ETV Bharat / state

'तुमचे बापजादे गुरुकुलात शिकत होते, त्यावेळी आमचे बापजादे मैला उचलत होते'

author img

By

Published : Sep 17, 2019, 6:28 PM IST

देशात आरक्षण नसावे, हा आरएसएसचा अजेंडा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नामदेव ढसाळ यांच्या सारख्यांवर बापजाद्यांची पुण्याई नव्हती. कारण जेव्हा तुम्ही शाळेत शिकत होता, तेव्हा आमचे बापजादे गुरे-ढोर राखत मैला उचलत होते, अशा शब्दात आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी नितीन गडकरींच्या आरक्षण मुद्द्यांवर सडकून टीका केली.

जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

ठाणे - पळपुटे कोण? या सामना लेखावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत. शरद पवार हे राजकारणातले भीष्म आहेत. कारण, गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातील राजकारण शरद पवारांच्या भोवती फिरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, विरोधक, बाळासाहेबांनंतरची पिढी शरद पवारांवर टीका करत आहे, असा टोला आव्हाडांनी लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा - भाजपच्या 240 पेक्षा जास्त जागा येतील - गिरिश महाजन

तर नितीन गडकरी सारखे आरक्षणा बद्दल का? बोलतात नेमकं त्यामागे काय आहे माहित नाही. पण, देशात आरक्षण नसावे, हा आरएसएसचा अजेंडा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नामदेव ढसाळ यांच्या सारख्यांवर बापजाद्यांची पुण्याई नव्हती. कारण जेव्हा तुम्ही शाळेत शिकत होता, तेव्हा आमचे बापजादे गुरे-ढोर राखत मैला उचलत होते. आम्हाला म्हणजे मागासवर्गीय समाजाला अक्षर ओळख व्हायला 5 हजार वर्षे लागली. गेली कित्येक वर्षे देशांतील 80 टक्के मागासवर्गीय समाज गावकुसा बाहेर ठेवला गेला होता. याचा विचार कधी तरी करा, अशा शब्दात आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी नितीन गडकरींच्या आरक्षण मुद्दयांवर सडकून टिका केली.

जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा - ठाण्यातील मराठी-गुजराथी वाद : पाच दिवसानंतर परस्परविरोधी मारहाणीचा गुन्हा दाखल

'जे राष्ट्रवादी पक्ष सोडून गेले त्यांनी आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवला' अशी टीका शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर केली होती, यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये जळजळीत टीका करण्यात आली होती. जे आज राष्ट्रवादीमधून बाहेर पडले ते तुमचे कधी नव्हतेच व ते इतर पक्षातून फुटूनच आले होते. ते कसे चालले व स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे पवार देखील सोनिया गांधींच्या काँग्रेसमधूनच बाहेर पडले होते ना? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून केला गेला होता.

इतिहास काढायचा झाला तर आम्हाला काढता येतो. 1977 चा इतिहास काढला तर सर्वांनाच त्रास होईल. पण, जखमेवरची खपली काढायची नसते. इतिहासाचे दाखले द्यायचे झाले तर अनेक रक्तवाहिन्या भळा-भळा वाहतील. स्वाभीमानाच्या गोष्टी कोणीही करायच्या नसतात शरद पवारांचा स्वाभिमान इंदिरा गांधी, मुरली देवरा, मनोहर जोशी, सुधीर जोशी यांना माहिती होता, या शब्दात आव्हाडांनी सामनातील लेखावर टिका केली.

हेही वाचा - अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात जागावाटपावरून युतीत रस्सीखेच

गेली 5 दशके अनेक नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करूनच मोठे झाले आहेत. अनेकांनी आपली बुडणारी राजकीय कारकीर्द एकट्या पवार साहेबांवर टीका करून सावरली. तरीही साहेब आपल्या जागी अढळ आहेत, असे खरमरीत उत्तर आव्हाड यांनी सामना मधील टीकेला दिले.

