ETV Bharat / state

शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णांची हेळसांड सुरूच - शहापूर उपजिल्हा रुग्णालय

शहापूर तालुका हा आदिवासी दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे कुपोषणाचे प्रमाण नेहमीच वाढते आहे. त्यात रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नसल्याने बालकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. सोनोग्राफी मशीनला चालवण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने ते देखील बंद आहे. तसेच वेळीच 108 रुग्णवाहिका  उपलब्ध होत नसल्याची ओरडही रुग्णांकडून केली जात आहे. एकंदरीत शहापूर उपजिल्हा रुग्णालय हे सर्व सोई सुविधायुक्त असली तरी डॉक्टरांच्या आभावामुळे हे रुग्णालय शोभेची वास्तू बनले आहे.

shahapur hospital
शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णांची हेळसांड
author img

By

Published : Nov 27, 2019, 2:43 PM IST

ठाणे - जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शहापूर उपजिल्हा रुग्णालय तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असुविधांमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचे दिसून आले. तर, १ वर्षाच्या आर्यन पांडूरंग पारधी या बालकाला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णांची हेळसांड

शहापूर शहरात असलेले पूर्वीचे ग्रामीण रुग्णालय काही वर्षांपूर्वी उपजिल्हा रुग्णालय नावाने नव्याने सुरू करण्यात आले. १०० खाट असलेल्या या रुग्णालयात कायमस्वरुपी तज्ज्ञ डॉक्टरांचा वाणवा असतो. मात्र, आजमितीस फक्त ६ डॉक्टर या रुग्णालयाचा गाडा हाकत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात आजपर्यंत स्त्री रोग तज्ज्ञ नाहीत. यामुळे गर्भवती स्त्रियांच्या प्रसूतीच्या काळात काही गंभीर परिस्थिती उद्भवली तर रुग्णांना कल्याण-ठाणे येथे हलवावे लागते. तसेच बालरोग तज्ज्ञही नसल्याने रुग्णांची अवस्था बिकट होत आहे. हाड रोग तज्ज्ञ सहसा रजेवर असतात. त्यामुळे रुग्णाला खासगी ठिकाणी हलवावे लागते. तर, 108 रुग्णवाहिकांची सुविधा ढासळल्याने गरीब रुग्णांना खासगी रुग्णवाहिका भाड्याने करून जावे लागते. अशा गंभीर समस्यांनी हे उपजिल्हा रुग्णालय ग्रासले आहे.

हेही वाचा - ठाणे: अंमलीपदार्थाची तस्करी करणारी चौकडी पोलिसांच्या ताब्यात

शहापूर तालुका हा आदिवासी दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे कुपोषणाचे प्रमाण नेहमीच वाढते आहे. त्यात रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नसल्याने गोर गरीब बालकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. सोनोग्राफीसारखी आद्यावत मशीन आणलेली असून तिला चालवण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने ते देखील बंद आहे. हीच परिस्थिती सिटीस्कॅन मशीनची असून तंत्रज्ञ नसल्याने ती देखील बंद आहे. तसेच वेळीच 108 रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याची ओरडही रुग्णांकडून केली जात आहे. एकंदरीत शहापूर उपजिल्हा रुग्णालय हे सर्व सोई सुविधायुक्त असले तरी डॉक्टरांच्या आभावामुळे हे रुग्णालय शोभेची वास्तू बनले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या आरोग्य केंद्रांमध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी, अनेक महिला प्रसूतीसाठीही येत असतात. मात्र, या ठिकाणी रात्री तसेच दिवसा विजेचा भरवसा नसल्याने अनेक रुग्णांना तसेच प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना याचा त्रास सहन करावा लागतो. या आरोग्य केंद्रात सौर उर्जावर चालणारे दिवे-पंखे बंद पडलेले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस आरोग्य केंद्रातील रुग्णांसह, कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणाच आजारी असल्याने त्यांच्याकडे असलेल्या रुग्णांची काय आणि कोण सोय करणार? असा प्रश्न तेथील डॉक्टरांना पडला आहे.

108 रुग्णवाहिकेचा प्रश्न ऐरणीवर
शहापूर तालुक्यातील कृष्णाची वाडी येथील आर्यन पांडूरंग पारधी या 1 वर्षाच्या मुलावर बाळरोग तज्ज्ञ नसल्याने योग्य उपचार होऊ शकले नाही. त्यामुळे त्याला ठाणे येथील सिव्हील रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. रुग्णाच्या वडिलांनी 108 ची रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, सध्या रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे कारण देत येथील कर्मचाऱ्यांनी त्यांना खासगी रुग्णवाहिकेमधून जाण्यास सांगितले. जवळ पैसे नसतानाही आर्यनच्या पालकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी या रुग्णवाहिकेचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित झाला. तर, खासगी रुग्णवाहिका आणि 108 चे काहीतरी साटेलोटे आहेत का? असा प्रश्नही येथील काही नागरिकांना पडला आहे.

