ईडा-पीडा रोगराई घेऊन जा गे मारबत.. नागपुरात बडग्या-मारबतची उत्साहात मिरवणूक
मारबत महोत्सवात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते. काळ्या मारबतीचा संबंध महाभारतकाळाशीही जोडला जातो. त्या काळात पुतना मावशीने भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी तिची मारबत काढली आणि गावाबाहेर नेऊन जाळले. तेव्हापासून गावावर समस्या आणि संकटे येत नाहीत, अशी आख्यायिका सांगितली जाते.