ETV Bharat / state

लॉकडाऊन प्रभाव : गरिबांचा घास हिरवणाऱ्या रेशन दुकानाचा श्रमजीवीने केला पर्दाफाश

author img

By

Published : Apr 19, 2020, 8:57 PM IST

लॉकडाऊन काळात गरिबांवर उपासमार सुरू आहे. अशात अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. गावात सारिका लाटे यांचे सरकारी रेशनचे दुकान आहे. दुकानात 165 अंत्योदय लाभार्थी आहेत. प्रत्येकाला 1 ते 2 किलो तांदूळ आणि गहू कमी दिल्याचा आरोप आहे. मोफत लाभार्थ्यांपैकी अनेकांना 5 ते 10 किलो धान्य कमी दिले आहे. हे सर्व लाभार्थी गरीब, मजूर, आदिवासी स्थलांतरीत मजूर आहेत.

लॉकडाऊन प्रभाव : गरिबांचा घास हिरवणाऱ्या रेशन दुकानाचा श्रमजीवीने केला पर्दाफाश

ठाणे - टाळेबंदीच्या काळात अंत्योदय लाभार्थी तसेच गरिबांना मोफत धान्य मिळावे म्हणून शासनाने रेशन दुकानावर धान्य वाटपाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, काही रेशन दुकानदार लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्यात डल्ला मारून अपहार करीत आहे. असाच एक प्रकार भिवंडी तालुक्यातील वेढे पाडा गावात श्रमजीवी संघटनेने उघड केला आहे.

मागील आठवड्यात तालुक्यातील पालखणे आणि चाणे गावात दोन रास्त भाव दुकानदारावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तालुक्यातील वेढे पाडा या गावात देखील धान्य अपहार सुरू असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार संघटनेने भोंगळ कारभार उघड केला. लॉकडाऊन काळात गरिबांवर उपासमार सुरू आहे. अशात अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. गावात सारिका लाटे यांचे सरकारी रेशनचे दुकान आहे. दुकानात 165 अंत्योदय लाभार्थी आहेत. प्रत्येकाला 1 ते 2 किलो तांदूळ आणि गहू कमी दिल्याचा आरोप आहे. मोफत लाभार्थ्यांपैकी अनेकांना 5 ते 10 किलो धान्य कमी दिले आहे. हे सर्व लाभार्थी गरीब, मजूर, आदिवासी स्थलांतरीत मजूर आहेत.

आज पुरवठा अधिकारी पी आर पाटील यांनी गावात येऊन पंचनामा जबाब नोंदवले असून पुढील चौकशी सुरू आहे असे त्यांनी सांगितले. मात्र गुन्हे दाखल करण्याबाबत श्रमजीवी मात्र ठाम असल्याचे श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांनी सांगितले. श्रमजीवीच्या धाडीनंतर संघटनेने पंचनामा करून भिवंडीचे तहसीलदार आणि गणेशपुरी पोलिसांना याबाबत खबर देऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत पुराव्यानिशी मागणी केली आहे.भिवंडी तालुक्यातील रेशन घोटाळ्याबाबत श्रमजीवी संघटना चांगलीच आक्रमक झालेली आहे.

श्रमजीवी संघटना गरिबांना धान्याचा पुरवठा करत आहे तरीही काही दुकानदार अजूनही रेशनच्या नियमाप्रमाणे असलेल्या प्रमाणात धान्य न देता कमी धान्य देऊन गरिबांची फसगत करीत आहेत. आज श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार, कातकरी घटक प्रमुख जयेंद्र गावित, नारायण जोशी, जयेश पाटील, नावनाथ भोये, अमोल सवर, भूषण जाधव , जयदास भोईर, मुकेश जोशी इत्यादी कार्यकर्त्यांनी वेढेपाडा गावातील रेशन अपहाराचा पर्दाफाश केला.

ठाणे - टाळेबंदीच्या काळात अंत्योदय लाभार्थी तसेच गरिबांना मोफत धान्य मिळावे म्हणून शासनाने रेशन दुकानावर धान्य वाटपाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, काही रेशन दुकानदार लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्यात डल्ला मारून अपहार करीत आहे. असाच एक प्रकार भिवंडी तालुक्यातील वेढे पाडा गावात श्रमजीवी संघटनेने उघड केला आहे.

मागील आठवड्यात तालुक्यातील पालखणे आणि चाणे गावात दोन रास्त भाव दुकानदारावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तालुक्यातील वेढे पाडा या गावात देखील धान्य अपहार सुरू असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार संघटनेने भोंगळ कारभार उघड केला. लॉकडाऊन काळात गरिबांवर उपासमार सुरू आहे. अशात अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. गावात सारिका लाटे यांचे सरकारी रेशनचे दुकान आहे. दुकानात 165 अंत्योदय लाभार्थी आहेत. प्रत्येकाला 1 ते 2 किलो तांदूळ आणि गहू कमी दिल्याचा आरोप आहे. मोफत लाभार्थ्यांपैकी अनेकांना 5 ते 10 किलो धान्य कमी दिले आहे. हे सर्व लाभार्थी गरीब, मजूर, आदिवासी स्थलांतरीत मजूर आहेत.

आज पुरवठा अधिकारी पी आर पाटील यांनी गावात येऊन पंचनामा जबाब नोंदवले असून पुढील चौकशी सुरू आहे असे त्यांनी सांगितले. मात्र गुन्हे दाखल करण्याबाबत श्रमजीवी मात्र ठाम असल्याचे श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांनी सांगितले. श्रमजीवीच्या धाडीनंतर संघटनेने पंचनामा करून भिवंडीचे तहसीलदार आणि गणेशपुरी पोलिसांना याबाबत खबर देऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत पुराव्यानिशी मागणी केली आहे.भिवंडी तालुक्यातील रेशन घोटाळ्याबाबत श्रमजीवी संघटना चांगलीच आक्रमक झालेली आहे.

श्रमजीवी संघटना गरिबांना धान्याचा पुरवठा करत आहे तरीही काही दुकानदार अजूनही रेशनच्या नियमाप्रमाणे असलेल्या प्रमाणात धान्य न देता कमी धान्य देऊन गरिबांची फसगत करीत आहेत. आज श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार, कातकरी घटक प्रमुख जयेंद्र गावित, नारायण जोशी, जयेश पाटील, नावनाथ भोये, अमोल सवर, भूषण जाधव , जयदास भोईर, मुकेश जोशी इत्यादी कार्यकर्त्यांनी वेढेपाडा गावातील रेशन अपहाराचा पर्दाफाश केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.