ETV Bharat / bharat

"मजबूत रणनीती बनवण्याची गरज..", महाराष्ट्रात काँग्रेसची रणनीती काय असेल? ज्येष्ठ नेते टीएस सिंहदेव यांची खास मुलाखत

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती काय असेल? यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र निवडणूक प्रभारी टी एस सिंहदेव यांनी खुलासा केलाय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

CONGRESS STRATEGY IN MAHARASHTRA
कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते टीएस सिंहदेव यांची मुलाखत (Source - ETV Bharat Reporter)

रायपूर : झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी एस सिंहदेव यांच्याकडे छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या जाहीरनाम्याची जबाबदारी देण्यात आलीय. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती काय असेल? याबाबत टी एस सिंहदेव यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधला.

मजबूत रणनीती बनवण्याची गरज : "यापूर्वी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्यावेळी ज्या राजकीय पक्षांची युती होती ते निवडणुका संपल्यानंतर युती करत असत. प्रत्येक पक्ष आपापला जाहीरनामा तयार करत असे. प्रत्येकजण आपापल्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढवायचा. मात्र, यावेळी तसं नसून महाराष्ट्रात जो कोणी युतीमध्ये सहभागी असेल त्याचा संयुक्त जाहीरनामा काढू. पुढील 5 वर्ष काम कसं करायचं याचा संपूर्ण तपशील जाहीरनाम्यात असणार. त्यात बदल करण्याबाबत कोणताही राजकीय पक्ष बोलू शकत नाही. कारण आता भाजपा पक्षानं ज्या पद्धतीनं रणनीती बनवली आहे, त्याला सामोरं जाण्यासाठी मोठी आणि मजबूत रणनीती बनवण्याची गरज आहे. यावर आम्ही काम करत आहोत. या निवडणुकीत आम्ही सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन जाहीरनामा जारी करणार आहोत. जेणेकरून ही निवडणूक एकजुटीनं लढलेली निवडणूक असल्याचं जनतेला सांगता येईल. जाहीरनाम्यात नंतर कोणताही बदल करता येणार नाही," असं टी एस सिंहदेव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते टीएस सिंहदेव यांची मुलाखत (Source - ETV Bharat Reporter)

"2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर दोनदा सरकार स्थापन झालं. याबाबत बोलताना टी एस सिंहदेव म्हणाले, "2019 च्या निवडणुकीच्या निकालासारखं यावेळी काही होणार नाही. 2019 च्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांच्यात मतभेद असल्यामुळं ही समस्या निर्माण झाली आणि ऑपरेशन लोटस सुरू झालं. त्यानंतर पक्षांमध्ये फूट पाडण्यात आली, मात्र यावेळी तसं होणार नाही."

सरकार बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही : "महाराष्ट्राव्यतिरिक्त झारखंडमध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे. आदिवासी राज्यावर आपली मजबूत पकड आहे. यामध्ये अशा 16 आदिवासी जागा आहेत ज्यासाठी विजय किंवा पराभवासाठी मोठी लढाई लढावी लागेल. या 16 जागांवर आमची जोरदार लढत झाली तर आम्हाला झारखंडमध्ये सरकार बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आम्ही मजबूत आघाडी करून निवडणूक लढवणार आहोत, त्यामुळं आम्ही मजबूत स्थितीत आहोत," असं टी एस सिंहदेव यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. 'व्होट जिहाद' विषयी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आक्रमक, नियमभंग झाल्यास १०० मिनिटांत कारवाई
  2. विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी; बंडखोरी वाढण्याची चिन्हे
  3. कोल्हापुरात वातावरण टाईट, विधानसभेला 'टफ फाईट'; 10 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडी - महायुती आमनेसामने

रायपूर : झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी एस सिंहदेव यांच्याकडे छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या जाहीरनाम्याची जबाबदारी देण्यात आलीय. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती काय असेल? याबाबत टी एस सिंहदेव यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधला.

मजबूत रणनीती बनवण्याची गरज : "यापूर्वी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्यावेळी ज्या राजकीय पक्षांची युती होती ते निवडणुका संपल्यानंतर युती करत असत. प्रत्येक पक्ष आपापला जाहीरनामा तयार करत असे. प्रत्येकजण आपापल्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढवायचा. मात्र, यावेळी तसं नसून महाराष्ट्रात जो कोणी युतीमध्ये सहभागी असेल त्याचा संयुक्त जाहीरनामा काढू. पुढील 5 वर्ष काम कसं करायचं याचा संपूर्ण तपशील जाहीरनाम्यात असणार. त्यात बदल करण्याबाबत कोणताही राजकीय पक्ष बोलू शकत नाही. कारण आता भाजपा पक्षानं ज्या पद्धतीनं रणनीती बनवली आहे, त्याला सामोरं जाण्यासाठी मोठी आणि मजबूत रणनीती बनवण्याची गरज आहे. यावर आम्ही काम करत आहोत. या निवडणुकीत आम्ही सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन जाहीरनामा जारी करणार आहोत. जेणेकरून ही निवडणूक एकजुटीनं लढलेली निवडणूक असल्याचं जनतेला सांगता येईल. जाहीरनाम्यात नंतर कोणताही बदल करता येणार नाही," असं टी एस सिंहदेव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते टीएस सिंहदेव यांची मुलाखत (Source - ETV Bharat Reporter)

"2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर दोनदा सरकार स्थापन झालं. याबाबत बोलताना टी एस सिंहदेव म्हणाले, "2019 च्या निवडणुकीच्या निकालासारखं यावेळी काही होणार नाही. 2019 च्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांच्यात मतभेद असल्यामुळं ही समस्या निर्माण झाली आणि ऑपरेशन लोटस सुरू झालं. त्यानंतर पक्षांमध्ये फूट पाडण्यात आली, मात्र यावेळी तसं होणार नाही."

सरकार बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही : "महाराष्ट्राव्यतिरिक्त झारखंडमध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे. आदिवासी राज्यावर आपली मजबूत पकड आहे. यामध्ये अशा 16 आदिवासी जागा आहेत ज्यासाठी विजय किंवा पराभवासाठी मोठी लढाई लढावी लागेल. या 16 जागांवर आमची जोरदार लढत झाली तर आम्हाला झारखंडमध्ये सरकार बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आम्ही मजबूत आघाडी करून निवडणूक लढवणार आहोत, त्यामुळं आम्ही मजबूत स्थितीत आहोत," असं टी एस सिंहदेव यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. 'व्होट जिहाद' विषयी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आक्रमक, नियमभंग झाल्यास १०० मिनिटांत कारवाई
  2. विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी; बंडखोरी वाढण्याची चिन्हे
  3. कोल्हापुरात वातावरण टाईट, विधानसभेला 'टफ फाईट'; 10 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडी - महायुती आमनेसामने
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.