हेही वाचा - भिवंडीत कपड्यांच्या गोदामांना भीषण आग; चार गोदामे जळून खाक

ठाणे - पळपुटे कोण? या सामना लेखावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत. शरद पवार हे राजकारणातले भीष्म आहेत. कारण, गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातील राजकारण शरद पवारांच्या भोवती फिरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, विरोधक, बाळासाहेबांनंतरची पिढी शरद पवारांवर टीका करत आहे, असा टोला आव्हाडांनी लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा - भाजपच्या 240 पेक्षा जास्त जागा येतील - गिरिश महाजन

तर नितीन गडकरी सारखे आरक्षणा बद्दल का? बोलतात नेमकं त्यामागे काय आहे माहित नाही. पण, देशात आरक्षण नसावे, हा आरएसएसचा अजेंडा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नामदेव ढसाळ यांच्या सारख्यांवर बापजाद्यांची पुण्याई नव्हती. कारण जेव्हा तुम्ही शाळेत शिकत होता, तेव्हा आमचे बापजादे गुरे-ढोर राखत मैला उचलत होते. आम्हाला म्हणजे मागासवर्गीय समाजाला अक्षर ओळख व्हायला 5 हजार वर्षे लागली. गेली कित्येक वर्षे देशांतील 80 टक्के मागासवर्गीय समाज गावकुसा बाहेर ठेवला गेला होता. याचा विचार कधी तरी करा, अशा शब्दात आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी नितीन गडकरींच्या आरक्षण मुद्दयांवर सडकून टिका केली.

जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा - ठाण्यातील मराठी-गुजराथी वाद : पाच दिवसानंतर परस्परविरोधी मारहाणीचा गुन्हा दाखल

'जे राष्ट्रवादी पक्ष सोडून गेले त्यांनी आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवला' अशी टीका शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर केली होती, यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये जळजळीत टीका करण्यात आली होती. जे आज राष्ट्रवादीमधून बाहेर पडले ते तुमचे कधी नव्हतेच व ते इतर पक्षातून फुटूनच आले होते. ते कसे चालले व स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे पवार देखील सोनिया गांधींच्या काँग्रेसमधूनच बाहेर पडले होते ना? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून केला गेला होता.

इतिहास काढायचा झाला तर आम्हाला काढता येतो. 1977 चा इतिहास काढला तर सर्वांनाच त्रास होईल. पण, जखमेवरची खपली काढायची नसते. इतिहासाचे दाखले द्यायचे झाले तर अनेक रक्तवाहिन्या भळा-भळा वाहतील. स्वाभीमानाच्या गोष्टी कोणीही करायच्या नसतात शरद पवारांचा स्वाभिमान इंदिरा गांधी, मुरली देवरा, मनोहर जोशी, सुधीर जोशी यांना माहिती होता, या शब्दात आव्हाडांनी सामनातील लेखावर टिका केली.

हेही वाचा - अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात जागावाटपावरून युतीत रस्सीखेच

गेली 5 दशके अनेक नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करूनच मोठे झाले आहेत. अनेकांनी आपली बुडणारी राजकीय कारकीर्द एकट्या पवार साहेबांवर टीका करून सावरली. तरीही साहेब आपल्या जागी अढळ आहेत, असे खरमरीत उत्तर आव्हाड यांनी सामना मधील टीकेला दिले.

हेही वाचा - भिवंडीत कपड्यांच्या गोदामांना भीषण आग; चार गोदामे जळून खाक

Intro:जितेंद्र आव्हाड यांनी केली शिवसेनेवर टीकाBody:पळपुटे कोण? या सामना लेखावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले असून शरद पवार हे राजकारणातले भीष्म आहेत कारण गेली ५० वर्षांपेक्षा जास्त काळ शरद पवार यांच्या भोवतीच फक्त महाराष्ट्र नाही तर देशाचे राजकारण फिरतय यामुळे मुख्यमंत्री असतील, विरोधक असतील, बाळासाहेबांनंतरची पिढी असेल सर्वच जण शरद पवारांवर टिका करतायेत... इतिहास काढायचा झाला तर आम्हाला काढतां येतो १९७७ चा इतिहास काढला तर सर्वांनाच त्रास होईल पण जख्मेवरची खपली काढायची नसते... इतिहासाचे दाखले द्यायचे झाले तर अनेक रक्त वाहिन्या भळा भळा वाहतील... स्वाभीमानाच्या गोष्टी कोणीही करायच्या नसतात शरद पवारांचा स्वाभिमान इंदिरा गांधी, मुरली देवरा, मनोहर जोशी, सुधीर जोशी यांना माहिती होता... या शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सामनातील लेखावर टिका केलीये... तर नितीन गडकरी सारखे आरक्षणा बद्दल का बोलतायेत नेमकं त्या मागे काय आहे हे माहित नाही पण देशात आरक्षण नसावे हा आर एस एस चा अजेंडा आहे... डाॅक्टर बाळासाहेब आंबेडकर, नामदेव ढसाळ यांच्या सारख्यांवर बाप दादांची पुण्यायी नव्हती कारण जेव्हा तुम्ही शिकत होता तेव्हा आमचे बाप दादा गुर ढोर राखत होती मैला उचलत होती आम्हाला म्हणजे मागासवर्गीय समाजाला अक्षर ओळख व्हायला ५ हजार वर्षे लागली गेली कित्येक वर्षे देशांतील ८० टक्के मागासवर्गीय समाज गाव कुसा बाहेर ठेवला गेला होता याचा विचार कधी तरी करा अशा शब्दात आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी नितीन गडकरींच्या आरक्षण मुद्दयांवर सडकून टिका केलीये...

