ETV Bharat / state

'नो प्रिस्क्रिप्शन नो मेडिसिन'.. विनाकारण औषधांच्या चिठ्यांची 'लक्षणे' तपासा

author img

By

Published : May 5, 2020, 10:17 AM IST

Updated : May 5, 2020, 12:13 PM IST

लॉकडाऊन सुरू झाले आणि आता तिसऱ्या टप्प्यात पोहचले आहे. असे असतांना मोठ्या प्रमाणात नागरिक अद्याप रस्त्यावर केवळ जुन्या औषधींच्या चिठ्या घेऊन विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या नजरेस आले. यामुळे यावर निर्बंध घालण्यासाठी अशा चिठ्या आल्यास त्यांना औषध देऊ नये अशे आदेश देण्यात आले आहेत.

आर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश
आर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश

वर्धा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. यातच अत्यावश्यक सुविधेत औषधं येत असल्याने त्याला सूट देण्यात आली. परंतु, नागरिक याच औषधी चिठ्या घेऊन विनाकारण फिरत असल्याचे पुढे येत आहे. यासोबत सर्दी, खोकला तापसारख्या आजारांकडे दुर्लक्ष करत औषधी घेतली जात आहे. यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना चाप देण्यासाठी जुन्या चिठ्यांवर औषधी दिली जाऊ नये, असे आदेश आर्वी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी दिले आहेत.

विनाकारण औषधांच्या चिठ्यांची 'लक्षणे' तपासा, आर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश

लॉकडाऊन सुरू झाले आणि आता तिसऱ्या टप्प्यात पोहचले आहे. असे असतांना मोठ्या प्रमाणात नागरिक अद्याप रस्त्यावर केवळ जुन्या औषधींच्या चिठ्या घेऊन विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या नजरेस आले. यामुळे यावर निर्बंध घालण्यासाठी अशा चिठ्या आल्यास त्यांना औषध देऊ नये अशे आदेश देण्यात आले आहेत. सर्दी, खोकला, ताप, थोडी अंगदुखी अशा किरकोळ कारणांकरता दवाखान्यात जाण्यास टाळले जाते. मेडीकलमधून एखादी गोळी घेत त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न केला जातोय. यामध्ये कोरोनासदृश्य लक्षणाच्या व्यक्तींनासुध्दा औषधी दुकानामधुन विनातपासणी करुन औषधे दिली जात असल्याचे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले.

तीन तालुक्यात औषधीची चिठ्ठी रद्द होण्याचा मारणार स्टॅम्प -

आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील सर्व औषधी विक्रेत्यांना, केवळ डॉक्टरांनी दिेलेल्या चिठ्ठीवरच औषधे द्यावे. जुन्या चिठ्या असल्यास आणि त्या विनाकारण वाटत असल्यास त्यावर रद्द किंवा कॅन्सल असा शिक्का मारावा, असे आदेशित करण्यात आले आहे. सर्व औषधी विक्रेत्यांनी सदर औषधी ही तपासणी डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीशिवाय देऊ नये, असे आदेशात म्हटले आहे. अशी कार्यवाही सध्या होत असल्यास ती त्वरीत थांबवावी, तसेच कोरोना विषाणू संबंधित लक्षणे आढलेल्या व्यक्तीस आपल्या तालुक्यातील शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवावे, असेही उपविभागीय अधिकार्‍यांनी आदेशित केले आहे.

वर्धा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. यातच अत्यावश्यक सुविधेत औषधं येत असल्याने त्याला सूट देण्यात आली. परंतु, नागरिक याच औषधी चिठ्या घेऊन विनाकारण फिरत असल्याचे पुढे येत आहे. यासोबत सर्दी, खोकला तापसारख्या आजारांकडे दुर्लक्ष करत औषधी घेतली जात आहे. यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना चाप देण्यासाठी जुन्या चिठ्यांवर औषधी दिली जाऊ नये, असे आदेश आर्वी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी दिले आहेत.

विनाकारण औषधांच्या चिठ्यांची 'लक्षणे' तपासा, आर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश

लॉकडाऊन सुरू झाले आणि आता तिसऱ्या टप्प्यात पोहचले आहे. असे असतांना मोठ्या प्रमाणात नागरिक अद्याप रस्त्यावर केवळ जुन्या औषधींच्या चिठ्या घेऊन विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या नजरेस आले. यामुळे यावर निर्बंध घालण्यासाठी अशा चिठ्या आल्यास त्यांना औषध देऊ नये अशे आदेश देण्यात आले आहेत. सर्दी, खोकला, ताप, थोडी अंगदुखी अशा किरकोळ कारणांकरता दवाखान्यात जाण्यास टाळले जाते. मेडीकलमधून एखादी गोळी घेत त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न केला जातोय. यामध्ये कोरोनासदृश्य लक्षणाच्या व्यक्तींनासुध्दा औषधी दुकानामधुन विनातपासणी करुन औषधे दिली जात असल्याचे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले.

तीन तालुक्यात औषधीची चिठ्ठी रद्द होण्याचा मारणार स्टॅम्प -

आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील सर्व औषधी विक्रेत्यांना, केवळ डॉक्टरांनी दिेलेल्या चिठ्ठीवरच औषधे द्यावे. जुन्या चिठ्या असल्यास आणि त्या विनाकारण वाटत असल्यास त्यावर रद्द किंवा कॅन्सल असा शिक्का मारावा, असे आदेशित करण्यात आले आहे. सर्व औषधी विक्रेत्यांनी सदर औषधी ही तपासणी डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीशिवाय देऊ नये, असे आदेशात म्हटले आहे. अशी कार्यवाही सध्या होत असल्यास ती त्वरीत थांबवावी, तसेच कोरोना विषाणू संबंधित लक्षणे आढलेल्या व्यक्तीस आपल्या तालुक्यातील शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवावे, असेही उपविभागीय अधिकार्‍यांनी आदेशित केले आहे.

Last Updated : May 5, 2020, 12:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.