ETV Bharat / state

विषारी रसायन पाण्यात सोडणाऱ्या ट्रक चालकासह साथीदारास अटक

author img

By

Published : Sep 10, 2019, 9:56 PM IST

केमिकलने भरलेला टँकर नाल्यात खाली करत असताना परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या घशाला खवखव व श्वसनाचा त्रास होऊ लागला. टायर कंपनीतून प्रक्रिया केलेले विषारी केमिकल ट्रकचालकाने शेलार येथील कामवारी नदीच्या नाल्यात सोडले. नदीचे प्रदूषण केल्याने ट्रकचालकासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीतील घटना

ठाणे- टायर कंपनीतून प्रक्रिया केलेले विषारी केमिकल ट्रकचालकाने शेलार (मीठपाडा) येथील कामवारी नदीच्या नाल्यात सोडले आहे. नदीचे प्रदूषण केल्याने ट्रकचालकासह त्याच्या साथीदारावर भिवंडी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना मंगळवारी दुपारी गजाआड केले आहे. चालक मोहम्मद अयुब खान (वय45) व त्याचा साथीदार चंद्रप्रकाश यादव (वय35) असे केमिकल प्रदूषण प्रकरणी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

ट्रक चालक मो. याकूब हा वाडा तालुक्यातील मौजे डाकिवली येथील सन रबर या टायर कंपनी व्यवस्थापनाच्या निर्देशाने गेल्या अनेक महिन्यांपासून टायरवर प्रक्रिया केलेले घातक केमिकल टँकरमध्ये भरून रात्रीच्या वेळेत ते मीठपाडा येथील नाल्यात सोडत होता. त्यासाठी पानपट्टी चालक चंद्रप्रकाश हा काही पैश्यांच्या मोबदल्यात त्याला मदत करत होता. मात्र काल रात्री केमिकलने भरलेला टँकर नाल्यात खाली करत असताना परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या घशाला खवखव व श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे नागरिकांनी या घटनेचा शोध घेतला असता मीठपाडा येथील तबेल्यालगतच्या नाल्यात घातक केमिकलने भरलेला टँकर खाली होत असल्याचे दिसून आले. भयभीत झालेल्या नागरिकांनी या घटनेची खबर तात्काळ भिवंडी तालुका पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन केमिकलने भरलेला टँकर ताब्यात घेऊन चालक मोहम्मद अयुब खान व त्याचा साथीदार चंद्रप्रकाश यादव यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे- टायर कंपनीतून प्रक्रिया केलेले विषारी केमिकल ट्रकचालकाने शेलार (मीठपाडा) येथील कामवारी नदीच्या नाल्यात सोडले आहे. नदीचे प्रदूषण केल्याने ट्रकचालकासह त्याच्या साथीदारावर भिवंडी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना मंगळवारी दुपारी गजाआड केले आहे. चालक मोहम्मद अयुब खान (वय45) व त्याचा साथीदार चंद्रप्रकाश यादव (वय35) असे केमिकल प्रदूषण प्रकरणी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

ट्रक चालक मो. याकूब हा वाडा तालुक्यातील मौजे डाकिवली येथील सन रबर या टायर कंपनी व्यवस्थापनाच्या निर्देशाने गेल्या अनेक महिन्यांपासून टायरवर प्रक्रिया केलेले घातक केमिकल टँकरमध्ये भरून रात्रीच्या वेळेत ते मीठपाडा येथील नाल्यात सोडत होता. त्यासाठी पानपट्टी चालक चंद्रप्रकाश हा काही पैश्यांच्या मोबदल्यात त्याला मदत करत होता. मात्र काल रात्री केमिकलने भरलेला टँकर नाल्यात खाली करत असताना परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या घशाला खवखव व श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे नागरिकांनी या घटनेचा शोध घेतला असता मीठपाडा येथील तबेल्यालगतच्या नाल्यात घातक केमिकलने भरलेला टँकर खाली होत असल्याचे दिसून आले. भयभीत झालेल्या नागरिकांनी या घटनेची खबर तात्काळ भिवंडी तालुका पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन केमिकलने भरलेला टँकर ताब्यात घेऊन चालक मोहम्मद अयुब खान व त्याचा साथीदार चंद्रप्रकाश यादव यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Intro:Body:विषारी केमिकल पाण्यात सोडणाऱ्या ट्रक चालक व साथीदारास अटक
ठाणे :- टायर कंपनीतून प्रक्रिया केलेले विषारी केमिकल शेलार (मीठपाडा ) येथील कामवारी नदीच्या नाल्यात सोडून प्रदूषण केल्याने ट्रकचालकासह त्याच्या साथीदारावर भिवंडी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना मंगळवारी दुपारी गजाआड केले आहे.चालक मोहम्मद अयुब खान ( ४५ रा. युपी ) व त्याचा साथीदार चंद्रप्रकाश यादव ( ३५ रा.खोणी ) असे केमिकल प्रदूषण प्रकरणी अटक केलेल्या दोघांची नांवे आहेत.

ट्रक चालक मो.याकूब हा वाडा तालुक्यातील मौजे डाकिवली येथील सन रबर या टायर कंपनी व्यवस्थापनाच्या निर्देशाने गेल्या अनेक महिन्यांपासून टायरवर प्रक्रिया केलेले घातक केमिकल टँकरमध्ये भरून ते मीठपाडा येथील नाल्यात रात्रीच्या वेळेत सोडत होता. त्यासाठी पानपट्टी चालक चंद्रप्रकाश हा काही पैश्यांच्या मोबदल्यात त्याला मदत करीत होता. मात्र काल रात्री केमिकलने भरलेला टँकर नाल्यात खाली करीत असताना परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या घशाला खवखव व श्वसनाला त्रास होऊ लागला. त्यामुळे नागरिकांनी या केमिकलयुक्त घटनेचा शोध घेतला असता मीठपाडा येथील तबेल्यालगतच्या नाल्यात घातक केमिकलने भरलेला टँकर खाली करीत असल्याचे दिसून आले. भयभीत झालेल्या नागरिकांनी या घटनेची खबर तात्काळ भिवंडी तालुका पोलिसांना दिली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन केमिकलने भरलेला टँकर ताब्यात घेऊन चालक मोहम्मद अयुब खान व त्याचा साथीदार चंद्रप्रकाश यादव यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भादंवि.कलम २६९ ,२७० व २७७ अन्वये गुन्हा दाखल करून या दोघानांही अटक केली आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.