ETV Bharat / state

पंचनामे झालेच नाहीत... संतप्त शेतकरी लोकप्रतिनिधीसह कपाशी घेऊन तहसीलदारांच्या दालनात

author img

By

Published : Nov 22, 2019, 9:52 PM IST

जिल्ह्यातील अनेक भागात सतत झालेल्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशीचेम मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, त्याचे पंचनामे न केल्याने संतप्त शेतकऱ्यासह आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी कारंजा तहसीलदार कार्यालयात पोहोचले.

शेतकरी आणि लोकप्रतिनिधी खराब कपाशी घेऊन तहसीलदाराच्या दालनात

वर्धा - जिल्ह्यातील अनेक भागात सतत झालेल्या पावसाने सोयाबीन आणि कापाशीच्या पिकांचे नुकसान झाले. मात्र, असे असले तरी ओला दुष्काळ अद्याप जाहीर झाला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह आमदार आणि स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी कारंजा तहसीलदार यांच्या दालनात पोहोचले. यावेळी संतप्त होत आमदार दादाराव केचे यांनी खडे बोल सुनावत कपाशीची खराब झालेली झाडे तहसीलदरांना दाखवली. शिवाय पंचनामे का केले नाहीत? असा सवालही केला.

शेतकरी आणि लोकप्रतिनिधी खराब कपाशी घेऊन तहसीलदाराच्या दालनात

यंदा सततच्या पावसाने कारंजा तालुक्यात जुलै ते सप्टेंबर या महिन्यात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. पावसाने उघडीप न दिल्याने पिके कुजली. परिणामी सोयाबीन नंतर आता कापशीची झाडेही सडत असल्याने झाडे घेऊन आमदार दादाराव केचे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे पदाधिकारी तहसीलदारांच्या दालनात पोहोचले. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असतानाही पंचनामा करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक कृषी सहायक हे बांधावर पोहोचले नसल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे संतप्त आमदारांनी तहसीलदारांना खडे बोल सुनावले. जरा जरी शेतकऱ्यांची जान असती तर पंचनामे झाले असते. अतिवृष्टी होऊन सुद्धा पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती यांनी सवाल करत शेतकऱ्यांच्या नुकसानीची परिस्थिती मांडली.

यावेळी खरीपाचे पीक न आल्याने शेतकरी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवत आहेत. खरीप पिकांचे उत्पन्न घटले असून सुद्धा आणेवारी जास्त दाखवण्यात आली. तहसीलदार सचिन कुमावत यांना कपाशीचे झाड दाखवत विदारक परिस्थिती मांडण्यात आली. यामुळे हे पाहून तुम्हीच सांगा उत्पन्न होईल का असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी तहसीलदारांना विचारला. तत्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली. दुर्लक्ष केल्यास आज दालनात आलो उद्या रस्त्यावर उतरू असा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.

व्हिडिओ काढण्यास मज्जाव...!

संतप्त शेतकरी पोहोचले असताना आमदार आणि शेतकरी खडे बोल सुनावत असल्याने काही सुचत नसल्याने तहसीलदार सचिन कुमावत यांनी पत्रकारांना व्हिडिओ काढण्यास मज्जाव केला. यामुळे खरच पंचनामे झाले नाही का, म्हणून संभाषण रेकॉर्ड होऊन नये म्हणून व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात आली.

यावेळी आर्वी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार दादाराव केचे, जिल्हा परिषद सभापती नीता गजाम, पंचायत समिती सभापती मंगेश खवशी, जिल्हा परिषद सदस्य रेवता धोटे, सरिता विजय गाखरे, जगदीश डोळे, रोषणा ढोबाळे, आम्रपाली बागडे, पुष्पा चरडे, शेतकरी विलास खवशी, विष्णू खवशी, घनश्याम बारंगे, महेश पेंधे, रामचंद्र बारंगे, श्यामसुंदर चोपडे, सुनील पठाडे, योगेश दलाल , सुरेश घागरे , विजय गाखरे, दिलीप जसुतकर, मेघराज खवशी याच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

वर्धा - जिल्ह्यातील अनेक भागात सतत झालेल्या पावसाने सोयाबीन आणि कापाशीच्या पिकांचे नुकसान झाले. मात्र, असे असले तरी ओला दुष्काळ अद्याप जाहीर झाला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह आमदार आणि स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी कारंजा तहसीलदार यांच्या दालनात पोहोचले. यावेळी संतप्त होत आमदार दादाराव केचे यांनी खडे बोल सुनावत कपाशीची खराब झालेली झाडे तहसीलदरांना दाखवली. शिवाय पंचनामे का केले नाहीत? असा सवालही केला.

शेतकरी आणि लोकप्रतिनिधी खराब कपाशी घेऊन तहसीलदाराच्या दालनात

यंदा सततच्या पावसाने कारंजा तालुक्यात जुलै ते सप्टेंबर या महिन्यात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. पावसाने उघडीप न दिल्याने पिके कुजली. परिणामी सोयाबीन नंतर आता कापशीची झाडेही सडत असल्याने झाडे घेऊन आमदार दादाराव केचे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे पदाधिकारी तहसीलदारांच्या दालनात पोहोचले. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असतानाही पंचनामा करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक कृषी सहायक हे बांधावर पोहोचले नसल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे संतप्त आमदारांनी तहसीलदारांना खडे बोल सुनावले. जरा जरी शेतकऱ्यांची जान असती तर पंचनामे झाले असते. अतिवृष्टी होऊन सुद्धा पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती यांनी सवाल करत शेतकऱ्यांच्या नुकसानीची परिस्थिती मांडली.

