवास करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. क्रायोजेनिकनं 30 पेक्षा जास्त प्रकारच्या चाचण्या केल्या आहेत. चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात, क्रायोजेनिक मशीन मानवांना वाहून नेण्यासाठी पात्र ठरलं आहे. या वर्षाच्या अखेरीस, व्योमित्र हा मानवरहित यंत्रमानव अंतराळ यानावर चाचणीसाठी पाठवला जाईल. त्यानंतर निकालाच्या आधारे लोक पाठविण्याचा प्रयत्न केला जाईल. अवकाशयानात हवेचा दाब, तापमान इत्यादींचा रोबोटवर काय परिणाम होतो? त्याऐवजी, प्रवास करताना मानवांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, यासारख्या प्रश्नांची उत्तरे हा प्रयोग देऊ शकतो.

प्रश्न : अंतराळ उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल तुमचं मत काय?

डॉ. अन्नादुराई : कॉम्प्युटर आणि सेल फोन सारखं तंत्रज्ञान प्रथम अंतराळ उद्योगात आलं. नंतरच ते व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य झालं. मंगळयान प्रक्षेपित झाल्यापासून AI ISRO सोबत उत्तम काम करत आहे. मंगळयान मंगळ ग्रहाजवळ आल्यावर, त्यावरून पाठवलेली माहिती मिळण्यास आपल्याला 20 मिनिटे लागू शकतात. त्याला आम्ही प्रतिसाद दिल्यास यास 20 मिनिटे देखली लागतील. हे सुमारे 40-मिनिटांचं अंतर आहे. या वेळी, पृथ्वीवरील आदेशांचं पालन करणं अशक्य आहे. त्यावेळी त्याला मंगळ गृहाचं गुरुत्वाकर्षण जाणवेल. त्यामुळं कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यात महत्वाचं योगदान देईल. त्याचप्रमाणे चांद्रयान प्रकल्पात विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्वायत्तपणे चालवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला. आत्तापर्यंत, सर्व लहान यंत्रे योग्यरित्या काम करत आहेत याची खात्री करण्यासाठी मानव उपग्रहांचे निरीक्षण करत आहेत. यासाठी आम्ही सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहोत. क्रायोजेनिक्स सारख्या उपकरणांची चाचणी करताना उपलब्ध डेटाच्या आधारे निर्णय घेण्यासाठी AI चा वापर केला जातो. कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहांच्या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी संगणकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता देखील समाविष्ट करण्यात आली आहे.

प्रश्न : ग्लोबल वार्मिंग एक मोठी समस्या म्हणून उदयास येत आहे. सूर्याचं अन्वेषण करण्यासाठी आदित्य-L1 मोहिमेचे परिणाम आम्हाला हवामानातील बदलांना तोंड देण्यास मदत करतील का?

डॉ. अन्नादुराई : आदित्य L1 पृथ्वीवरील बदलाऐवजी अंतराळातील बदलाकडं जास्त लक्ष देतो. अंतराळातील उपग्रह तापमानवाढीसाठी अधिक असुरक्षित असतात. नुकतंच लाँच झालेले इनसॅट 3डीएस पृथ्वीच्या तापमानाचं परीक्षण करतं. काही आठवड्यांत, 1.5 अब्ज डॉलर्सचा NISR (Nasa Isro Synthetic Aperture Radar) उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. हा उपग्रह इस्रो आणि नासा यांनी संयुक्तपणं तयार केला आहे. पृथ्वीच्या हवामान स्थितीची दर 14 दिवसांनी तुलना केली जाते. मला वाटतं की यामुळं जगातील देशांना जागतिक तापमानवाढ किती गंभीर आहे, हे समजू शकेल. केवळ हिमालय, अंटार्क्टिकाच नाही तर जंगलांचं तापमान देखील नोंदवलं जाऊ शकतं आणि तुलना केली जाऊ शकते.

हे वाचा :

  1. इस्रोची सौर मोहीम फत्ते! आदित्य अंतराळयान L1 बिंदूवर दाखल, जगाला होणार फायदा
  2. ISRO Aditya L1 : इस्रोच्या आदित्य L1 नं जवळून अनुभवल्या सूर्याच्या झळा, शेअर केला पहिला मिशन डाटा
  3. Aditya L1 mission : आदित्य L1ची चौथी कक्षा यशस्वीरित्या पूर्ण; इस्रोनं दिली माहिती

चेन्नई Space Science as Career : या शतकाच्या उत्तरार्धापूर्वी एक व्यावसायिक क्षेत्र म्हणून अंतराळ संशोधन क्षेत्राकडं फारसं कुणाचं लक्ष नव्हतं. एका बाजूला, तारे, उपग्रह इस्रो तसंच नासासाठी वैज्ञानिक विषय होते. तर, दुसरीकडं दावेदारांसाठी केवळ भाषणाचे आकडे होते. मात्र,अलीकडच्या काळात, अंतराळ संशोधन, विज्ञानातील प्रगती देशांच्या अंतराळ संस्थेचा अंतराळ संशोधनाकडं पाहण्याचा दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला आहे. अलीकडंच भारतानं देखील अंतराळ संशोधनाच्या काही क्षेत्रांमध्ये 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी दिली आहे. ज्यामुळं संभाव्य गुंतवणूकदारांना अवकाशातील संशोधनासाठी भारतीय कंपन्या आकर्षित करणार आहे.

