ETV Bharat / bharat

हिंदूंवर खोटे आरोप करण्याचं कारस्थान : पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर टीका - Parliament Session

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 10:32 PM IST

Narendra Modi speech in Lok Sabha : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हिंदूंबद्दलच्या वक्तव्यावर जोरदार निशाणा साधला. हिंदूंबद्दल वाईट बोलणाऱ्यांना हा देश कधीच माफ करणार नाही, असं ते म्हणाले.

Narendra Modi, Rahul Gandhi
नरेंद्र मोदी, राहुल गांधी (ETV BHART National Desk)

नवी दिल्ली : लोकसभेत आज (मंगळवार) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान आपलं मत व्यक्त केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींच्या हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावर सडकून टीका केली. काँग्रेस अग्निवीर योजनेवरही खोटारडेपणा पसरवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, मला काही लोकांची अस्वस्थता समजते. विशेषत: ज्यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव झाला आहे त्यांची. जगातील सर्वात मोठ्या निवडणुकीत जनतेनं आम्हाला पुन्हा सेवेची संधी दिली. आमच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात गरिबांच्या हितासाठी काम केलं. सबका साथ सबका विकास हे धोरण पुढं नेण्यात आलं आहे, असं मोदी म्हणाले.

हिंदूंवर खोटे आरोप करण्याचं कारस्थान : 131 वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये म्हटलं होतं की, "ज्या धर्मानं सहिष्णुता शिकवली त्या धर्मातून मी आलो आहे. याचा मला अभिमान आहे". हिंदूंवर खोटे आरोप करण्याचं कारस्थान रचणं ही गंभीर बाब असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. हिंदू हिंसक आहेत, असं म्हणणं ही तुमची संस्कृती आहे. हा देश हे कधीही विसरणार नाही, असं त्यांनी म्हटलं.

तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही : लोकसभेतील भाषणादरम्यान मोदींनी परीक्षा, पेपरफुटीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. या अनियमितता रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तरूणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. त्या प्रकरणातील दोषींनाही अटक करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

सैन्य भरतीबाबत खोटं पसरवू नये : “माझ्या देशातील तरुणांनी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती होऊ नये, म्हणून सैन्य भरतीबाबत खोटं बोललं जात आहे. इंदिरा गांधींनी वन रँक वन पेन्शन पद्धत रद्द केली होती. काँग्रेसने ती वर्षानुवर्षे लागू होऊ दिली नाही. एनडीए सरकारनं त्याची अंमलबजावणी केली", असं मोदी म्हणाले.

सर्वांना न्यायाचं धोरण : तुष्टीकरणामुळं देश उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळं सर्वांना न्यायाचं धोरण आम्ही स्वीकारलं आहे. या धोरणांना जनतेनं मान्यता दिल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. त्यामुळं मला पुन्हा एकदा देशवासीयांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. भारतातील लोक किती परिपक्व आहेत हे या निवडणुकीनं सिद्ध केलं आहे. त्याचेच फलित म्हणजे आज तिसऱ्यांदा आम्ही तुमच्यासमोर नम्रपणे सेवेसाठी हजर झालो आहोत.

NEET परीक्षेवरून टीका : यापूर्वी सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी NEET परीक्षा, अग्निपथ भरती योजनेतील पेपर फुटल्याच्या आरोपावरून सरकारवर हल्लाबोल केला होता. याशिवाय भगवान शंकराचे चित्र दाखवताना ते म्हणाले होते की, स्वतःला हिंदू म्हणवणारे लोक हिंसेची चर्चा करतात. मात्र, भगवान शिव शांतीचा संदेश देतात. राहुल गांधींच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आक्षेप घेतला होता.

हिंदू समाजाचा अपमान : अमित शाह म्हणाले की, राहुल गांधींनी हिंदू समाजाचा अपमान केला आहे. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. राहुल गांधींशिवाय महुआ मोइत्रा यांनीही सोमवारी जोरदार भाषण केलं. गेल्या अधिवेशनात द्रौपदीप्रमाणं माझीही वस्त्रे उतरवली जात असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. पण जनतेनं कृष्ण बनून माझी इज्जत वाचवली. मला भाजपा संसदेत येण्यापासून रोखू इच्छित होता, परंतु यावेळी त्यांचे खासदार 63 नं कमी झाले, असं त्या म्हणाल्या होत्या.

