ETV Bharat / bharat

लाडू प्रकरणावरून जगनमोहन रेड्डींचं पंतप्रधानांना पत्र; चंद्राबाबू नायडूंनी कारवाईचा दिला इशारा - Tirupati Laddu Controversy

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Updated : 2 hours ago

Tirupati Laddu Controversy : तिरुपती लाडू प्रसादावरून एकीकडे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, तर दुसरीकडे राजकीय पेचही निर्माण झालाय. जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर तिरुपती देवस्थानाच्या पावित्र्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. तर या प्रकरणाबाबत एक विशेष तपास पथक स्थापन करणार असल्याची माहिती चंद्राबाबू नायडू यांनी दिलीय.

Tirupati Laddu Controversy
तिरुपती लाडू वाद (Source - ETV Bharat)

अमरावती Tirupati Laddu Controversy : तिरुपती लाडू वादावरून देशात खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी लाडू प्रसादात चरबी मिसळल्याचा दावा केलाय. या मुद्द्यावरून आता चंद्राबाबू नायडू आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी या प्रकरणावर आमने-सामने आलेत. दरम्यान, जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी चंद्रबाबू नायडू यांच्यावर तिरुपती देवस्थानाच्या पावित्र्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय.

चंद्राबाबू नायडू खोटं बोलणारे : जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, "आंध्रप्रदेश राज्यात घडत असलेल्या निंदनीय घटनांकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या पावित्र्याचं, अखंडतेचं आणि प्रतिष्ठेचं कधीही भरून न येणारे नुकसान झालंय. भगवान वेंकटेश्वरांचे भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधी भक्त आहेत. चंद्राबाबू नायडू हे खोटं बोलणारे आहेत. ते राजकीय हेतूसाठी कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी खेळत आहेत. त्यांच्या विधानामुळं भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. ही परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली नाही, तर याचे वाईट परिणाम होऊ शकतात."

तिरुमला तिरुपती मंदिरात प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणारं तूप भेसळयुक्त आहे आणि त्या तुपात प्राण्यांची वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी टीटीडीच्या कारभाराविरोधात उघड खोटं पसरवलं आहे. असंही जगनमोहन रेड्डी यांनी पत्रात नमुद केलंय.

चौकशीसाठी विशेष तपास पथक : चंद्राबाबू नायडू यांनी आज सांगितलं की, "आम्ही या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करणार आहोत. ज्यामध्ये आयजीपी आणि त्यावरील पदांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. हे तपास पथक सरकारला अहवाल सादर करेल. आम्ही त्या अहवालाच्या आधारे कारवाई करू, जेणेकरून अशा गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही."

हेही वाचा

  1. ढोल-ताशांचा गजर, शिवरायांचा जयजयकार; अमेरिकेत पंतप्रधान मोदींचं मराठमोळ्या स्टाईलनं स्वागत - PM Modi Visit USA
  2. ...तर केदारनाथमध्ये 2013 पेक्षा मोठा अनर्थ घडू शकतो; तिरुपती प्रसादाचा वाद बाबांच्या दरबारी - Kedarnath Temple Prasadam
  3. आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण करणार 11 दिवसांचा उपवास; म्हणाले, "विश्वासघात झाल्यासारखं..." - Tirupati Prasad Row

अमरावती Tirupati Laddu Controversy : तिरुपती लाडू वादावरून देशात खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी लाडू प्रसादात चरबी मिसळल्याचा दावा केलाय. या मुद्द्यावरून आता चंद्राबाबू नायडू आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी या प्रकरणावर आमने-सामने आलेत. दरम्यान, जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी चंद्रबाबू नायडू यांच्यावर तिरुपती देवस्थानाच्या पावित्र्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय.

चंद्राबाबू नायडू खोटं बोलणारे : जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, "आंध्रप्रदेश राज्यात घडत असलेल्या निंदनीय घटनांकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या पावित्र्याचं, अखंडतेचं आणि प्रतिष्ठेचं कधीही भरून न येणारे नुकसान झालंय. भगवान वेंकटेश्वरांचे भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधी भक्त आहेत. चंद्राबाबू नायडू हे खोटं बोलणारे आहेत. ते राजकीय हेतूसाठी कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी खेळत आहेत. त्यांच्या विधानामुळं भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. ही परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली नाही, तर याचे वाईट परिणाम होऊ शकतात."

तिरुमला तिरुपती मंदिरात प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणारं तूप भेसळयुक्त आहे आणि त्या तुपात प्राण्यांची वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी टीटीडीच्या कारभाराविरोधात उघड खोटं पसरवलं आहे. असंही जगनमोहन रेड्डी यांनी पत्रात नमुद केलंय.

चौकशीसाठी विशेष तपास पथक : चंद्राबाबू नायडू यांनी आज सांगितलं की, "आम्ही या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करणार आहोत. ज्यामध्ये आयजीपी आणि त्यावरील पदांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. हे तपास पथक सरकारला अहवाल सादर करेल. आम्ही त्या अहवालाच्या आधारे कारवाई करू, जेणेकरून अशा गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही."

हेही वाचा

  1. ढोल-ताशांचा गजर, शिवरायांचा जयजयकार; अमेरिकेत पंतप्रधान मोदींचं मराठमोळ्या स्टाईलनं स्वागत - PM Modi Visit USA
  2. ...तर केदारनाथमध्ये 2013 पेक्षा मोठा अनर्थ घडू शकतो; तिरुपती प्रसादाचा वाद बाबांच्या दरबारी - Kedarnath Temple Prasadam
  3. आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण करणार 11 दिवसांचा उपवास; म्हणाले, "विश्वासघात झाल्यासारखं..." - Tirupati Prasad Row
Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.