ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण, बुधवारी निकाल

author img

By

Published : Feb 5, 2022, 7:06 AM IST

Updated : Feb 5, 2022, 12:21 PM IST

वर्ध्याचा हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणी महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाज पूर्ण करत १९ दिवसांत दोषारोपपत्र तयार केले. त्यात २८ फेब्रुवारीला प्रकरणात आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले. त्यानंतर 14 डिसेंबर 2020 पासून सुनावणीला सुरूवात झाली या प्रकरणाचा निकाल बुधवारी 9 फेब्रुवारी रोजी येणार आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण

वर्धा - वर्ध्याचा हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणाचा निकाल आज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 21 जानेवारी 2022 ला दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर 5 फेब्रुवारीला प्रकरणाचा निकाल देणार असल्याची माहिती न्यायमूर्तींनी सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली होती. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या पीडित प्राध्यापिकेला जाळण्याच्या घटनेला 3 फेब्रुवारीला दोन वर्षे पूर्ण झाले आहे. या प्रकरणाचा निकाल बुधवारी 9 फेब्रुवारी रोजी येणार आहे..

19 दिवसात महिला अधिकाऱ्यांनी दाखल केले दोषारोपपत्र -

या प्रकरणात महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाज पूर्ण करत १९ दिवसांत दोषारोपपत्र तयार केले. त्यात २८ फेब्रुवारीला प्रकरणात आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले. त्यानंतर 14 डिसेंबर 2020 पासून सुनावणीला सुरूवात झाली.

29 जणांची साक्ष -

आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी प्रश्न उत्तर विचारत साक्ष नोंदवत उलटतपासणी केली. अंतिम सुनावणी 21 जानेवारीला झाली. दोन्ही बाजू ऐकुण घेत अंतिम टप्पा म्हणून 5 फेब्रुवारीला निकाल देणार अशी माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली. तसेच आरोपी विकेश नगराळेंचे वकील यांनी दोन्ही पक्षाचे लेखी आणि मौखिक युक्तिवाद संपला असून न्यायालय पाच तारखेला निर्णय देणार असल्याचेही सांगितले.

शक्ती कायदा लागू झाला निकालाची प्रतीक्षा...

या घटनेनंतर शक्ती कायदा लागू करावा, या मागणीने जोर धरला होता. प्रकरणाचा निकाल लवकर लागावा म्हणून जलदगती न्यायालयात प्रकरण चालवण्यात आले. अखेर दोन वर्षात न्यायालयीन कामकाज पूर्ण झाले. राज्यात शक्ती कायदा लागू झाला. यासोबतच क्रूर घटनेला दोन वर्षे पूर्ण झाले. त्यामुळे आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे घटना -

घटनेतील मृत प्राध्यापिका ही हिंगणघाटच्या स्व.आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशी नियमितपणे 3 फेब्रुवारी 2020 ला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला पोहोचली. त्यानंतर नंदोरी चौकापासून काही अंतरावर कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे वाट पाहत होता. मनात राग ठेवून दुचाकीतील पेट्रोल अंगावर टाकून पीडितेला पेटवण्याचा बेत त्याच्या मनात होता. दिसताक्षणीच आरोपीने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि तिला पेटवून दिले. घटनेनंतर लगेच प्राथमिक उपचार करत गंभीररित्या जळालेल्या अवस्थेत तिला नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर मृत्यूशी झुंज देत तिने 10 फेब्रुवारीला अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतर मूळ गाव दरोडा येथे मृतदेह पोहोचताच आरोपी विकेश नगराळेला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. रस्ता रोको करत मृतदेह असलेल्या रुग्णवाहिकेवर आणि पोलिसांवर सुद्धा दगडफेक झाली.

