ETV Bharat / state

बदलापूर पूरस्थितीनंतर आजही जनजीवन विस्कळीत; रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर-अंबरनाथ येथे शनिवारी पावसाने हाहाकार माजवल्यानंतर आज पावसाचा जोर कमी झाला असून शनिवारच्या पूरस्थिती दृश्यानंतर आज पाणी ओसरले आहे. मात्र, तरीही कल्याण-डोंबिवलीत जनजीवन अजूनही विस्कळीत आहे.

author img

By

Published : Jul 28, 2019, 1:40 PM IST

मार्केटमधील दुकानांचे नुकसान झाले

ठाणे - जिल्ह्यातील बदलापूर-अंबरनाथ येथे शनिवारी पावसाने हाहाकार माजवल्यानंतर आज पावसाचा जोर कमी झाला असून शनिवारच्या पूरस्थितीनंतर आज पाणी ओसरले आहे. मात्र, तरीही कल्याण-डोंबिवलीत जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. शनिवारी माजलेल्या पावसाच्या हाहाकारानंतर अनेकांच्या घरांमध्ये आणि दुकानात अक्षरशः चिखल झाला आहे. त्यामुळे आपली कामे सोडून आता घराची डागडुजी आणि साफसफाई करण्याचे काम कल्याण-डोंबिवलीकरांना करावे लागत आहे.

बदलापूर पूरस्थितीनंतर आजही जनजीवन विस्कळीत; रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

बदलापूरमध्ये झालेल्या पूरस्थितीमुळे आजूबाजूच्या गावांना आणि कल्याण-डोंबिवली शहराला देखील याचा मोठा फटका बसला. विजांचा कडकडाट आणि पावसाचा मारा इतका प्रचंड होता की, सगळे नागरिक भयभीत झाले होते. पाऊस सुरू होताच ओढ्यांना आलेला पाण्याचा मोठा लोंढा अनेक गावांत शिरला. यामध्ये बहुतेकांची घरे जलमय झाली. तर काहींच्या घरात तब्बल साडेपाच फूट पाणी साठले होते. अनेकांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू ओढ्यांना आलेल्या पुरात वाहून गेल्या आहेत. तसेच मार्केटमधील दुकानांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड होऊन चिखल साचला आहे. तर लोकांना रात्र रस्त्यावर जागून काढावी लागली.

शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे कल्याणच्या पुढील रेल्वे वाहतुक ठप्प झाली होती. ही परिस्थिती शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कायम होती. म्हणून मध्य रेल्वेकडून रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड अपडाऊन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ठाणे - जिल्ह्यातील बदलापूर-अंबरनाथ येथे शनिवारी पावसाने हाहाकार माजवल्यानंतर आज पावसाचा जोर कमी झाला असून शनिवारच्या पूरस्थितीनंतर आज पाणी ओसरले आहे. मात्र, तरीही कल्याण-डोंबिवलीत जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. शनिवारी माजलेल्या पावसाच्या हाहाकारानंतर अनेकांच्या घरांमध्ये आणि दुकानात अक्षरशः चिखल झाला आहे. त्यामुळे आपली कामे सोडून आता घराची डागडुजी आणि साफसफाई करण्याचे काम कल्याण-डोंबिवलीकरांना करावे लागत आहे.

बदलापूर पूरस्थितीनंतर आजही जनजीवन विस्कळीत; रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

बदलापूरमध्ये झालेल्या पूरस्थितीमुळे आजूबाजूच्या गावांना आणि कल्याण-डोंबिवली शहराला देखील याचा मोठा फटका बसला. विजांचा कडकडाट आणि पावसाचा मारा इतका प्रचंड होता की, सगळे नागरिक भयभीत झाले होते. पाऊस सुरू होताच ओढ्यांना आलेला पाण्याचा मोठा लोंढा अनेक गावांत शिरला. यामध्ये बहुतेकांची घरे जलमय झाली. तर काहींच्या घरात तब्बल साडेपाच फूट पाणी साठले होते. अनेकांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू ओढ्यांना आलेल्या पुरात वाहून गेल्या आहेत. तसेच मार्केटमधील दुकानांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड होऊन चिखल साचला आहे. तर लोकांना रात्र रस्त्यावर जागून काढावी लागली.

शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे कल्याणच्या पुढील रेल्वे वाहतुक ठप्प झाली होती. ही परिस्थिती शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कायम होती. म्हणून मध्य रेल्वेकडून रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड अपडाऊन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Intro:सोबत व्हिडीओ जोडला आहे
कल्याण


बदलापूर-अंबरनाथ येथे कालचा पावसाचा हाहा:कार अनुभवल्या नंतर आज पावसाचा जोर कमी झाला. परंतु कालच्या पूरस्थिती दृश्यानंतर आज पाणी ओसरले जरी असले तरी कल्याण डोंबिवलीत जनजीवन अजूनही रुळांवर आलं नाही. कालच्या हाहाकार नंतर अनेकांच्या घराघरात आणि दुकानात अक्षरशः चिखल झाला आहे. आपली कामे सोडून आता घराची डागडुजी व साफसफाई करण्याचे काम कल्याण डोंबिवलीकरांना करावे लागत आहे.Body:बदलापूरमध्ये झालेल्या पूरस्थितीमुळे आजूबाजूच्या गावांना आणि कल्याण डोंबिवली शहराला देखील याचा मोठा फटका बसला. विजांचा कडकडाट आणि पावसाचा मारा इतका प्रचंड होता की, सगळे नागरिक भयभित झाले होते. पाऊस सुरू होताच ओढ्यांना आलेला पाण्याचा मोठा लोंढा अनेक गावांत शिरला. बहुतेकांची घरे जलमय झाली. काहींच्या घरात तब्बल साडेपाच फूट पाणी साठले होते. अनेकांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू ओढ्यांना आलेल्या पुरात वाहून गेल्या. मार्केटमधील दुकानाचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात पडझड होऊन चिखल साचला. लोकांना रात्र रस्त्यावर जागून काढावी लागली.

कालच्या अनुभवानंतर आजही मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल सुरू होते. परंतु आता मध्य आणि हार्बर दोन्ही रेल्वे मार्गावर ब्लॉक रद्द करण्यात आलाय. तर पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड अपडाऊन ब्लॉक घेण्यात येणार आहे. Conclusion:
शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे कल्याणच्या पुढील रेल्वे वाहतुक ठप्प झाली होती. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत परिस्थिती कायम होती. म्हणुन मध्य रेल्वेकडून रविवारचा मेगाब्लाॅक रद्द करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.