केंद्रीय अर्थसंकल्प 2020 : शेतीच्या अर्थसंकल्पावर काय आहेत पुणतांब्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया - agri budget 2020
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-5918818-thumbnail-3x2-shirdi.jpg)
अहमदनगर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी सुरुवातीला शेतीशी संबंधित विषयावर सरकारच्या योजना सांगितल्या. यामध्ये त्यांनी २० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देणार असल्याचे सांगितले. आमचे सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सीतारामण म्हणाल्या. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी बजेटमध्ये जाहिर केलेला 16 सुत्री कार्यक्रमाबाबत पुणतांबा येथील शेतकऱ्यांना काय वाटते, हे जाणून घेतले आहे ईटीव्हीचे प्रतिनिधी रविंद्र महाले यांनी.