डॉ. मैलास्वामी अन्नादुराई यांची मुलाखत :

प्रश्न : केंद्र सरकारनं अवकाश संशोधनाच्या काही क्षेत्रांमध्ये 100 टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. यामुळं उद्योगात कोणते सकारात्मक बदल होतील असं तुम्हाला वाटतं?

डॉ. अण्णादुराई : याचं उत्तर अलीकडच्या उदाहरणांवरून तुम्हाला मिळू शकतं. जागतिक कोविड महामारीच्या काळातही एखाद्या क्षेत्रात प्रगती झाली असेल ती एरोस्पेस उद्योगात झाली आहे. गेल्या 65 वर्षांत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांपैकी 40 टक्क्यांहून अधिक उपग्रह हे महामारीनंतरच्या तीन वर्षांत प्रक्षेपित करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे इलॉन मस्कच्या स्पेस एक्स आणि वन वेबसारख्या खासगी अवकाश कंपन्यांनी 90 टक्क्यांहून अधिक उपग्रह पाठवले आहेत. भारताचा विचार करता, अवकाश क्षेत्रात सरकारनं विविध उपक्रम चालू केले आहेत. यात आम्ही चंद्र आणि मंगळावर यान पाठवत आहोत. आम्हाला आवश्यक असलेले अनेक उपग्रह आम्ही तयार केले आहेत. माझा विश्वास आहे की परदेशी गुंतवणुकीमुळं अंतराळ संशोधन क्षेत्रात प्रगती होईल. विमानं एकेकाळी केवळ हवाई दलासाठी होती. परंतु नंतर ती सामान्य लोकांसाठी वाहतुकीचं साधन बनली. जवळपास अशीच परिस्थिती अवकाश क्षेत्रात विकसित होण्याची शक्यता आहे. इतर देश यामध्ये आघाडीवर असताना भारताला मागं ठेवता येणार नाही. त्यांनी एक बदल घडवून आणला आहे. जेणेकरून खाजगी क्षेत्र देखील सरकारच्या मालकीच्या अवकाश उपक्रमात योगदान देऊ शकेल.

प्रश्न : अवकाश संशोधन केवळ विज्ञानापुरते मर्यादित नाही. लष्करी उपग्रहांच्या वापराचा विचार करताना राष्ट्रीय सुरक्षेचा समावेश आहे. या वातावरणात सरकारी हस्तक्षेपाशिवाय परकीय गुंतवणुकीला परवानगी देणं व्यवहार्य आहे, असं तुम्हाला वाटते का?

डॉ. अण्णादुराई : हे आव्हानात्मक असून जवळपास सेल फोन्ससारखंच आहे. सुरक्षा आणि वैयक्तिक वापरासाठी उपयुक्त असणाऱ्या ड्रोनचाही यात समावेश आहे. सरकारनं या क्षेत्राचं नियमन करण्याची गरज आहे. जेव्हा भरपूर उत्पादन करण्याची गरज असते, तेव्हा नवीन रणनीती आणि तंत्रे यावी लागतात. सध्याच्या युगात सर्व गुंतवणूक आणि विकास केवळ सरकार करू शकत नाही, खासगी कंपन्याचं देखील योगदान आवश्यक आहे.

प्रश्न : अवकाश क्षेत्रात भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता आहे. त्या बदल्यात करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्यास, विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे कसं जायचं? त्यात त्यांचं करिअर घडवण्यासाठी त्यांनी काय अभ्यास करावा?

डॉ. अन्नादुराई : बी. टेक मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स प्रोग्रामसाठी या क्षेत्रात उत्तम संधी आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये एरोनॉटिकल आणि एरोस्पेस सारखे अभ्यासक्रम निवडता येतात. जर तुम्हाला इस्रोच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तिरुवनंतपुरम येथे अभ्यास करण्याची संधी मिळाली, तर तुमच्यासमोर उज्ज्वल भविष्य आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सरकारी किंवा खाजगी अवकाश क्षेत्रात नोकरी मिळू शकते. त्यात त्यांनी चांगली कामगिरी केल्यास त्यांना नासा अकादमीमध्ये शिक्षण घेण्याची संधी निर्माण होते.

प्रश्न : मानवाला अवकाशात पाठवण्यासाठी गगनयान प्रकल्पाची स्थिती काय आहे?

