ETV Bharat / state

भिवंडीतील भाजी मंडई जलमय; नदीनाका परिसरातील असंख्य घरात पाणी

शहरातील नालेसफाई नीट झाली नाही. गटारांमधील गाळामुळे पावसाचे पाणी गटारी बाहेरून वाहत आहे. या गंभीर परिस्थितीला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप दुकानदार आणि नागरिकांनी केला आहे.

author img

By

Published : Jul 6, 2019, 12:38 PM IST

भिवंडीतील भाजी मंडई जलमय

ठाणे - शुक्रवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने भिवंडी जलमय झाली आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचले असून भाजी मंडई जलमय झाली आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे हाल होत आहे. परिणामी भाजी विक्रेत्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे.

भिवंडीतील भाजी मंडई जलमय

तीन बत्ती मार्केट, निजामपुरा, पद्मानगर, जैतून पुरा, मंगल बजार स्लॅब, कमला हॉटेल, कामत घर, बाला कंपाऊंड आणि नदीनाका परिसरातील बहुतांश दुकानांसह घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तसेच संपूर्ण भाजी मंडई जलमय झाली आहे.

शहरातील नालेसफाई नीट झाली नाही. गटारांमधील गाळामुळे पावसाचे पाणी गटारी बाहेरून वाहत आहे. या गंभीर परिस्थितीला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप दुकानदारांसह नागरिकांनी केला आहे.

भिवंडी महानगरपालिकेच्या सीमेलगत शेलार ग्रामपंचायत आहे. येथील नदीनाका परिसरात रात्रभर पडलेल्या पावसाने रफिक कंपाउंड येथील शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत.

ठाणे - शुक्रवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने भिवंडी जलमय झाली आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचले असून भाजी मंडई जलमय झाली आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे हाल होत आहे. परिणामी भाजी विक्रेत्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे.

भिवंडीतील भाजी मंडई जलमय

तीन बत्ती मार्केट, निजामपुरा, पद्मानगर, जैतून पुरा, मंगल बजार स्लॅब, कमला हॉटेल, कामत घर, बाला कंपाऊंड आणि नदीनाका परिसरातील बहुतांश दुकानांसह घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तसेच संपूर्ण भाजी मंडई जलमय झाली आहे.

शहरातील नालेसफाई नीट झाली नाही. गटारांमधील गाळामुळे पावसाचे पाणी गटारी बाहेरून वाहत आहे. या गंभीर परिस्थितीला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप दुकानदारांसह नागरिकांनी केला आहे.

भिवंडी महानगरपालिकेच्या सीमेलगत शेलार ग्रामपंचायत आहे. येथील नदीनाका परिसरात रात्रभर पडलेल्या पावसाने रफिक कंपाउंड येथील शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत.

Intro:किट नंबर 319
कल्याण


Body:भिवंडीतील भाजी मंडई जलमय ;तर नदीनाका परिसरातील असंख्य घरात शिरले पाणी

ठाणे :- रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने भिवंडी शहरातील असंख्य सखल भागात पाणी साचून जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे, यामध्ये भिवंडीतील भाजी मंडई , तीन बत्ती मार्केट, निजामपुरा पद्मानगर जैतून पुरा मंगल बजार स्लॅब, कमला हॉटेल, कामत घर, बाला कंपाऊंड, ईदगाहा परिसरातील बहुतांश दुकानांसह घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे, संपूर्ण भाजी मंडई जन्म झाल्याचे दिसून आले आहे यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे मोठे हाल होत असून भाजी विक्री त्यांचेही नुकसान होऊन आर्थिक फटका बसला आहे,

शहरातील नालेसफाई ही वर वरची झाली असून गटारांमधील गाळ काढला न गेल्याने मुसळधार पावसाचे पाणी गटारा बाहेरून वाहत असल्याने या गंभीर परिस्थितीला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप दुकानदारासह नागरिकांनी केला आहे,
दरम्यान भिवंडी महानगरपालिका सीमेवरून वाहणारे कामावर नदीलगत शेलार ग्रामपंचायत असून या नदीकिनारी नदी नाका या परिसरात रात्रभर पडलेल्या पावसाने रफिक कंपाउंड येथील शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने येथील रहिवाशांना पर्यायी निवास व्यवस्था नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे,
tha, bhiwandi ren 6.7.19


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.