ETV Bharat / state

'सीसीटीव्ही कॅमेर्‍या'ला बघून घाबरु नका, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

author img

By

Published : Nov 30, 2020, 5:24 PM IST

ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. यामुळे सोमवारी (दि. 30 नोव्हेंबर) राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. 'सीसीटीव्ही कॅमेऱ्याला बघून घाबरू नका, कॅमेरा बंद आहे', असे फलक लावत हे आंदोलन करण्यात आले आहे.

आंदोलक
आंदोलक

ठाणे - 'सीसीटीव्ही कॅमेर्‍याला बघून घाबरु नका; कॅमेरा बंद आहे', असे फलक लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे युवाध्यक्ष तथा नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांनी या बंद सीसीटीव्ही कॅमेर्‍यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन केले.

आंदोलक

ठाण्यासह मुंब्रा-कौसा-दिव्यातील स्थिती सारखीच

ठाणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने गाजावाजा करत महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत होते. ठाणे पालिका हद्दीमध्ये प्रभाग सुधारणा निधीतून 1 हजार 200, वायफाय योजनेतून 100 असे एकूण 1 हजार 300 कॅमेरे बसविले आहेत. तसेच यापूर्वी महापालिका आणि अन्य निधीतून 100 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय, तीनशे ते चारशे कॅमेरे आणखी बसविण्यात येणार होते. या कॅमेर्‍यांमुळे सोनसाखळी चोरी आणि रस्त्यावरील गुन्हेगारीला आळा बसेल, या उद्देशातून महापालिकेने ही योजना राबविली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत लावण्यात आलेल्या कॅमेर्‍यांपैकी ठाणे शहरातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक तर मुंब्रा-कौसा आणि दिव्यातील 100 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. या संदर्भात ठामपाच्या विद्युत विभागाशी संपर्क साधूनही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या शानू पठाण यांनी सोमवारी (दि. 30 नोव्हेंबर) सीसीटीव्ही लावलेल्या खांबांवर चढून 'सीसीटिव्ही कॅमेर्‍याला बघून घाबरु नका; कॅमेरा बंद आहे; ठाणे महापालिका सुस्त, ठेकेदार मस्त', असे फलक लावले.

कोट्यवधी रुपये पाण्यात

ठाणे महानगर पालिकेने मोठा गाजावाजा करुन हे सीसीटीव्ही बसविले होते. त्यासाठी नगरसेवक निधीतील 5 लाखांच्या रक्कमेचा वापर करुन सीसीटीव्हीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. हा खर्च आता पाण्यात गेलेला आहे. एकीकडे गुन्हे वाढू नये, अशी अपेक्षा करत असतानाच गुन्हेगारांना मोकळे सोडण्याचे हे धोरण आहे. राबोडीमधील हत्याकांडाची उकल करण्यासाठी याच सीसीटीव्हीचा वापर झाला आहे. तेथे कॅमेरे सुरू असल्याने आरोपींना पकडणे सोपे झाले होते. मुंब्रा-कौसा भागात सर्व कॅमेरे बंद असल्याने एखादा गुन्हा घडल्यास त्याचा छडा कसा लावणार? त्यामुळे येत्या आठ दिवसात जर ठाणे महापालिकेच्या विद्यूत विभागाने सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू केले नाहीत. तर बंदावस्थेतील हे कॅमेरे काढून ते विद्यूत विभागात फेकण्यात येतील, असा इशाराही यावेळी शानू पठाण यांनी दिला.

हेही वाचा - ठाण्यात गॅस भरताना व्हॅनला आग, पेट्रोल पंपावर धावपळ

हेही वाचा - पोलिसांऐवजी 'तिने'च केला तपास, आरोपी दीड वर्षांनंतर गजाआड

ठाणे - 'सीसीटीव्ही कॅमेर्‍याला बघून घाबरु नका; कॅमेरा बंद आहे', असे फलक लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे युवाध्यक्ष तथा नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांनी या बंद सीसीटीव्ही कॅमेर्‍यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन केले.

आंदोलक

ठाण्यासह मुंब्रा-कौसा-दिव्यातील स्थिती सारखीच

ठाणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने गाजावाजा करत महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत होते. ठाणे पालिका हद्दीमध्ये प्रभाग सुधारणा निधीतून 1 हजार 200, वायफाय योजनेतून 100 असे एकूण 1 हजार 300 कॅमेरे बसविले आहेत. तसेच यापूर्वी महापालिका आणि अन्य निधीतून 100 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय, तीनशे ते चारशे कॅमेरे आणखी बसविण्यात येणार होते. या कॅमेर्‍यांमुळे सोनसाखळी चोरी आणि रस्त्यावरील गुन्हेगारीला आळा बसेल, या उद्देशातून महापालिकेने ही योजना राबविली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत लावण्यात आलेल्या कॅमेर्‍यांपैकी ठाणे शहरातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक तर मुंब्रा-कौसा आणि दिव्यातील 100 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. या संदर्भात ठामपाच्या विद्युत विभागाशी संपर्क साधूनही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या शानू पठाण यांनी सोमवारी (दि. 30 नोव्हेंबर) सीसीटीव्ही लावलेल्या खांबांवर चढून 'सीसीटिव्ही कॅमेर्‍याला बघून घाबरु नका; कॅमेरा बंद आहे; ठाणे महापालिका सुस्त, ठेकेदार मस्त', असे फलक लावले.

कोट्यवधी रुपये पाण्यात

ठाणे महानगर पालिकेने मोठा गाजावाजा करुन हे सीसीटीव्ही बसविले होते. त्यासाठी नगरसेवक निधीतील 5 लाखांच्या रक्कमेचा वापर करुन सीसीटीव्हीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. हा खर्च आता पाण्यात गेलेला आहे. एकीकडे गुन्हे वाढू नये, अशी अपेक्षा करत असतानाच गुन्हेगारांना मोकळे सोडण्याचे हे धोरण आहे. राबोडीमधील हत्याकांडाची उकल करण्यासाठी याच सीसीटीव्हीचा वापर झाला आहे. तेथे कॅमेरे सुरू असल्याने आरोपींना पकडणे सोपे झाले होते. मुंब्रा-कौसा भागात सर्व कॅमेरे बंद असल्याने एखादा गुन्हा घडल्यास त्याचा छडा कसा लावणार? त्यामुळे येत्या आठ दिवसात जर ठाणे महापालिकेच्या विद्यूत विभागाने सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू केले नाहीत. तर बंदावस्थेतील हे कॅमेरे काढून ते विद्यूत विभागात फेकण्यात येतील, असा इशाराही यावेळी शानू पठाण यांनी दिला.

हेही वाचा - ठाण्यात गॅस भरताना व्हॅनला आग, पेट्रोल पंपावर धावपळ

हेही वाचा - पोलिसांऐवजी 'तिने'च केला तपास, आरोपी दीड वर्षांनंतर गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.