ETV Bharat / state

समाजकंटकांनी आंब्याची बाग जाळली; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

वाशिम येथे सोमवारी रात्री शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागेला अज्ञात आरोपींनी जाळल्याने खळबळ उडाली.

author img

By

Published : Apr 9, 2019, 7:42 PM IST

जाळलेली बाग

वाशिम - शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागेला अज्ञात आरोपींनी जाळल्याने खळबळ उडाली. ही घटना वाशिम येथे सोमवारी रात्री घडली. अनिल लोनसुने व रवी मारशेटवार असे त्या जाळण्यात आलेल्या आंब्याच्या बागमालकांची नावे आहेत.

कोकण पाठोपाठ वाशिम जिल्ह्यातही आंबा बागेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाशिम येथील अनिल लोनसुने व रवी मारशेटवार यांनी मोठ्या कष्टाने पाच एकरावर आंब्याची बाग लावली. यंदा आंब्यांना चांगला बहर ही आला होता. मात्र सोमवारी रात्री बागेला अज्ञात आरोपींनी आग लावल्याने फळासह आंब्याची झाडे पूर्णपणे जळाली आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता हे नवीन संकट आल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे महसूल विभागाने पंचनामे करुन भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जाळलेली बाग

वाशिम - शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागेला अज्ञात आरोपींनी जाळल्याने खळबळ उडाली. ही घटना वाशिम येथे सोमवारी रात्री घडली. अनिल लोनसुने व रवी मारशेटवार असे त्या जाळण्यात आलेल्या आंब्याच्या बागमालकांची नावे आहेत.

कोकण पाठोपाठ वाशिम जिल्ह्यातही आंबा बागेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाशिम येथील अनिल लोनसुने व रवी मारशेटवार यांनी मोठ्या कष्टाने पाच एकरावर आंब्याची बाग लावली. यंदा आंब्यांना चांगला बहर ही आला होता. मात्र सोमवारी रात्री बागेला अज्ञात आरोपींनी आग लावल्याने फळासह आंब्याची झाडे पूर्णपणे जळाली आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता हे नवीन संकट आल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे महसूल विभागाने पंचनामे करुन भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Intro:अँकर:- कोकण पाठोपाठ वाशीम जिल्ह्यात ही आंबा बागेचे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाशीम येथील अनिल लोनसुने व रवी मारशेटवार यांनी मोठ्या कष्टाने पाच एकरावर आंब्याची बाग लावली.यंदा चांगला बहर ही आला होता मात्र काल रात्रीच्या सुमारास बागेला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने फळासह आंब्याचे झाड पूर्णपणे करपले आहेत. त्यामुळं लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता हे नवीन संकट आल्याने शेतकरी हतबल झाला आहे.त्यामुळं महसूल विभागाने पंचनामे करून भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे....Body:Feed : सोबत आहेConclusion:Feed : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.