हेही वाचा - उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे - एकनाथ शिंदे

आर्यनला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नव्हती, ही घटना एकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी आरोग्य विभागासह लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली. उपजिल्हा रुग्णालयाची सुधारणा करणे काळाची गरज असून आमदार दौलत दरोडा यांना रुग्णकल्याण समितीवर प्रतिनिधी नेमून लक्ष देणे गरजेचे आहे. तर, शहापुरात कोणतेही वैद्यकीय अधिकारी येण्यास तयार नाहीत. इतर सर्व पदे आम्ही भरली आहेत. मात्र, कायम डॉक्टर मिळत नसल्याने इमर्जन्सीसाठी आपण रुग्णांना ठाण्यावरून मदत देत असतो. लहान मुलांची शस्त्रक्रिया, उपचार हे सर्व शक्य आहे ते आम्ही करतो, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

दरम्यान, कसारापासून पडघ्यापर्यंत महामार्गावर आणि रेल्वेचे जे अपघात होतात, त्या सर्व रुग्णांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे येथेच सर्व सुविधा असणे गरजेचे आहे. 108 सेवा ही मागील सरकारच्या काळात निर्माण झाली. मात्र, या रुग्णवाहिकांची दुरुस्ती करण्यासाठी शासन निधीची तरतूद करत नाही. त्यामुळे येथे या रुग्णवाहिका पडून धूळ खात आहेत. डॉक्टरांची कमतरता हा विषय नेहमीचाच असल्याने या गंभीर बाबीकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी या निमित्ताने समोर आली आहे.

हेही वाचा - शिवसेना आमदारांचा हॉटेल लेमन ट्रीमध्ये जल्लोष

ठाणे - जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शहापूर उपजिल्हा रुग्णालय तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असुविधांमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचे दिसून आले. तर, १ वर्षाच्या आर्यन पांडूरंग पारधी या बालकाला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णांची हेळसांड

शहापूर शहरात असलेले पूर्वीचे ग्रामीण रुग्णालय काही वर्षांपूर्वी उपजिल्हा रुग्णालय नावाने नव्याने सुरू करण्यात आले. १०० खाट असलेल्या या रुग्णालयात कायमस्वरुपी तज्ज्ञ डॉक्टरांचा वाणवा असतो. मात्र, आजमितीस फक्त ६ डॉक्टर या रुग्णालयाचा गाडा हाकत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात आजपर्यंत स्त्री रोग तज्ज्ञ नाहीत. यामुळे गर्भवती स्त्रियांच्या प्रसूतीच्या काळात काही गंभीर परिस्थिती उद्भवली तर रुग्णांना कल्याण-ठाणे येथे हलवावे लागते. तसेच बालरोग तज्ज्ञही नसल्याने रुग्णांची अवस्था बिकट होत आहे. हाड रोग तज्ज्ञ सहसा रजेवर असतात. त्यामुळे रुग्णाला खासगी ठिकाणी हलवावे लागते. तर, 108 रुग्णवाहिकांची सुविधा ढासळल्याने गरीब रुग्णांना खासगी रुग्णवाहिका भाड्याने करून जावे लागते. अशा गंभीर समस्यांनी हे उपजिल्हा रुग्णालय ग्रासले आहे.

हेही वाचा - ठाणे: अंमलीपदार्थाची तस्करी करणारी चौकडी पोलिसांच्या ताब्यात

शहापूर तालुका हा आदिवासी दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे कुपोषणाचे प्रमाण नेहमीच वाढते आहे. त्यात रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नसल्याने गोर गरीब बालकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. सोनोग्राफीसारखी आद्यावत मशीन आणलेली असून तिला चालवण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने ते देखील बंद आहे. हीच परिस्थिती सिटीस्कॅन मशीनची असून तंत्रज्ञ नसल्याने ती देखील बंद आहे. तसेच वेळीच 108 रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याची ओरडही रुग्णांकडून केली जात आहे. एकंदरीत शहापूर उपजिल्हा रुग्णालय हे सर्व सोई सुविधायुक्त असले तरी डॉक्टरांच्या आभावामुळे हे रुग्णालय शोभेची वास्तू बनले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या आरोग्य केंद्रांमध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी, अनेक महिला प्रसूतीसाठीही येत असतात. मात्र, या ठिकाणी रात्री तसेच दिवसा विजेचा भरवसा नसल्याने अनेक रुग्णांना तसेच प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना याचा त्रास सहन करावा लागतो. या आरोग्य केंद्रात सौर उर्जावर चालणारे दिवे-पंखे बंद पडलेले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस आरोग्य केंद्रातील रुग्णांसह, कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणाच आजारी असल्याने त्यांच्याकडे असलेल्या रुग्णांची काय आणि कोण सोय करणार? असा प्रश्न तेथील डॉक्टरांना पडला आहे.