बाईट १ : जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काॅंग्रेस
इतिहास फार खाजवू नका.. खपली निघाली तर त्रास सगळ्यांना.. पवार साहेब हे राजकारणातील भीष्म.. जितेंद्र आव्हाड यांचे टीकेला उत्तर..
ANCHOR - गेली पाच दशके अनेक नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करूनच मोठे झाले, अनेकांनी आपली बुडणारी राजकीय कारकीर्द एकट्या पवार साहेबांवर टीका करून सावरली तरीही साहेब आपल्या जागी अढळ आहेत असे खरमरीत उत्तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सामना मधील टीकेला दिले. "जे राष्ट्रवादी पक्ष सोडून गेले त्यांनी आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवला" अशी टीका शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर केली होती, यावर शिवसेनेचे मुखपत्र सामना मध्ये जळजळीत टीका करण्यात आली होती. जे आज राष्ट्रवादी मधून बाहेर पडले ते तुमचे कधी नव्हतेच व ते इतर पक्षातून फुटूनच आले होते, ते कसे चालले व स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे पवार देखील सोनिया गांधींच्या काँग्रेस मधूनच बाहेर पडले होते ना? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून केला गेला होता. तत्वासाठी काँग्रेस मधून बाहेर पडलेले पवार गेली दीड दशक काँग्रेस शी गुफतगू करत असून त्यांनी स्वाभिमानाबद्दल बोलू नये या टीकेला आव्हाड यांनी सडेतोड उत्तर दिले. इतिहासाच्या खपल्या काढाल तरी वेदना सर्वांनाच होतील असे उत्तर देत त्यांनी 1977 चा पुसटसा उल्लेख देखील केला. 1977 ला काय झाले हे शिवसेनेचे जुने नेते आणि खुद्द बाळासाहेब देखील जाणून होते त्यामुळे जुन्या खपल्या काढू नका नाहीतर त्रास सगळ्यांना होईल असा धमकीवजा इशारा त्यांनी टीकाकारांना दिला आहे.



तुमचे बापजादे गुरुकुलात शिकत होते, आमचे बापजादे मैला उचलत होते... आव्हाडांचा गडकरींच्या विधानाला सडेतोड जवाब..
ANCHOR - "जेव्हा तुमचे बापजादे गुरुकुलात अक्षर ओळख करून घेत, शिक्षण घेत होते, तेव्हा आमचे बापजादे मैला उचलत होते, मेलेली गुरे साफ करत गावाबाहेर रहात होते" असे सडेतोड उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी गडकरींच्या "मला आरक्षण नव्हते म्हणून मी मोठा झालो" या विधानाबाबत दिले. आरक्षण विरोध हा RSS वाल्यांचा छुपा अजेन्डा असून गडकरींचे विधान हे त्याचेच द्योतक असल्याचे ते म्हणाले. पाच हजार वर्षे सवर्ण समाजाला अलिखीत आरक्षण होते आणि मागासवर्गीयांना आरक्षण मिळताच तुम्हाला त्रास का होतो असा कडक सवाल त्यांनी केला. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, नामदेव ढसाळ सारख्याना आरक्षणाचे कवच नव्हते तरी ते आपल्या कर्तृत्वाने मोठे झाल्याची आठवण देखील आव्हाड यांनी करून दिली.
BYTE - जितेंद्र आव्हाड (आमदार - NCP)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.