ETV Bharat / state

Kalwa Hospital Update : कळवा रुग्णालय रुग्ण मृत्यू प्रकरणातील चौकशी समितीचा अहवाल लांबला, सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 11:03 PM IST

Kalwa Hospital Update : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतरही या रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू होतच आहेत. याप्रकरणावर चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केली होती. या समितीला पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, एक महिना उलटूनही या समितीकडून अहवाल सादर करण्यात आला नाही, यामुळे सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झालेत.

कळवा रुग्णालय रुग्ण मृत्यू प्रकरणातील चौकशी समितीचा अहवाल लांबला
Kalwa Hospital Update
महेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते

ठाणे Kalwa Hospital Update : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला एक महिना उलटला आहे. मात्र अद्यापही समितीचा चौकशीचा अहवाल अजूनही समोर आलेला नाही. हा अहवाल अंतिम टप्प्यात असून अधिकारी कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यानं सदरचा अहवाल समोर येण्यास विलंब होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीयं. यामुळं पंधरा दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मात्र तिलांजली मिळालीय. (kalwa Hospital Update)


मुख्यमंत्र्यांकडून चौकशीसाठी समितीची नियुक्ती : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. हे रुग्णालय नेहमीच चुकीच्या कारणांमुळे चर्चेचा विषय बनत असतं. परंतु, ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यातच या रुग्णालयात सोमवारी चार आणि मंगळवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णंच्या नातेवाईकांमध्ये घबराट पसरली होती. माध्यमांमध्ये ही बातमी येताच सर्वच राजकीय पक्षांनी रुग्णालय प्रशासन आणि कर्मचारी वर्गाला चांगलंच धारेवर धरलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रुग्णालयात जाऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यासंदर्भात चौकशीसाठी समितीही नियुक्त केली. या समितीनं संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन पंधरा दिवसांत अहवाल सादर करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, आता एक महिना उलटूनही या समितीकडून अहवाल सादर करण्यात आला नाही. यामुळे अधिकारी व राजकीय मंडळींना या घटनेचं गांभीर्य नसल्याचं स्पष्ट दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार 25 ऑगस्टपर्यंत चौकशी अहवाल समोर येणं अपेक्षित होतं. त्याआधारे पुढील कारवाई करण्यात येणार होती. परंतू, आता 25 ऑगस्टनंतर या समितीला दहा दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आला होता. ते दहा दिवस उलटूनही चौकशी समितीचा अहवाल समोर येण्याची चिन्हं दिसत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात आलंय.

चौकशी समितीत जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिकेचे आयुक्त : सध्या राज्यातील सर्वच आरोग्य यंत्रणा केंद्राच्या 'आयुष्यमान भारत' या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त आहेत. समितीतील अधिकारीही त्यातच व्यस्त असल्यानं अहवाल येण्यास विलंब होत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयामध्ये झालेल्या या 28 मृत्यूच्या चौकशी साठी मोठी समिती गठित करण्यात आली होती. यात महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, सिव्हील सर्जन यांच्यासह अनेकांचा समावेश होता. मात्र, या प्रकरणावर बोलण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त तयार नाहीत. समितीच्या एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर याची चौकशी अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.



ठाणेकरांना वाली नाही : दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी ठाणेकरांना कोणी वाली उरला नाही. तसंच कळवा रुग्णालय हे मृत्यूचा सापळा झालंय, अशी गंभीर टीका केलीय. ठाणे महानगरपालिका एका आयएएस अधिकाऱ्याच्या हातात असून ही व्यवस्थित सांभाळता येत नसेल, तर ही मोठी शोकांतिका असल्याचं आव्हाडांनी सांगितलंय. या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना अनेकदा फोन करून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं नाही. कळवा रुग्णालयात मृत्यू सुरुच असून मागील आठवड्यातही जवळपास दहा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

हेही वाचा :