हे वाचलंत का :

  1. दानवेंच्या गैरवर्तनाबद्दल उद्धव ठाकरेंनी मागितली माफी - Uddhav Thackeray
  2. ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांचा अर्ज - Vidhan Parishad Election 2024
  3. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीकडून मागितली लाच; तलाठी निलंबित - Ladki Bahin Yojana

नवी दिल्ली : लोकसभेत आज (मंगळवार) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान आपलं मत व्यक्त केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींच्या हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावर सडकून टीका केली. काँग्रेस अग्निवीर योजनेवरही खोटारडेपणा पसरवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, मला काही लोकांची अस्वस्थता समजते. विशेषत: ज्यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव झाला आहे त्यांची. जगातील सर्वात मोठ्या निवडणुकीत जनतेनं आम्हाला पुन्हा सेवेची संधी दिली. आमच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात गरिबांच्या हितासाठी काम केलं. सबका साथ सबका विकास हे धोरण पुढं नेण्यात आलं आहे, असं मोदी म्हणाले.

हिंदूंवर खोटे आरोप करण्याचं कारस्थान : 131 वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये म्हटलं होतं की, "ज्या धर्मानं सहिष्णुता शिकवली त्या धर्मातून मी आलो आहे. याचा मला अभिमान आहे". हिंदूंवर खोटे आरोप करण्याचं कारस्थान रचणं ही गंभीर बाब असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. हिंदू हिंसक आहेत, असं म्हणणं ही तुमची संस्कृती आहे. हा देश हे कधीही विसरणार नाही, असं त्यांनी म्हटलं.

तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही : लोकसभेतील भाषणादरम्यान मोदींनी परीक्षा, पेपरफुटीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. या अनियमितता रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तरूणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. त्या प्रकरणातील दोषींनाही अटक करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

सैन्य भरतीबाबत खोटं पसरवू नये : “माझ्या देशातील तरुणांनी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती होऊ नये, म्हणून सैन्य भरतीबाबत खोटं बोललं जात आहे. इंदिरा गांधींनी वन रँक वन पेन्शन पद्धत रद्द केली होती. काँग्रेसने ती वर्षानुवर्षे लागू होऊ दिली नाही. एनडीए सरकारनं त्याची अंमलबजावणी केली", असं मोदी म्हणाले.

सर्वांना न्यायाचं धोरण : तुष्टीकरणामुळं देश उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळं सर्वांना न्यायाचं धोरण आम्ही स्वीकारलं आहे. या धोरणांना जनतेनं मान्यता दिल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. त्यामुळं मला पुन्हा एकदा देशवासीयांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. भारतातील लोक किती परिपक्व आहेत हे या निवडणुकीनं सिद्ध केलं आहे. त्याचेच फलित म्हणजे आज तिसऱ्यांदा आम्ही तुमच्यासमोर नम्रपणे सेवेसाठी हजर झालो आहोत.

NEET परीक्षेवरून टीका : यापूर्वी सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी NEET परीक्षा, अग्निपथ भरती योजनेतील पेपर फुटल्याच्या आरोपावरून सरकारवर हल्लाबोल केला होता. याशिवाय भगवान शंकराचे चित्र दाखवताना ते म्हणाले होते की, स्वतःला हिंदू म्हणवणारे लोक हिंसेची चर्चा करतात. मात्र, भगवान शिव शांतीचा संदेश देतात. राहुल गांधींच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आक्षेप घेतला होता.

हिंदू समाजाचा अपमान : अमित शाह म्हणाले की, राहुल गांधींनी हिंदू समाजाचा अपमान केला आहे. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. राहुल गांधींशिवाय महुआ मोइत्रा यांनीही सोमवारी जोरदार भाषण केलं. गेल्या अधिवेशनात द्रौपदीप्रमाणं माझीही वस्त्रे उतरवली जात असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. पण जनतेनं कृष्ण बनून माझी इज्जत वाचवली. मला भाजपा संसदेत येण्यापासून रोखू इच्छित होता, परंतु यावेळी त्यांचे खासदार 63 नं कमी झाले, असं त्या म्हणाल्या होत्या.

हे वाचलंत का :

  1. दानवेंच्या गैरवर्तनाबद्दल उद्धव ठाकरेंनी मागितली माफी - Uddhav Thackeray
  2. ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांचा अर्ज - Vidhan Parishad Election 2024
  3. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीकडून मागितली लाच; तलाठी निलंबित - Ladki Bahin Yojana
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.