ETV Bharat / state

नाही, नाही म्हणता कल्याण शहरासह ग्रामीणमध्येही बर्ड फ्ल्यूचा शिरकाव

गेल्या आठवड्याभरात कल्याण-डोंबिवली परिसरात विविध ठिकाणी कावळे, कबुतरे, कोंबड्या, 2 बगळे आदी 7 - 8 पक्षी मृतावस्थेत आढळून आले होते. या सर्व मृत पक्ष्यांचे नमूने पशुसंवर्धन विभागातर्फे पुण्यातील पशुवैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते. त्यातील 2 पक्ष्यांचे नमुने बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. नरेश बांगर यांनी दिली आहे.

author img

By

Published : Jan 20, 2021, 12:24 PM IST

कल्याण बर्ड फ्ल्यू न्यूज
कल्याण बर्ड फ्ल्यू न्यूज

ठाणे - 'बर्ड फ्ल्यू'ने देशासह राज्यातही मोठ्या प्रमाणात विविध शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याच्या घटना समोर येत आहेत. आता त्यात भर पडली ती कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अटाळी आणि कल्याण तालुक्यातील रायत्या गावाची. या दोन्ही ठिकाणी मृत पावलेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पशुसंवर्धनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली असून पुढील खबरदारीच्या उपाययोजना विभागाकडून केल्या जात आहेत.

कल्याण शहरासह ग्रामीणमध्येही बर्ड फ्ल्यूचा शिरकाव
पक्ष्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचे नमुने पॉझिटिव्ह

गेल्या आठवड्याभरात कल्याण-डोंबिवली परिसरात विविध ठिकाणी कावळे, कबुतरे, कोंबड्या, 2 बगळे आदी 7 - 8 पक्षी मृतावस्थेत आढळून आले होते. या सर्व मृत पक्ष्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागातर्फे पुण्यातील पशुवैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते. त्यातील 2 पक्ष्यांचे नमुने बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. नरेश बांगर यांनी दिली आहे. तर, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अटाळी गावातील एका घरात काही पाळीव कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. रायते गावात असणाऱ्या पोल्ट्री फार्ममध्येही ब्रॉयलर कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर या दोन्ही ठिकाणांच्या मृत कोंबड्यांचे नमुने पुण्यातील पशुवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांचे अहवाल नुकतेच पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले असून पशुसंवर्धन विभागानेही तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

हेही वाचा - कचरा संकलनाचे वादग्रस्त कंत्राट; मनपाच्या आमसभेत पप्पू देशमुख-राहुल पावडे यांच्यात खडाजंगी


3 ते 4 महिने कोंबड्या पाळण्यावर बंदी

बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रायता आणि अटाळी गावातील या दोन्ही ठिकाणी 1 किलोमीटर परिघात असणाऱ्या पोल्ट्री फार्ममधील किंवा घरगुती पाळीव अशा सर्व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शास्त्रोक्त पद्धतीने कोंबड्यांना मारून निर्मनुष्य जागी पुरणार असल्याचेही डॉ. बांगर यांनी सांगितले. तसेच, या दोन्ही ठिकाणी पुढील 3 ते 4 महिने कोंबड्या पाळण्यावर बंदी असणार आहे.

आठवड्यापूर्वीच चिकनच्या दरासह मागणी घटली

बर्ड फ्ल्यूपासून माणसांना संसर्ग होण्याचा धोका आपल्याकडे अत्यंत कमी असून 70 डिग्रीवर शिजवलेले चिकन किंवा अंडी खाण्यास कोणतीही भीती नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पशुसंवर्धन विभागाने एकीकडे योग्य तापमानावर शिजवून चिकन खाण्यास कोणताही धोका नसल्याचे सांगितले असले. तरीही एक आठवड्यापूर्वीपासूनच येथे चिकनचे दर आणि त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. अशातच, आता बर्ड फ्ल्यूचा कल्याणात शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर यामध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांची तसेच केडीएमसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली.

हेही वाचा - जीवावर बेतेल म्हणून.. सायन रुग्णालयातून ८ जणांना लस न देता पाठवले घरी

ठाणे - 'बर्ड फ्ल्यू'ने देशासह राज्यातही मोठ्या प्रमाणात विविध शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याच्या घटना समोर येत आहेत. आता त्यात भर पडली ती कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अटाळी आणि कल्याण तालुक्यातील रायत्या गावाची. या दोन्ही ठिकाणी मृत पावलेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पशुसंवर्धनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली असून पुढील खबरदारीच्या उपाययोजना विभागाकडून केल्या जात आहेत.

कल्याण शहरासह ग्रामीणमध्येही बर्ड फ्ल्यूचा शिरकाव
पक्ष्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचे नमुने पॉझिटिव्ह

गेल्या आठवड्याभरात कल्याण-डोंबिवली परिसरात विविध ठिकाणी कावळे, कबुतरे, कोंबड्या, 2 बगळे आदी 7 - 8 पक्षी मृतावस्थेत आढळून आले होते. या सर्व मृत पक्ष्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागातर्फे पुण्यातील पशुवैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते. त्यातील 2 पक्ष्यांचे नमुने बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. नरेश बांगर यांनी दिली आहे. तर, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अटाळी गावातील एका घरात काही पाळीव कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. रायते गावात असणाऱ्या पोल्ट्री फार्ममध्येही ब्रॉयलर कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर या दोन्ही ठिकाणांच्या मृत कोंबड्यांचे नमुने पुण्यातील पशुवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांचे अहवाल नुकतेच पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले असून पशुसंवर्धन विभागानेही तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

हेही वाचा - कचरा संकलनाचे वादग्रस्त कंत्राट; मनपाच्या आमसभेत पप्पू देशमुख-राहुल पावडे यांच्यात खडाजंगी


3 ते 4 महिने कोंबड्या पाळण्यावर बंदी

बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रायता आणि अटाळी गावातील या दोन्ही ठिकाणी 1 किलोमीटर परिघात असणाऱ्या पोल्ट्री फार्ममधील किंवा घरगुती पाळीव अशा सर्व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शास्त्रोक्त पद्धतीने कोंबड्यांना मारून निर्मनुष्य जागी पुरणार असल्याचेही डॉ. बांगर यांनी सांगितले. तसेच, या दोन्ही ठिकाणी पुढील 3 ते 4 महिने कोंबड्या पाळण्यावर बंदी असणार आहे.

आठवड्यापूर्वीच चिकनच्या दरासह मागणी घटली

बर्ड फ्ल्यूपासून माणसांना संसर्ग होण्याचा धोका आपल्याकडे अत्यंत कमी असून 70 डिग्रीवर शिजवलेले चिकन किंवा अंडी खाण्यास कोणतीही भीती नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पशुसंवर्धन विभागाने एकीकडे योग्य तापमानावर शिजवून चिकन खाण्यास कोणताही धोका नसल्याचे सांगितले असले. तरीही एक आठवड्यापूर्वीपासूनच येथे चिकनचे दर आणि त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. अशातच, आता बर्ड फ्ल्यूचा कल्याणात शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर यामध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांची तसेच केडीएमसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली.

हेही वाचा - जीवावर बेतेल म्हणून.. सायन रुग्णालयातून ८ जणांना लस न देता पाठवले घरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.