ETV Bharat / state

ठाणे: वेश्या व्यवसायासाठी बळजबरी करणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात नवविवाहितेची पोलिसांकडे तक्रार

author img

By

Published : Nov 24, 2019, 10:24 PM IST

नवविवाहितेने आईकडून पैसे आणावेत यासाठी छळ करण्यात आला. आईकडून पैसे आणणे शक्य नसेल तर वेश्या व्यवसाय करून पैसे द्यावेत, असा तगादा पती आणि सासरच्या मंडळींनी लावला. या जाचाला कंटाळून नवविवाहितेने सासरच्या मंडळींविरोधात ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

वेश्या व्यवसायासाठी विवाहितेवर बळजबरी

ठाणे - भिवंडी तालुक्यातील एका वीस वर्षीय तरुणीचे शहरातील फुलेनगर येथील तरुणासोबत सहा महिन्यांपूर्वी लग्न लावण्यात आले. मात्र, दोन महिने गोडीगुलाबीने नांदवल्यानंतर या नवविवाहितेने आईकडून पैसे आणावेत यासाठी छळ करण्यात आला. आईकडून पैसे आणने शक्य नसेल तर वेश्याव्यवसायकरून पैसे द्यावेत, असा तगादा पती आणि सासरच्या मंडळींनी लावला. या जाचाला कंटाळून नवविवाहितेने सासरच्या मंडळींविरोधात ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सासरच्या मंडळी विरोधात नवविवाहितेची पोलिसांकडे तक्रार


५ मे २०१९ ला पीडित तरुणी हिचा आरोपी मनिष याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर दोन महिने सासरच्या लोकांनी तिला व्यवस्थित वागणूक दिली. त्यानंतर पीडितेला स्वयंपाक, घरकाम येत नाही, अशी कारणे सांगून तिला शिवीगाळ व मारहाण होऊ लागली. पती मनिष याचे लग्नाअगोदर एका मुलीशी प्रेम संबंध असल्याचे फोटो पीडितेला सापडले. याबाबत तिने जाब विचारला असता, आजकाल सगळीकडेच असे प्रकार चालतात, असे सांगून या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला सासरच्या मंडळींनी दिला.

हेही वाचा - ठाणे-बेलापूर मार्गावर शिवशाही बसचा अपघात

एका रात्री पती घराबाहेर असताना पीडितेचा सासरा आणि दीर यांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याबाबतही सासू आणि नणंद यांना सांगितले असता, याबाबत कोठेही वाच्यता न करण्याची धमकी त्यांनी दिली. त्यानंतर सासरी नांदायचे असेल, तर आईकडून पन्नास हजार रुपये आण किंवा सांगू त्या व्यक्तीसोबत शरीर संबंध करून त्यातून मिळणारे पैसे घरात देण्याची मागणी सासरच्या लोकांनी केली.

ठाणे - भिवंडी तालुक्यातील एका वीस वर्षीय तरुणीचे शहरातील फुलेनगर येथील तरुणासोबत सहा महिन्यांपूर्वी लग्न लावण्यात आले. मात्र, दोन महिने गोडीगुलाबीने नांदवल्यानंतर या नवविवाहितेने आईकडून पैसे आणावेत यासाठी छळ करण्यात आला. आईकडून पैसे आणने शक्य नसेल तर वेश्याव्यवसायकरून पैसे द्यावेत, असा तगादा पती आणि सासरच्या मंडळींनी लावला. या जाचाला कंटाळून नवविवाहितेने सासरच्या मंडळींविरोधात ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सासरच्या मंडळी विरोधात नवविवाहितेची पोलिसांकडे तक्रार


५ मे २०१९ ला पीडित तरुणी हिचा आरोपी मनिष याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर दोन महिने सासरच्या लोकांनी तिला व्यवस्थित वागणूक दिली. त्यानंतर पीडितेला स्वयंपाक, घरकाम येत नाही, अशी कारणे सांगून तिला शिवीगाळ व मारहाण होऊ लागली. पती मनिष याचे लग्नाअगोदर एका मुलीशी प्रेम संबंध असल्याचे फोटो पीडितेला सापडले. याबाबत तिने जाब विचारला असता, आजकाल सगळीकडेच असे प्रकार चालतात, असे सांगून या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला सासरच्या मंडळींनी दिला.

