ETV Bharat / state

मुनगंटीवारांना निराशेने ग्रासले आहे; जयंत पाटलांचा टोला

author img

By

Published : Feb 4, 2021, 3:25 AM IST

Updated : Feb 4, 2021, 3:40 AM IST

मुनगंटीवारांना निराशेने ग्रासले असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प संकटात सापडलेल्या माणसाला दिलासा देईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच केंद्राच भाजप सरकार महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक देत असल्याचे केंद्रीय अर्थसंकल्पातून सिद्ध झाल्याचेही पाटील म्हणाले.

सेवाग्राम आश्रमाला भेट
जयंत पाटील- सेवाग्राम आश्रमाला भेट

वर्धा - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीवर तर्क लावले जात आहेत. शिवसेना-भाजपा शेवटच्या श्वासापर्यंत शत्रू नाही, म्हणत सूचक वक्तव्य मुंगटीवार यांनी केले होते. हिंदुत्व हा जनतेचा आवाज कधी ना कधी दोन्ही पक्षाला ऐकावा लागेल, असेही वक्तव्य त्यांनी केले होते. यावर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील मुनगंटीवार यांना निराशेने ग्रासले आहे, अशी टीका केली. ते वर्ध्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेस आले होते. त्यावेळी सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुनगंटीवारांना निराशेने ग्रासले आहे
भाजपची आशा आहे?भाजपला शिवसेने शिवाय दुसारा पर्याय नाही. ते अपेक्षा करत आहे की कधीतरी एकत्र येईल. याचा अर्थ असा आहे की, त्यांना निराशेने ग्रासले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मतदारसंघाच्या कामासाठी भेट घेऊन त्याचा वेगळा अर्थ निघावा. याचा राजकीय दृष्ट्या वातावरण निर्मितीला उपयोग व्हावा, असा त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुनगंटीवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
सेवाग्राम आश्रमाला भेट
सेवाग्राम आश्रमाला भेट
केंद्र सरकारने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला....केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पान पुसण्याचे काम केले आहे. इतर चार राज्यांना मदत करणारा केंद्राने महाराष्ट्रासोबत दुजाभावात ठेवला आहे. महाराष्ट्र सरकारचे जीएसटीचे 27 हजार कोटी रुपये सरकारने अजून दिले नाहीत. केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्राला अडचणीत आणण्याच्या प्रयत्न करत आहे. मात्र, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना विशेषता कोविडने संकटात पडलेल्याना दिलासा देणारा राहील, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

वर्धा - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीवर तर्क लावले जात आहेत. शिवसेना-भाजपा शेवटच्या श्वासापर्यंत शत्रू नाही, म्हणत सूचक वक्तव्य मुंगटीवार यांनी केले होते. हिंदुत्व हा जनतेचा आवाज कधी ना कधी दोन्ही पक्षाला ऐकावा लागेल, असेही वक्तव्य त्यांनी केले होते. यावर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील मुनगंटीवार यांना निराशेने ग्रासले आहे, अशी टीका केली. ते वर्ध्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेस आले होते. त्यावेळी सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुनगंटीवारांना निराशेने ग्रासले आहे
भाजपची आशा आहे?भाजपला शिवसेने शिवाय दुसारा पर्याय नाही. ते अपेक्षा करत आहे की कधीतरी एकत्र येईल. याचा अर्थ असा आहे की, त्यांना निराशेने ग्रासले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मतदारसंघाच्या कामासाठी भेट घेऊन त्याचा वेगळा अर्थ निघावा. याचा राजकीय दृष्ट्या वातावरण निर्मितीला उपयोग व्हावा, असा त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुनगंटीवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
सेवाग्राम आश्रमाला भेट
सेवाग्राम आश्रमाला भेट
केंद्र सरकारने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला....केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पान पुसण्याचे काम केले आहे. इतर चार राज्यांना मदत करणारा केंद्राने महाराष्ट्रासोबत दुजाभावात ठेवला आहे. महाराष्ट्र सरकारचे जीएसटीचे 27 हजार कोटी रुपये सरकारने अजून दिले नाहीत. केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्राला अडचणीत आणण्याच्या प्रयत्न करत आहे. मात्र, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना विशेषता कोविडने संकटात पडलेल्याना दिलासा देणारा राहील, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
Last Updated : Feb 4, 2021, 3:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.