Farm Laws Repealed : शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय पोळी शेकणाऱ्यांचा धंदा आता बंद
गुरुनानक जयंतीच्या (Guru Nanak Jayanti) दिवशी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे (Three agricultural laws) रद्द केले. यावर अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. मोदींच्या या निर्णयामुले शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय पोळी शेकणाऱ्यांचा धंदा बंद झाल्याचं त्या म्हणाल्या. तसेच मोदींचे उंची आणखी वाढल्याचेही त्या म्हणाल्या.