108 रुग्णवाहिकेचा प्रश्न ऐरणीवर
शहापूर तालुक्यातील कृष्णाची वाडी येथील आर्यन पांडूरंग पारधी या 1 वर्षाच्या मुलावर बाळरोग तज्ज्ञ नसल्याने योग्य उपचार होऊ शकले नाही. त्यामुळे त्याला ठाणे येथील सिव्हील रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. रुग्णाच्या वडिलांनी 108 ची रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, सध्या रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे कारण देत येथील कर्मचाऱ्यांनी त्यांना खासगी रुग्णवाहिकेमधून जाण्यास सांगितले. जवळ पैसे नसतानाही आर्यनच्या पालकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी या रुग्णवाहिकेचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित झाला. तर, खासगी रुग्णवाहिका आणि 108 चे काहीतरी साटेलोटे आहेत का? असा प्रश्नही येथील काही नागरिकांना पडला आहे.

हेही वाचा - उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे - एकनाथ शिंदे

आर्यनला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नव्हती, ही घटना एकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी आरोग्य विभागासह लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली. उपजिल्हा रुग्णालयाची सुधारणा करणे काळाची गरज असून आमदार दौलत दरोडा यांना रुग्णकल्याण समितीवर प्रतिनिधी नेमून लक्ष देणे गरजेचे आहे. तर, शहापुरात कोणतेही वैद्यकीय अधिकारी येण्यास तयार नाहीत. इतर सर्व पदे आम्ही भरली आहेत. मात्र, कायम डॉक्टर मिळत नसल्याने इमर्जन्सीसाठी आपण रुग्णांना ठाण्यावरून मदत देत असतो. लहान मुलांची शस्त्रक्रिया, उपचार हे सर्व शक्य आहे ते आम्ही करतो, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

दरम्यान, कसारापासून पडघ्यापर्यंत महामार्गावर आणि रेल्वेचे जे अपघात होतात, त्या सर्व रुग्णांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे येथेच सर्व सुविधा असणे गरजेचे आहे. 108 सेवा ही मागील सरकारच्या काळात निर्माण झाली. मात्र, या रुग्णवाहिकांची दुरुस्ती करण्यासाठी शासन निधीची तरतूद करत नाही. त्यामुळे येथे या रुग्णवाहिका पडून धूळ खात आहेत. डॉक्टरांची कमतरता हा विषय नेहमीचाच असल्याने या गंभीर बाबीकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी या निमित्ताने समोर आली आहे.

हेही वाचा - शिवसेना आमदारांचा हॉटेल लेमन ट्रीमध्ये जल्लोष

Intro:kit 319Body:शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णांची हेळसांड सुरूच

ठाणे : शहापूर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले शहापूर उपजिल्हा रुग्णालय तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र असुविधांमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचे दिसून आले. १ वर्षाच्या आर्यन पांडुरंग पारधी या बालकाला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे समोर आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

