राज्यपालांची भेट न झाल्याने शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाने व्यक्त केला संताप
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीनेचे निवेदन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांना आज दिले जाणार होते, मात्र राज्यपाल राजभवनात उपस्थित नसल्याने शिष्ठमंडळाने संताप व्यक्त केला आहे. राज्यपालांना शेतकऱ्यांना भेटायला वेळ नसेल, तर राजभवनात जाऊन निवेदन द्यावे का? असा सवाल शिष्ठमंडळाने उपस्थित केला आहे.