thumbnail

By

Published : Apr 1, 2022, 10:03 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ETV Bharat / Videos

Congress Criticizes Bjp : भाजपाची कृती म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; काँग्रेसची टीका

मुंबई - मुंबईतील मेट्रो प्रकल्पाबाबत ( Mumbai Metro Inauguration ) भाजपाने शहरात विविध ठिकाणी पोस्टरबाजी केली ( Bjp Poster Mumbai Metro ) आहे. भाजपाची ही कृती म्हणजे आयत्या बिळावर नागोबा हेच म्हणता येईल, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ( Atul Londhe Criticizes Bjp ) केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा काँग्रेसने केलेल्या विकासकामांचे उद्घाटन करुनच श्रेय घेतात. काम करायचे नाही मात्र सगळ्या गोष्टींचे श्रेय घ्यायचे ही भाजपाची जुनीच कार्यपद्धती आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मुंबईतली पहिली मेट्रो सुरू झाली होती. काँग्रेसच्या काळातच ईस्टर्न फ्री-वे झाला. काँग्रेसने केलेल्या कामांचे श्रेय घ्यायचे आणि रिबीन कापायच्या हाच भाजप नेत्यांचा एकमेव उद्योग असल्याचा निशाणा अतुल लोंढे यांनी भाजपावर साधला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.