ETV Bharat / state

कल्याण डोंबिवली महापालिकेतील १३ नगरसेवकांचे पद रद्द

author img

By

Published : Jul 31, 2020, 12:40 AM IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने एकीकडे घेतला आहे. त्यातच आता या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे.

Kalyan‑Dombivli Municipal Corporation
कल्याण डोंबिवली महानगरपालिका

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने एकीकडे घेतला आहे. त्यातच आता या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने यासंदर्भात सादर केलेल्या अहवालावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमधील १८ गावे राज्य सरकारकडून काही दिवसापूर्वीच वगळण्यात आली आहेत. यामध्ये कल्याण ग्रामीण मधील घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदिवली तर अंबरनाथ तालुक्यातील आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांचा समावेश आहे. तर डोंबिवलीतील आजदे, सागाव, नांदीवली पंचानंद, घारीवली, संदप, उसरघर, काटई, भोपर, देसलेपाडा ही गावे महापालिका हद्दीत ठेवली आहेत. त्यातच महापालिकेतील नगरसेवकांचे सदस्यत्व ११ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे.

हेही वाचा - अयोध्या राम मंदिराचे भूमीपूजन, मुस्लीम महिलांनी रामलल्लासाठी बनवल्या राख्या

या २७ गावातील १८ गावे महापालिकेतून वगळण्यात आल्याने या गावातील नगरसेवकांचे पद रद्द करा, असा अहवाल महापालिकेच्या निवडणूक विभागाने सूर्यवंशी यांना पाठवला होता. त्याला आयुक्तांनी मान्यता दिल्याने मुदत संपण्यापूर्वीच तेथील नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे.

त्यामुळे मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, सोनी अहीरे, उर्मिला गोसावी, कुणाल पाटील, प्रमिला पाटील, प्रभाकर जाधव, दमयंती वझे जालिंदर पाटील, इंदिरा तरे, विमल भोईर, शैलजा भोईर, सुनिता खंडागळे या १३ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. नगरसेवकपद रद्द करण्याच्या कार्यवाहीवर संबंधित नगरसेवक काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. तर नगरसेवक पद रद्द झालेल्यांमध्ये सर्वाधिक भाजपच्या नगरसेवकांचा समावेश आहे.

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने एकीकडे घेतला आहे. त्यातच आता या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने यासंदर्भात सादर केलेल्या अहवालावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमधील १८ गावे राज्य सरकारकडून काही दिवसापूर्वीच वगळण्यात आली आहेत. यामध्ये कल्याण ग्रामीण मधील घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदिवली तर अंबरनाथ तालुक्यातील आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांचा समावेश आहे. तर डोंबिवलीतील आजदे, सागाव, नांदीवली पंचानंद, घारीवली, संदप, उसरघर, काटई, भोपर, देसलेपाडा ही गावे महापालिका हद्दीत ठेवली आहेत. त्यातच महापालिकेतील नगरसेवकांचे सदस्यत्व ११ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे.

हेही वाचा - अयोध्या राम मंदिराचे भूमीपूजन, मुस्लीम महिलांनी रामलल्लासाठी बनवल्या राख्या

या २७ गावातील १८ गावे महापालिकेतून वगळण्यात आल्याने या गावातील नगरसेवकांचे पद रद्द करा, असा अहवाल महापालिकेच्या निवडणूक विभागाने सूर्यवंशी यांना पाठवला होता. त्याला आयुक्तांनी मान्यता दिल्याने मुदत संपण्यापूर्वीच तेथील नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे.

त्यामुळे मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, सोनी अहीरे, उर्मिला गोसावी, कुणाल पाटील, प्रमिला पाटील, प्रभाकर जाधव, दमयंती वझे जालिंदर पाटील, इंदिरा तरे, विमल भोईर, शैलजा भोईर, सुनिता खंडागळे या १३ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. नगरसेवकपद रद्द करण्याच्या कार्यवाहीवर संबंधित नगरसेवक काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. तर नगरसेवक पद रद्द झालेल्यांमध्ये सर्वाधिक भाजपच्या नगरसेवकांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.