जळीतकांड प्रकरणातील महत्वाचे तपशील -

  • 3 फेब्रुवारी 2020 सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली घटना
  • पीडितेने 10 फेब्रुवारीला उपचारदरम्यान नागपुरात घेतला अखेरचा श्वास
  • प्रकरणाची गंभीरता पाहता उज्वल निकम यांची सरकारकडून नियुक्ती
  • घटनेपासून आरोपी विकेश नगराळे कारागृहातच
  • कोरोनाची पहिली लाट आल्याने कामकाज थांबले त्यामुळे सुनावणी तब्बल 9 महिने लांबली
  • आतापर्यंत प्रकरणात 29 साक्षीदारांची तपासणी

वर्धा - वर्ध्याचा हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणाचा निकाल आज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 21 जानेवारी 2022 ला दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर 5 फेब्रुवारीला प्रकरणाचा निकाल देणार असल्याची माहिती न्यायमूर्तींनी सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली होती. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या पीडित प्राध्यापिकेला जाळण्याच्या घटनेला 3 फेब्रुवारीला दोन वर्षे पूर्ण झाले आहे. या प्रकरणाचा निकाल बुधवारी 9 फेब्रुवारी रोजी येणार आहे..

19 दिवसात महिला अधिकाऱ्यांनी दाखल केले दोषारोपपत्र -

या प्रकरणात महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाज पूर्ण करत १९ दिवसांत दोषारोपपत्र तयार केले. त्यात २८ फेब्रुवारीला प्रकरणात आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले. त्यानंतर 14 डिसेंबर 2020 पासून सुनावणीला सुरूवात झाली.

29 जणांची साक्ष -

आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी प्रश्न उत्तर विचारत साक्ष नोंदवत उलटतपासणी केली. अंतिम सुनावणी 21 जानेवारीला झाली. दोन्ही बाजू ऐकुण घेत अंतिम टप्पा म्हणून 5 फेब्रुवारीला निकाल देणार अशी माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली. तसेच आरोपी विकेश नगराळेंचे वकील यांनी दोन्ही पक्षाचे लेखी आणि मौखिक युक्तिवाद संपला असून न्यायालय पाच तारखेला निर्णय देणार असल्याचेही सांगितले.

शक्ती कायदा लागू झाला निकालाची प्रतीक्षा...

या घटनेनंतर शक्ती कायदा लागू करावा, या मागणीने जोर धरला होता. प्रकरणाचा निकाल लवकर लागावा म्हणून जलदगती न्यायालयात प्रकरण चालवण्यात आले. अखेर दोन वर्षात न्यायालयीन कामकाज पूर्ण झाले. राज्यात शक्ती कायदा लागू झाला. यासोबतच क्रूर घटनेला दोन वर्षे पूर्ण झाले. त्यामुळे आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे घटना -

घटनेतील मृत प्राध्यापिका ही हिंगणघाटच्या स्व.आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशी नियमितपणे 3 फेब्रुवारी 2020 ला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला पोहोचली. त्यानंतर नंदोरी चौकापासून काही अंतरावर कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे वाट पाहत होता. मनात राग ठेवून दुचाकीतील पेट्रोल अंगावर टाकून पीडितेला पेटवण्याचा बेत त्याच्या मनात होता. दिसताक्षणीच आरोपीने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि तिला पेटवून दिले. घटनेनंतर लगेच प्राथमिक उपचार करत गंभीररित्या जळालेल्या अवस्थेत तिला नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर मृत्यूशी झुंज देत तिने 10 फेब्रुवारीला अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतर मूळ गाव दरोडा येथे मृतदेह पोहोचताच आरोपी विकेश नगराळेला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. रस्ता रोको करत मृतदेह असलेल्या रुग्णवाहिकेवर आणि पोलिसांवर सुद्धा दगडफेक झाली.

जळीतकांड प्रकरणातील महत्वाचे तपशील -

  • 3 फेब्रुवारी 2020 सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली घटना
  • पीडितेने 10 फेब्रुवारीला उपचारदरम्यान नागपुरात घेतला अखेरचा श्वास
  • प्रकरणाची गंभीरता पाहता उज्वल निकम यांची सरकारकडून नियुक्ती
  • घटनेपासून आरोपी विकेश नगराळे कारागृहातच
  • कोरोनाची पहिली लाट आल्याने कामकाज थांबले त्यामुळे सुनावणी तब्बल 9 महिने लांबली
  • आतापर्यंत प्रकरणात 29 साक्षीदारांची तपासणी
Last Updated : Feb 5, 2022, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.