डॉ. अन्नादुराई : गगनयान प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात क्रायोजेनिक मशीन वापरण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या चांद्रयान-३ कार्यक्रमातही त्याच्या चाचण्या झाल्या. प्रक्षेपण वाहन ट्रान्झिटमध्ये असताना बाह्य तापमानातील बदल किंवा इंधनातील किरकोळ बदलांमुळे मिशनमध्ये व्यत्यय येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसंच यात प्रवास करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. क्रायोजेनिकनं 30 पेक्षा जास्त प्रकारच्या चाचण्या केल्या आहेत. चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात, क्रायोजेनिक मशीन मानवांना वाहून नेण्यासाठी पात्र ठरलं आहे. या वर्षाच्या अखेरीस, व्योमित्र हा मानवरहित यंत्रमानव अंतराळ यानावर चाचणीसाठी पाठवला जाईल. त्यानंतर निकालाच्या आधारे लोक पाठविण्याचा प्रयत्न केला जाईल. अवकाशयानात हवेचा दाब, तापमान इत्यादींचा रोबोटवर काय परिणाम होतो? त्याऐवजी, प्रवास करताना मानवांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, यासारख्या प्रश्नांची उत्तरे हा प्रयोग देऊ शकतो.

प्रश्न : अंतराळ उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल तुमचं मत काय?

डॉ. अन्नादुराई : कॉम्प्युटर आणि सेल फोन सारखं तंत्रज्ञान प्रथम अंतराळ उद्योगात आलं. नंतरच ते व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य झालं. मंगळयान प्रक्षेपित झाल्यापासून AI ISRO सोबत उत्तम काम करत आहे. मंगळयान मंगळ ग्रहाजवळ आल्यावर, त्यावरून पाठवलेली माहिती मिळण्यास आपल्याला 20 मिनिटे लागू शकतात. त्याला आम्ही प्रतिसाद दिल्यास यास 20 मिनिटे देखली लागतील. हे सुमारे 40-मिनिटांचं अंतर आहे. या वेळी, पृथ्वीवरील आदेशांचं पालन करणं अशक्य आहे. त्यावेळी त्याला मंगळ गृहाचं गुरुत्वाकर्षण जाणवेल. त्यामुळं कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यात महत्वाचं योगदान देईल. त्याचप्रमाणे चांद्रयान प्रकल्पात विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्वायत्तपणे चालवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला. आत्तापर्यंत, सर्व लहान यंत्रे योग्यरित्या काम करत आहेत याची खात्री करण्यासाठी मानव उपग्रहांचे निरीक्षण करत आहेत. यासाठी आम्ही सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहोत. क्रायोजेनिक्स सारख्या उपकरणांची चाचणी करताना उपलब्ध डेटाच्या आधारे निर्णय घेण्यासाठी AI चा वापर केला जातो. कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहांच्या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी संगणकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता देखील समाविष्ट करण्यात आली आहे.

प्रश्न : ग्लोबल वार्मिंग एक मोठी समस्या म्हणून उदयास येत आहे. सूर्याचं अन्वेषण करण्यासाठी आदित्य-L1 मोहिमेचे परिणाम आम्हाला हवामानातील बदलांना तोंड देण्यास मदत करतील का?

डॉ. अन्नादुराई : आदित्य L1 पृथ्वीवरील बदलाऐवजी अंतराळातील बदलाकडं जास्त लक्ष देतो. अंतराळातील उपग्रह तापमानवाढीसाठी अधिक असुरक्षित असतात. नुकतंच लाँच झालेले इनसॅट 3डीएस पृथ्वीच्या तापमानाचं परीक्षण करतं. काही आठवड्यांत, 1.5 अब्ज डॉलर्सचा NISR (Nasa Isro Synthetic Aperture Radar) उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. हा उपग्रह इस्रो आणि नासा यांनी संयुक्तपणं तयार केला आहे. पृथ्वीच्या हवामान स्थितीची दर 14 दिवसांनी तुलना केली जाते. मला वाटतं की यामुळं जगातील देशांना जागतिक तापमानवाढ किती गंभीर आहे, हे समजू शकेल. केवळ हिमालय, अंटार्क्टिकाच नाही तर जंगलांचं तापमान देखील नोंदवलं जाऊ शकतं आणि तुलना केली जाऊ शकते.

हे वाचा :

  1. इस्रोची सौर मोहीम फत्ते! आदित्य अंतराळयान L1 बिंदूवर दाखल, जगाला होणार फायदा
  2. ISRO Aditya L1 : इस्रोच्या आदित्य L1 नं जवळून अनुभवल्या सूर्याच्या झळा, शेअर केला पहिला मिशन डाटा
  3. Aditya L1 mission : आदित्य L1ची चौथी कक्षा यशस्वीरित्या पूर्ण; इस्रोनं दिली माहिती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.