यावेळी खरीपाचे पीक न आल्याने शेतकरी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवत आहेत. खरीप पिकांचे उत्पन्न घटले असून सुद्धा आणेवारी जास्त दाखवण्यात आली. तहसीलदार सचिन कुमावत यांना कपाशीचे झाड दाखवत विदारक परिस्थिती मांडण्यात आली. यामुळे हे पाहून तुम्हीच सांगा उत्पन्न होईल का असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी तहसीलदारांना विचारला. तत्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली. दुर्लक्ष केल्यास आज दालनात आलो उद्या रस्त्यावर उतरू असा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.

व्हिडिओ काढण्यास मज्जाव...!

संतप्त शेतकरी पोहोचले असताना आमदार आणि शेतकरी खडे बोल सुनावत असल्याने काही सुचत नसल्याने तहसीलदार सचिन कुमावत यांनी पत्रकारांना व्हिडिओ काढण्यास मज्जाव केला. यामुळे खरच पंचनामे झाले नाही का, म्हणून संभाषण रेकॉर्ड होऊन नये म्हणून व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात आली.

यावेळी आर्वी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार दादाराव केचे, जिल्हा परिषद सभापती नीता गजाम, पंचायत समिती सभापती मंगेश खवशी, जिल्हा परिषद सदस्य रेवता धोटे, सरिता विजय गाखरे, जगदीश डोळे, रोषणा ढोबाळे, आम्रपाली बागडे, पुष्पा चरडे, शेतकरी विलास खवशी, विष्णू खवशी, घनश्याम बारंगे, महेश पेंधे, रामचंद्र बारंगे, श्यामसुंदर चोपडे, सुनील पठाडे, योगेश दलाल , सुरेश घागरे , विजय गाखरे, दिलीप जसुतकर, मेघराज खवशी याच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Intro:mh_war_02_amdar_andolan_pkg_7204321

आमदार, शेतकरी, लोकप्रतिनिधी भडकले, खराब कपाशी घेऊन तहसीलदाराच्या दालनात
- नुकसानीचे पंचनामे का झाले नाही विचारला सवाल
- शेतकऱ्यांचे नुकसान होऊन आणेवारी 70 पेक्षा जास्त कशी

वर्धा- यंदा जिल्ह्यातील अनेक भागात सतत झालेल्या पावसाने सोयाबीन आणि कापाशीच्या पिकांचे नुकसान झाले. पण असले तरी ओला दुष्काळ अद्याप जाहीर झाला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह आमदार आणि स्वराज संस्थेचे लोकप्रतिनिधी कारंजा तहसीलदार यांच्या दालनात पोहचले. यावेळी संतप्त होत आमदार दादाराव केचे यांनी खडे बोल सुनावत कपाशीचे खराब झालेले झाडे दाखवली. शिवाय पंचनामे का केले नाही असा सवालही केला.

यंदा सततच्या पावसाने कारंजा तालुक्यात जुलै ते सप्टेंबर या महिन्यात 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. यासस उघडीप न मिळाल्याने पीक कुजले. परिणामी सोयाबीन नंतर आता कापसाचे झाडही सडत असल्याने झाडे घेऊन आमदार दादाराव केचे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे पदाधिकारी तहसीलदारांच्या दालनात पोहचले. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असतांनाही पंचनामा करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक कृषी सहायक हे बांधावर पोहचले नसल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे संतप्त आमदारांनी तहसीलदार यांना खडे बोल सुनावले. जरा जरी शेतकऱ्यांची लाज असती तर पंचनामे झाले असते. अतिवृष्टी होऊन सुद्धा पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेंळी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती यांनी सवाल करत परिस्थिती मांडली.

यावेळी खरिपाचे पीक न आल्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवत आहे. खरीप पिकांचे उत्पन्न घटले असून सुद्धा आणेवारी जास्त दाखवण्यात आली. तहसीलदार सचिन कुमावत यांना कपाशीचे झाड दाखवत विदारक परिस्थिती मांडण्यात आली. यामुळे हे पाहून तुम्हीच सांगा उत्पन्न होईल का असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी विचारला. तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. तसेच दुर्लक्ष केल्यास आज दालनात आलो उद्या रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला.

किती बोन्ड आहे यात किती उत्पन्न होईल अशी विचारणा करून कपाशी भेट दिली आता तरी याची पाहणी करून आमचा तालुका दुष्काळ घोषित करण्यात यावा असे सांगून शेताच्या नुकसानीचे पंचनामे करावे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरले शिवाय राहणार नाही.

व्हिडीओ काढण्यास मज्जाव...!
संतप्त शेतकरी पोहचले असतांना आमदार आणि शेतकरी खडे बोल सुनावत असल्याने काही सुचत नसल्याने तहसीलदार सचिन कुमावत यांनी पत्रकारांना व्हिडिओ काढण्यास मज्जाव केला. यामुळे खरच पंचनामे झाले नाही का, म्हणून से संभाषण रेकॉर्ड होऊन नये म्हणून विडिओ काढण्यास मनाइ करण्यात आली.

यावेळी आर्वी मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार दादाराव केचे , जिल्हा परिषद सभापती नीता गजाम, पंचायत समिती सभापती मंगेश खवशी , जीप सदस्य रेवता धोटे ,सरिता विजय गाखरे, पस सदस्य जगदीश डोळे, रोषणा ढोबाळे, आम्रपाली बागडे, पुष्पा चरडे, शेतकरी विलास खवशी, विष्णू खवशी, घनश्याम बारंगे, महेश पेंधे, रामचंद्र बारंगे,श्यामसुंदर चोपडे, सुनील पठाडे, योगेश दलाल , सुरेश घागरे , विजय गाखरे, दिलीप जसुतकर, मेघराज खवशी याच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होतेBody:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.