  1. Chhatrapati Shivaji Maharaj Hospital : कळवा रुग्णालयाच्या शवागारातून रुग्णाचा मृतदेह हरवला... प्रशासनाकडून शोध सुरुच!
  2. Kalwa Hospital Patients Death : कळवा रुग्णालयात आणखी चौघांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिली रुग्णालयाला भेट
  3. Kalwa Hospital : मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या रुग्णालयातच मुलाच्या उपचारासाठी वयोवृद्ध आईची वणवण

महेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते

ठाणे Kalwa Hospital Update : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला एक महिना उलटला आहे. मात्र अद्यापही समितीचा चौकशीचा अहवाल अजूनही समोर आलेला नाही. हा अहवाल अंतिम टप्प्यात असून अधिकारी कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यानं सदरचा अहवाल समोर येण्यास विलंब होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीयं. यामुळं पंधरा दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मात्र तिलांजली मिळालीय. (kalwa Hospital Update)


मुख्यमंत्र्यांकडून चौकशीसाठी समितीची नियुक्ती : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. हे रुग्णालय नेहमीच चुकीच्या कारणांमुळे चर्चेचा विषय बनत असतं. परंतु, ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यातच या रुग्णालयात सोमवारी चार आणि मंगळवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णंच्या नातेवाईकांमध्ये घबराट पसरली होती. माध्यमांमध्ये ही बातमी येताच सर्वच राजकीय पक्षांनी रुग्णालय प्रशासन आणि कर्मचारी वर्गाला चांगलंच धारेवर धरलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रुग्णालयात जाऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यासंदर्भात चौकशीसाठी समितीही नियुक्त केली. या समितीनं संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन पंधरा दिवसांत अहवाल सादर करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, आता एक महिना उलटूनही या समितीकडून अहवाल सादर करण्यात आला नाही. यामुळे अधिकारी व राजकीय मंडळींना या घटनेचं गांभीर्य नसल्याचं स्पष्ट दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार 25 ऑगस्टपर्यंत चौकशी अहवाल समोर येणं अपेक्षित होतं. त्याआधारे पुढील कारवाई करण्यात येणार होती. परंतू, आता 25 ऑगस्टनंतर या समितीला दहा दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आला होता. ते दहा दिवस उलटूनही चौकशी समितीचा अहवाल समोर येण्याची चिन्हं दिसत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात आलंय.

चौकशी समितीत जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिकेचे आयुक्त : सध्या राज्यातील सर्वच आरोग्य यंत्रणा केंद्राच्या 'आयुष्यमान भारत' या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त आहेत. समितीतील अधिकारीही त्यातच व्यस्त असल्यानं अहवाल येण्यास विलंब होत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयामध्ये झालेल्या या 28 मृत्यूच्या चौकशी साठी मोठी समिती गठित करण्यात आली होती. यात महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, सिव्हील सर्जन यांच्यासह अनेकांचा समावेश होता. मात्र, या प्रकरणावर बोलण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त तयार नाहीत. समितीच्या एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर याची चौकशी अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.



ठाणेकरांना वाली नाही : दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी ठाणेकरांना कोणी वाली उरला नाही. तसंच कळवा रुग्णालय हे मृत्यूचा सापळा झालंय, अशी गंभीर टीका केलीय. ठाणे महानगरपालिका एका आयएएस अधिकाऱ्याच्या हातात असून ही व्यवस्थित सांभाळता येत नसेल, तर ही मोठी शोकांतिका असल्याचं आव्हाडांनी सांगितलंय. या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना अनेकदा फोन करून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं नाही. कळवा रुग्णालयात मृत्यू सुरुच असून मागील आठवड्यातही जवळपास दहा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

हेही वाचा :

  1. Chhatrapati Shivaji Maharaj Hospital : कळवा रुग्णालयाच्या शवागारातून रुग्णाचा मृतदेह हरवला... प्रशासनाकडून शोध सुरुच!
  2. Kalwa Hospital Patients Death : कळवा रुग्णालयात आणखी चौघांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिली रुग्णालयाला भेट
  3. Kalwa Hospital : मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या रुग्णालयातच मुलाच्या उपचारासाठी वयोवृद्ध आईची वणवण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.