ETV Bharat / state

वीज बिलाची होळी करत वितरण कार्यालयापुढे धरणे देणार - वामनराव चटप

1 ऑगस्टच्या आंदोलनानंतर 9 ऑगस्टला नागपूरच्या संविधान चौकातून ऊर्जा मंत्री यांच्या घरापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांचे वीज बील माफ करा, ही प्रमुख मागणी असणार आहे. तसेच यातून विदर्भ राज्याचा संकल्प घेत सामान्य माणसांपर्यंत ही मागणी जावी म्हणून विजेचा आधार घेऊन हे आंदोलन केल्या जाणार आहे.

author img

By

Published : Jul 27, 2019, 2:11 AM IST

वीज बिलाची होळी करत वितरण कार्यालयापुढे धरणे देणार - वामनराव चटप

वर्धा - मागील काही महिन्यांपासून वीज वितरण विभागाकडून ग्राहकांना जास्तीचे दर आकारण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे. सर्वसामन्यांची ही अडचण ओळखून विदर्भ राज्य आघाडी वाढत्या वीज दराच्या विरोधात आक्रमक झाली आहे. वीज वितरण विभागाच्या अनागोदी कारभाराविरोधात विदर्भ आघाडीच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे, याची माहिती विदर्भ राज्य आघाडीचे नेते वामनराव चटप यांनी दिली. ते वर्धातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

वीज बिलाची होळी करत वितरण कार्यालयापुढे धरणे देणार - वामनराव चटप

1 ऑगस्टच्या आंदोलनानंतर 9 ऑगस्टला नागपूरच्या संविधान चौकातून ऊर्जा मंत्री यांच्या घरापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांचे वीज बील माफ करा, ही प्रमुख मागणी असणार आहे. तसेच यातून विदर्भ राज्याचा संकल्प घेत सामान्य माणसांपर्यंत ही मागणी जावी म्हणून विजेचा आधार घेऊन हे आंदोलन केल्या जाणार आहे.

या आंदोलनात विजेच्या बिलाचे दर, वहन कर, इंधन समायोजन भार, प्रति युनिट भाडे, आदी अन्यायकारक अधिभार रद्द करण्याची मागणी यामाध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी संघटना ही विदर्भात विदर्भ निर्माण महामंचात आहे. आम्ही विदर्भ महामंचाच्या सर्व घटकांसह विदर्भाच्या 62 जागा लढणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी दिली. यावेळी शेतकरी संघटनेचे राम नेवले, उल्हास कोटमकर,निलकंठराव घवघवें, माधुरी पाझारे, गजानन निकम, मधुसूदन हरणे, ज्योती निकम, सतीश दानी उपस्थित होते.

वर्धा - मागील काही महिन्यांपासून वीज वितरण विभागाकडून ग्राहकांना जास्तीचे दर आकारण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे. सर्वसामन्यांची ही अडचण ओळखून विदर्भ राज्य आघाडी वाढत्या वीज दराच्या विरोधात आक्रमक झाली आहे. वीज वितरण विभागाच्या अनागोदी कारभाराविरोधात विदर्भ आघाडीच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे, याची माहिती विदर्भ राज्य आघाडीचे नेते वामनराव चटप यांनी दिली. ते वर्धातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

वीज बिलाची होळी करत वितरण कार्यालयापुढे धरणे देणार - वामनराव चटप

1 ऑगस्टच्या आंदोलनानंतर 9 ऑगस्टला नागपूरच्या संविधान चौकातून ऊर्जा मंत्री यांच्या घरापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांचे वीज बील माफ करा, ही प्रमुख मागणी असणार आहे. तसेच यातून विदर्भ राज्याचा संकल्प घेत सामान्य माणसांपर्यंत ही मागणी जावी म्हणून विजेचा आधार घेऊन हे आंदोलन केल्या जाणार आहे.

या आंदोलनात विजेच्या बिलाचे दर, वहन कर, इंधन समायोजन भार, प्रति युनिट भाडे, आदी अन्यायकारक अधिभार रद्द करण्याची मागणी यामाध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी संघटना ही विदर्भात विदर्भ निर्माण महामंचात आहे. आम्ही विदर्भ महामंचाच्या सर्व घटकांसह विदर्भाच्या 62 जागा लढणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी दिली. यावेळी शेतकरी संघटनेचे राम नेवले, उल्हास कोटमकर,निलकंठराव घवघवें, माधुरी पाझारे, गजानन निकम, मधुसूदन हरणे, ज्योती निकम, सतीश दानी उपस्थित होते.

Intro:वीज बिलाची होळी करत वीज कार्यालयापुढे धरणे देणार
- विजबिलाने सामान्य जनता हैराण झाली आहे.
- वेगळा विदर्भाची मागणी लावून धरणार
- विदर्भातील 62 जागा लढवण्याचा विदर्भ निर्माण महामंचाची तय्यारी

विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापत असताना वेगळा विदर्भाच्या मुद्द्याला धरत वाढत्या विज बिलाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने 1 ऑगस्ट टिळकांच्या पुण्यतिथी दिनी हे आंदोलन विदर्भातील 120 जिल्ह्यात करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आघाडीचे नेते वामनराव चटप यांनी दिली. ते वर्ध्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

तसेच यानंतर ९ ऑगस्टला नागपूरच्या संविधान चौकातून ऊर्जा मंत्री यांच्या घरापर्यंत कोरडी येथे पदयात्रा काढण्यात येईल. यामध्ये शेतकऱ्यांचे वीज बील माफ करा. तसेच यातून विदर्भ राज्याचा संकल्प घेत सामान्य माणसांपर्यंत ही मागणी जावी म्हणून विजेचा आधार घेऊन हे आंदोलन केल्या जाणार आहे.
तसेच सर्वसामान्य लोकांच्या घरातील विजेच्या बिलाचे वीज आकार कर, वहन कर, इंधन समायोजन भार, प्रति युनिट भाडे, आदी अन्यायकारक भार अधिभार रद्द करण्याची मागणी यामाध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी शेतकरी संघटना ही विदर्भात विदर्भ निर्माण महामंचात आहे. आम्ही विदर्भ महामंचाच्या सर्व घटकांसह विदर्भाच्या ६२ जागा लढणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी दिली.

शेतकरी संघटनेचे राम नेवले, उल्हास कोटमकर,निलकंठराव घवघवें, माधुरी पाझारे, गजानन निकम ,मधुसूदन हरणे, ज्योती निकम, सतीश दानी हे उपस्थित होते.


Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.