ETV Bharat / state

कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱयांवर कपाशी काढून टाकण्याची वेळ

author img

By

Published : Dec 23, 2019, 12:53 PM IST

आधी पावसाने पिकांचे नुकसान केले आणि आता गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीवर संकट आले असल्याने एका शेतकऱ्याने आपल्या ४ एकर शेतातील कपाशीचे पीक रागाच्या भरात काढुन टाकले आहे.

yavatmal
कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव

यवतमाळ - मारेगाव तालुक्यात कपाशीवर बोंड अळीने आक्रमण केले आहे. यावर्षी बीटी बियाणे वापरूनही बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शेतीच्या खर्चासह फवारणीचाही खर्च वाढला आहे. सध्या गुलाबी बोंड अळीमुळे मनोहर जुनघरी यांनी आपल्या शेतातील ४ एकर कपाशी रागाच्या भरात काढून टाकली आहे. शेतीचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी असल्याने शेतीसाठी कुठे-कुठे पैसा खर्च करायचा? हा प्रश्न भेडसावत असताना लाल बोंड अळीचे संकट हे कपाशीच्या पिकाला मातीत घालणारे आहे.

कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव

बोंडे परिपक्व झाल्यानंतर अळी बोंडे पोखरत असल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे. रब्बी हंगाम निघून गेला असल्यामुळे गहू व हरभऱ्याची लागवड आता करता येत नाही. त्यामुळे खरिपातील कपाशीचे नगदी पीक संपूर्ण वाया गेले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

हेही वाचा - वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, परिसरात भीतीचे वातावरण

तालुक्यात बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत शासनाने जाहीर करावी. तसेच बोगस बियाणे विक्री केल्याप्रकरणी कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा - स्मशान भूमीच्या भिंतीला लागूनच लावली दारूची भट्टी; पोलिसांनी एकाला केले जेरबंद

यवतमाळ - मारेगाव तालुक्यात कपाशीवर बोंड अळीने आक्रमण केले आहे. यावर्षी बीटी बियाणे वापरूनही बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शेतीच्या खर्चासह फवारणीचाही खर्च वाढला आहे. सध्या गुलाबी बोंड अळीमुळे मनोहर जुनघरी यांनी आपल्या शेतातील ४ एकर कपाशी रागाच्या भरात काढून टाकली आहे. शेतीचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी असल्याने शेतीसाठी कुठे-कुठे पैसा खर्च करायचा? हा प्रश्न भेडसावत असताना लाल बोंड अळीचे संकट हे कपाशीच्या पिकाला मातीत घालणारे आहे.

कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव

बोंडे परिपक्व झाल्यानंतर अळी बोंडे पोखरत असल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे. रब्बी हंगाम निघून गेला असल्यामुळे गहू व हरभऱ्याची लागवड आता करता येत नाही. त्यामुळे खरिपातील कपाशीचे नगदी पीक संपूर्ण वाया गेले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

हेही वाचा - वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, परिसरात भीतीचे वातावरण

तालुक्यात बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत शासनाने जाहीर करावी. तसेच बोगस बियाणे विक्री केल्याप्रकरणी कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा - स्मशान भूमीच्या भिंतीला लागूनच लावली दारूची भट्टी; पोलिसांनी एकाला केले जेरबंद

Intro:Body:यवतमाळ : मारेगांव तालुक्यातह कपाशीवर बोंड अळीने आक्रमण केले आहे. यावर्षी बीटी बियाणे वापरूनही बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शेतीच्या खर्चासह फवारणीचा हि खर्च वाढला आहे. सध्या गुलाबी बोंडअळी मुळे मनोहर जुनघरी यांनी आपल्या शेतातील चार एकर कपाशी रागाच्या भरात उपडून फेकली आहे. शेतीचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी असल्याने शेतीसाठी कुठे कुठे पैसा खर्च करायचा हा प्रश्न भेडसावत असताना लाल बोन्ड अळीचे संकट हे मातीत घालणार आहे.

बोंडे परिपक्व झाल्यानंतर अळी बोंडे पोखरत असल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे. रब्बी हंगाम निघून गेला असून गहू व हरभरा याची लागवड ही आता करता येत नाही त्यामुळे खरिपातील हे कपाशी नगदी पीक संपूर्ण वाया गेले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यात बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत शासनाने जाहीर करावी. व बोगस बियाणे विक्री केल्याप्रकरणी कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडुन होत आहेत.

बाईट - मनोहर जुनघरी,शेतकरी, मारेगावConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.