मुंबई - भगवा झेंडा लावणं ही महाराष्ट्राची शान आहे. याला विरोध करणारे ते नतद्रष्ट कोण आहेत? अशा घुबडांची काळजी न करता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा राहिल, अशी कार्यवाही सरकारने करावी. भगवा झेंडा शासकीय कार्यालयावर फडकणे, हे आपले स्वप्न आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला हे ज्यांना हे कळत नाही त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे मत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. खेडमधील विषयबद्दल त्यांनी आपले मत मांडले. पाहूयात, ते काय म्हणाले?