हेही वाचा - ठाणे-बेलापूर मार्गावर शिवशाही बसचा अपघात

एका रात्री पती घराबाहेर असताना पीडितेचा सासरा आणि दीर यांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याबाबतही सासू आणि नणंद यांना सांगितले असता, याबाबत कोठेही वाच्यता न करण्याची धमकी त्यांनी दिली. त्यानंतर सासरी नांदायचे असेल, तर आईकडून पन्नास हजार रुपये आण किंवा सांगू त्या व्यक्तीसोबत शरीर संबंध करून त्यातून मिळणारे पैसे घरात देण्याची मागणी सासरच्या लोकांनी केली.

Intro:kit 319Body:वेश्याव्यवसायासाठी बळजबरी करणाऱ्या सासरच्या मंडळी विरोधात नवविवाहितेची पोलिसांकडे तक्रार

ठाणे : भिवंडी तालुक्यातील शेलार येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीला भुरळ घालून शहरातील फुलेनगर येथील तरुणासोबत सहा महिन्यांपूर्वी लग्न लावण्यात आले होते. मात्र दोन महिने गोडीगुलाबीने नांदवल्यानंतर नवविवाहितेने आईकडून हुंडा म्हणून पैसे आणावेत आणि ते जमत नसेल तर प्रसंगी वेश्याव्यवसाय करून घरात पैसे आणून द्यावेत असा तगादा पतीसह सासरच्या मंडळीने लावल्याने या जाचाला कंटाळून नवविवाहितेने सासरच्या मंडळीविरोधात ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या घटनेचे अधिक वृत्त असे कि, मौजे शेलार ,गंगामाता नगर येथील तरुणी अस्मिता पंडित ( २० ) हिचे लग्न फुलेनगर येथील मनिष विष्णू कांबळे ( २५ ) याच्यासोबत ५ मे २०१९ रोजी झाले होते. लग्नानंतर अस्मिता हिचा संसार दोन महिने सुरळीतपणे सुरु होता.मात्र लग्न जमवताना सासरच्या मंडळीने तुला संसारात काही कमी पडू दिले जाणार नाही असे आश्वासन दिले होते.असे असताना लग्नाच्या दोन महिन्यानंतर नवविवाहिता अस्मिता हिला स्वयंपाक ,घरकाम तसेच कपडे देखील धुता येत नाही अशी कारणे सांगून तिला शिवीगाळ व मारहाण करण्यात येऊ लागली. त्यातच मनिष याचे लग्नाअगोदर एका मुलीशी प्रेम संबंध असल्याचे दोघांचे फोटो अस्मिताला सापडले आहेत. याबाबत अस्मिताने जाब विचारला असता आजकाल सगळीकडे असे प्रकार असतात असे सांगून त्याच्या अवैध प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला सासरच्या मंडळीने दिला. तर एके रात्री पती मनिष हा घराबाहेर असताना सासरा आणि दीर या दोघांनीही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत सासू आणि नणंद यांना सांगितले असता याबाबत कोठेही वाच्यता करू नकोस अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर तुला जर येथे नांदायचे असेल तर तुझ्या आईकडून हुंडा म्हणून ५० हजार रुपये घेऊन ये. आणि जर ते शक्य नसेल तर आम्हीं सांगू त्या व्यक्तीसोबत तू शरीर संबंध करून त्यातून मिळणारे पैसे घरात आणून दे अशी धमकी देण्यात आली.
या वाईट गोष्टीस अस्मिताने नकार देताच तिला शिवीगाळ व बेदम मारहाण करण्यात आली.हा शारीरिक व मानसिक अत्याचार पती मनिष कांबळे ,सासरा विष्णू कांबळे ,सासू आशा ,नणंद शितल अबगूल ,पल्लवी वाघमारे ,मंगल घाडगे ,दिर किशोर कांबळे आदींच्या संगनमताने झाल्याचे पिडीत नवविवाहिता अस्मिता कांबळे हिने आपल्या तक्रारी निवेदनात केला आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.