ETV Bharat / bharat

"तुमच्यावर विश्वास नाही"; कॅनडातील उच्चायुक्तांना भारतानं बोलावलं परत

भारत आणि कॅनडा या दोन देशातील संबंधांमध्ये मागील काही वर्षांपासून तणावाचं वातावरण आहे. आता भारतानं एक मोठी घोषणा केली.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Updated : 3 hours ago

CANADA INDIA DIPLOMATIC ROW
भारत- कॅनडा वाद (Source - ANI)

नवी दिल्ली : एका नेत्याच्या कथित हत्या प्रकरणावरुन कॅनडानं भारतावर गंभीर आरोप केले होते. हे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत भारतानं कॅनडाला सडेतोड उत्तर दिलं होतं. तरीही कॅनडा वारंवार भारताविरोधात आग ओकत आहे. याला जशासतसे उत्तर भारतानं वेळोवेळी दिले आहे. आता एक मोठा निर्णय भारतानं घेतलाय.

कॅनडावर विश्वास नाही : भारत सरकारनं कॅनडातील उच्चायुक्त आणि तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या देशात परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. "अंतरवाद आणि हिंसाचाराच्या वातावरणात कॅनडातील ट्रुडो सरकारच्या कृतींमुळं आमच्या अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली हे अधोरेखित झालं. त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सध्याच्या कॅनडाच्या सरकारच्या वचनबद्धतेवर आमचा विश्वास नाही. त्यामुळं कॅनडातील उच्चायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे," अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली.

भारताचा मोठा निर्णय : भारत सरकारनं दहशतवादी घोषित केलेला खलिस्तानवादी समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरुन भारतानं मोठं पाऊल उचललं आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सोमवारी भारतातील कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. या बैठकीनंतर भारतानं कॅनडातून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला.

हत्या प्रकरणात जोडलं : ट्रूडो सरकारनं आपल्या नुकत्याच केलेल्या तपासात कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांचं नाव हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात जोडलं होतं. त्यानंतर भारतानं कडक शब्दात कॅनडा सरकारला सुनावलं होतं. त्यानंतर वेगानं घडामोडी घडल्या व भारत सरकारनं आपल्या अधिकाऱयांना परत बोलावलं आहे.

चौकशी करावी - कॅनडा : परराष्ट्र मंत्रालयातून बाहेर पडताना, कॅनडाच्या मिशनचे प्रभारी स्टीवर्ट व्हीलर म्हणाले की, "कॅनडातील भारत सरकारचे अधिकारी आणि कॅनडाच्या नागरिकाची हत्या यांच्यातील संबंधांचे विश्वसनीय पुरावे दिले आहेत. आता भारतानं आपल्या वचनाचं पालन करण्याची आणि त्या सर्व आरोपांची चौकशी करण्याची वेळ आली आहे."

हेही वाचा

  1. पाकिस्तानमध्ये गोंधळाच्या परिस्थितीत होणार शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक
  2. इस्रायलचा पुन्हा हवाई हल्ला; लेबेनॉनमध्ये 22 तर गाझामध्ये 28 ठार

नवी दिल्ली : एका नेत्याच्या कथित हत्या प्रकरणावरुन कॅनडानं भारतावर गंभीर आरोप केले होते. हे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत भारतानं कॅनडाला सडेतोड उत्तर दिलं होतं. तरीही कॅनडा वारंवार भारताविरोधात आग ओकत आहे. याला जशासतसे उत्तर भारतानं वेळोवेळी दिले आहे. आता एक मोठा निर्णय भारतानं घेतलाय.

कॅनडावर विश्वास नाही : भारत सरकारनं कॅनडातील उच्चायुक्त आणि तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या देशात परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. "अंतरवाद आणि हिंसाचाराच्या वातावरणात कॅनडातील ट्रुडो सरकारच्या कृतींमुळं आमच्या अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली हे अधोरेखित झालं. त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सध्याच्या कॅनडाच्या सरकारच्या वचनबद्धतेवर आमचा विश्वास नाही. त्यामुळं कॅनडातील उच्चायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे," अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली.

भारताचा मोठा निर्णय : भारत सरकारनं दहशतवादी घोषित केलेला खलिस्तानवादी समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरुन भारतानं मोठं पाऊल उचललं आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सोमवारी भारतातील कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. या बैठकीनंतर भारतानं कॅनडातून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला.

हत्या प्रकरणात जोडलं : ट्रूडो सरकारनं आपल्या नुकत्याच केलेल्या तपासात कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांचं नाव हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात जोडलं होतं. त्यानंतर भारतानं कडक शब्दात कॅनडा सरकारला सुनावलं होतं. त्यानंतर वेगानं घडामोडी घडल्या व भारत सरकारनं आपल्या अधिकाऱयांना परत बोलावलं आहे.

चौकशी करावी - कॅनडा : परराष्ट्र मंत्रालयातून बाहेर पडताना, कॅनडाच्या मिशनचे प्रभारी स्टीवर्ट व्हीलर म्हणाले की, "कॅनडातील भारत सरकारचे अधिकारी आणि कॅनडाच्या नागरिकाची हत्या यांच्यातील संबंधांचे विश्वसनीय पुरावे दिले आहेत. आता भारतानं आपल्या वचनाचं पालन करण्याची आणि त्या सर्व आरोपांची चौकशी करण्याची वेळ आली आहे."

हेही वाचा

  1. पाकिस्तानमध्ये गोंधळाच्या परिस्थितीत होणार शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक
  2. इस्रायलचा पुन्हा हवाई हल्ला; लेबेनॉनमध्ये 22 तर गाझामध्ये 28 ठार
Last Updated : 3 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.