शहापूर शहरात असलेले पूर्वीचे ग्रामीण रुग्णालय काही वर्षांपूर्वी उपजिल्हा नावाने नव्याने सुरु करण्यात आले . यासाठी १०० खाटांचे असलेल्या या रुग्णालयात कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टरांचा वाणवा असतो. आजमितीस या रुग्णालयाचा गाडा फक्त सहा डाँक्टर हाकत आहेत. पण उपजिल्हा रुग्णालयात आजमितीस स्त्री रोग तज्ञ नाहीत, यामुळे गर्भवती स्त्रियांच्या प्रसूतीच्या काळात काही गंभीर परिस्थिती उद्भवली तर कल्याण - ठाणे येथे या रुग्णांना हलवावे लागते. बाल रोग तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे बाळ रुग्णांची अवस्था बिकट होत आहे. हाड रोग तज्ज्ञ कधी रजेवर असतात, त्यामुळे इमर्जन्सी रुग्णाला खाजगी ठिकाणी हलवावे लागते. मात्र 108 रुग्णवाहिकाची सुविधा ढासळले असल्याने गरीब रुग्णांना खाजगी रुग्णवाहिका भाड्याने करून जावी लागते. अश्या गंभीर समस्यांनी उपजिल्हा रुग्णालय ग्रासले आहे.
शहापुर तालुका हा आदिवासी दुर्गम तालुका म्हणुन ओळखला जातो, त्यामुळे इथे कुपोषनाच प्रमाण नेहमीच वाढते आहे. त्यामुळे रुग्णालयात बालरोग तज्ञ नसल्याने गोर गरीब बालकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. सोनोग्राफी सारखीआद्यावत मशीन आणलेली असून तिला चालवण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने ते देखील बंद आहे . हीच परिस्थिती सिटी स्कॅन मशीन असून तिचा देखील तंत्रज्ञ नसल्याने बंद आहे. तसेच वेळीच 108 च्या अँब्युलंस उपलब्ध होत नसल्याची ओरड ही रुग्णांकडुन केली जात आहे. एकंदरीत शहापुर उपजिल्हारुग्णालय हे सर्व सोई सुविधा युक्त आसले तरी डाँक्टरांच्या आभावा मुळे रुग्णालय शोभेची वस्तु बनली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या या ठिकाणी दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे .या आरोग्य केंद्रांमध्ये अनेक रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत आसतात,तसेच प्रसूतीसाठीही महिला येत असतात परंतु या ठिकाणी रात्री तसेच दिवसा विजेचा भरवसा नसल्याने अनेक रुग्णांना तसेच प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना याचा त्रास सहन करावा लागतो. या आरोग्य केंद्रासाठी असलेल्या सौर उर्जावर चालणारे दिवे - पंखे बंद पडलेले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस आरोग्य केंद्रातील रुग्णांसह , कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे . ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणाच आजारी असल्याने त्यांच्याकडे असलेल्या रुग्णांची काय सोय करणार ? असा प्रश्न तेथील डॉक्टरांना पडला आहे .

108 रुग्णवाहिकेचा प्रश्न ऐरणीवर
शहापूर तालुक्यातील कृष्णाचीवाडी येथील आर्यन पांडुरंग पारधी या 1 वर्षाच्या मुलावर बाळरोग तज्ञ नसल्याने योग्य उपचार न झाल्याने त्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. रुग्णाच्या वडिलांनी 108 ची रुग्णवाहिकेची मागणी केली. परंतु सध्या उपलब्ध नसल्याचे कारण देत येथील कर्मचारी यांनी खाजगी रुग्णवाहिकामधून जाण्यासाठी सांगितले. जवळ पैसे नसतानाही त्याच्या पालकांनी आर्यनला खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी या रुग्णवाहिकाचा प्रश्न उपस्थित झाला. खाजगी रुग्णवाहिका आणि 108 काहीतरी साटेलोटे आहेत का? असा प्रश्न येथील काही नागरिकांना पडला आहे.
1 वर्षाचा आर्यन पांडुरंग पारधी या बालकाला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नव्हती. हि घटना एकाने मोंबाईल केमेऱ्यात कैद करून व्हिडीओ व्हायरल केल्याने नेटकऱ्यांनी आरोग्य विभागासह लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली. उपजिल्हा रुग्णालयाची सुधारणा करणे काळाची गरज असून आ.दौलत दरोडा यांना रुग्णकल्याण समितीवर प्रतिनिधी नेमून लक्ष देणे गरजेचे आहे. तर शहापुरात कोणतेही वैद्यकीय अधिकारी येण्यास तयार नाहीत. इतर सर्व पदे आम्ही भरली आहेत. कायम डॉक्टर मिळत नसल्याने इमर्जन्सी आपण ठाण्यावरून देत असतो. लहान मुलांची शस्त्रक्रिया वगैरे आपण शहापुरला जेवढं शक्य ते उपचार करतो , माहिती वैद्यकीय अधीक्षक, डॉ.कैलास पवार यांनी दिली.

दरम्यान, कसारापासून पडघ्यापर्यंत महामार्गावर आणि रेल्वेचे जे अपघात होतात.ते सर्व रुग्ण शहापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागतात.त्यामुळे येथेच सर्व सुविधा असणे गरजेचे आहे.108 सेवा ही मागील सरकारच्या काळात निर्माण झाली. परंतु या रुग्णवाहिकांची दुरुस्ती करण्यासाठी शासन निधीची तरतूद करत नाही त्यामुळे येथे या रुग्णवाहिका पडून राहिल्या असतात. डॉक्टरांची कमतरता हा विषय नेहमीचाच असल्याने या गंभीर बाबीकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी या निमित्ताने समोर आली आहे.

Conclusion:shahapur
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.