ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवलीकरांना आठ तासांच्या नोकरीसाठी करावा लागतोय पाच तास प्रवास

author img

By

Published : Aug 11, 2020, 7:29 PM IST

लोकल रेल्वे सेवा बंद व सार्वजनिक वाहतूक मर्यादित असल्याने कल्याण-डोंबिवलीतून मुंबई, ठाणेकडे कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांसाठी महत्वाचा मानल्या जाणाऱ्या कल्याण-शीळ रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून विकास कामे सुरू आहेत. यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

traffic jam
traffic jam

कल्याण-डोंबिवली (ठाणे) - मुंबईची लाईफ लाईन म्हणजेच लोकल सेवा बंद, त्यातच सार्वजनिक वाहतुकीची मर्यादित साधने, कार्यालये, कारखाने सुरू झाल्याने रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. तसेच कल्याण, डोंबिवलीतून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ये-जा करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या कल्याण-शीळ रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून विकास कामे सुरू आहे. यामुळे वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत असून या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नोकरदारांना आठ तासांच्या नोकरीसाठी व पाच तासांचा प्रवास करावा लागत असल्याने नोकरदारवर्ग वैतागला आहे. यामुळे लवकरात लवकर लोकल सुरू करा, अशी मागणी जोर धरत आहे.

traffic jam
वाहतूक कोंडी

वर्षभरापासून राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे कल्याण-शीळ मार्गाच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याची कामे आधुनिक तंत्रज्ञान वापरून वेगाने पूर्ण केली जात असल्याचा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वारंवार करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. या रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल वाहतूक बंद असल्याने कल्याण-डोंबिवलीतून मुंबई-ठाण्यातील कार्यालयात जाणारे कर्मचारी सध्या खासगी वाहनाने या रस्त्याचा वापर करत कार्यालय गाठत आहेत. त्यामुळे रोज सकाळ आणि सायंकाळच्या वेळी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.

वर्षभरापासून सुरू असलेल्या कामामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी अरुंद झाला आहे. त्याचबरोबर कामासाठी काही ठिकाणी दुभाजक टाकण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी झालेल्या अर्धवट कामांमुळे हा रस्ता उंच सखल झाला आहे. त्यातच पावसामुळे या रस्त्यावर खूप खड्डे पडले असून रस्त्यावरील डांबरही वाहून गेले आहे. त्यामुळे टाळेबंदी शिथिल झाल्यापासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या वाहतूक कोंडीमुळे २० ते ३० मिनिटांच्या प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या मार्गावर चार ते पाच तास या कोंडीत अडकून पडावे लागते.

वाहतूक पोलिसांवर अतिरिक्त ताण

रस्त्याचे काम आणि पावसामुळे पडलेले खड्डे यामुळे होत असलेली वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांवरही अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे या ठिकाणाची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती शीळ-डायघर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश लंबाते यांनी दिली. तसेच या मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचेही लंबाते यांनी सांगितले.

आठ दिवसांच्या आत कल्याण-शीळ रस्त्यावरील खड्डे भरण्याची ताकीद

कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, कल्याण-शीळ मार्गावर होत असलेली वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नुकतीच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली आहे. या बैठकीत त्यांना आठ दिवसांच्या आत कल्याण-शीळ रस्त्यावरील खड्डे भरण्याची ताकीद देण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली (ठाणे) - मुंबईची लाईफ लाईन म्हणजेच लोकल सेवा बंद, त्यातच सार्वजनिक वाहतुकीची मर्यादित साधने, कार्यालये, कारखाने सुरू झाल्याने रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. तसेच कल्याण, डोंबिवलीतून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ये-जा करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या कल्याण-शीळ रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून विकास कामे सुरू आहे. यामुळे वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत असून या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नोकरदारांना आठ तासांच्या नोकरीसाठी व पाच तासांचा प्रवास करावा लागत असल्याने नोकरदारवर्ग वैतागला आहे. यामुळे लवकरात लवकर लोकल सुरू करा, अशी मागणी जोर धरत आहे.

traffic jam
वाहतूक कोंडी

वर्षभरापासून राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे कल्याण-शीळ मार्गाच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याची कामे आधुनिक तंत्रज्ञान वापरून वेगाने पूर्ण केली जात असल्याचा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वारंवार करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. या रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल वाहतूक बंद असल्याने कल्याण-डोंबिवलीतून मुंबई-ठाण्यातील कार्यालयात जाणारे कर्मचारी सध्या खासगी वाहनाने या रस्त्याचा वापर करत कार्यालय गाठत आहेत. त्यामुळे रोज सकाळ आणि सायंकाळच्या वेळी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.

वर्षभरापासून सुरू असलेल्या कामामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी अरुंद झाला आहे. त्याचबरोबर कामासाठी काही ठिकाणी दुभाजक टाकण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी झालेल्या अर्धवट कामांमुळे हा रस्ता उंच सखल झाला आहे. त्यातच पावसामुळे या रस्त्यावर खूप खड्डे पडले असून रस्त्यावरील डांबरही वाहून गेले आहे. त्यामुळे टाळेबंदी शिथिल झाल्यापासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या वाहतूक कोंडीमुळे २० ते ३० मिनिटांच्या प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या मार्गावर चार ते पाच तास या कोंडीत अडकून पडावे लागते.

वाहतूक पोलिसांवर अतिरिक्त ताण

रस्त्याचे काम आणि पावसामुळे पडलेले खड्डे यामुळे होत असलेली वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांवरही अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे या ठिकाणाची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती शीळ-डायघर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश लंबाते यांनी दिली. तसेच या मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचेही लंबाते यांनी सांगितले.

आठ दिवसांच्या आत कल्याण-शीळ रस्त्यावरील खड्डे भरण्याची ताकीद

कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, कल्याण-शीळ मार्गावर होत असलेली वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नुकतीच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली आहे. या बैठकीत त्यांना आठ दिवसांच्या आत कल्याण-शीळ रस्त्यावरील खड्डे भरण्याची ताकीद देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.