thumbnail

'वेतनच नाही तर दिवाळी कशी साजरी करणार?'

By

Published : Nov 9, 2020, 2:20 PM IST

पुणे - राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभरात वेगवेगळ्या शहरात आज आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि लहान मुलेही सहभागी झाले. पगार नाही तर आम्ही दिवाळी साजरी कशी करणार? असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी किरण शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.