ETV Bharat / state

माघी गणेशोत्सवातील पुजेच्या जेवणातून १५ हून अधिक जणांना विषबाधा

author img

By

Published : Feb 1, 2020, 9:32 PM IST

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना अंबरनाथ गाव दुर्गादेवीपाडा येथे मुकणे कुटूंबीयांच्या नातेवाईकांच्या घरी माघी गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने त्या निमित्ताने पुजा ठेवण्यात आली होती. यावेळी येथील जेवणातून विषबाधा झाली.

food poision
माघी गणेशोत्सवातील पुजेच्या जेवणातून १५ हून अधिक जणांना विषबाधा

ठाणे - माघी गणेशोत्सवच्या गणपतीच्या पुजेच्या कार्यक्रमात घरात शिजवलेल्या अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. अंबरनाथ तालुक्यात दुर्गादेवीपाडा येथे हा प्रकार घडला असून, जवळपास 15 हून अधिक जणांना विषबाधा झाल्याने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या; नोकरीच्या आमिषाने सोडले होते घर

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना अंबरनाथ गाव दुर्गादेवीपाडा येथे मुकणे कुटूंबीयांच्या नातेवाईकांच्या घरी माघी गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने त्या निमित्ताने पुजा ठेवण्यात आली होती. या पुजेच्या जेवणासाठी विक्की मुकणे व त्यांच्या गावातील इतर कुटूंब जेवणासाठी आले होते. मात्र, दुपारच्या सुमाराला जेवल्यानंतर मुकणे कुटूंबातील व वाघे कुटूंबातील जवळपास 15 हून अधिक जणांना उलट्या व जुलाब होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात व महेश्वरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांना अधिक बाधा झाली आहे.

मुकणे कुटूंबीयांनी घरीच जेवण तयार केले होते. मात्र, ही अन्न बाधा नक्की कशामुळे झाली हे मात्र समजले नसल्याचे मुकणे कुटूंबीयांनी सांगितले. आम्हाला कोणाविरूध्दही तक्रार दाखल करायची नसून आमच्याच कुटूंबातील हा कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले. विषबाधा झालेल्या काही जणांवर उपचार करुन घरी पाठविण्यात आले आहेत. तर काही रूग्णालयात उपचार घेत असल्याचे विक्की मुकणे व आनंद मुकणे यांनी सांगितले.

पूजेच्या जेवणात अन्न बाधा झालेल्यांमध्ये आरुषी विक्की मुकणे (वय - 6), निखील मुकणे (वय- 9), आशा मुकणे (वय -24), गुरूनाथ (वय -35) आणि इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठाणे - माघी गणेशोत्सवच्या गणपतीच्या पुजेच्या कार्यक्रमात घरात शिजवलेल्या अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. अंबरनाथ तालुक्यात दुर्गादेवीपाडा येथे हा प्रकार घडला असून, जवळपास 15 हून अधिक जणांना विषबाधा झाल्याने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या; नोकरीच्या आमिषाने सोडले होते घर

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना अंबरनाथ गाव दुर्गादेवीपाडा येथे मुकणे कुटूंबीयांच्या नातेवाईकांच्या घरी माघी गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने त्या निमित्ताने पुजा ठेवण्यात आली होती. या पुजेच्या जेवणासाठी विक्की मुकणे व त्यांच्या गावातील इतर कुटूंब जेवणासाठी आले होते. मात्र, दुपारच्या सुमाराला जेवल्यानंतर मुकणे कुटूंबातील व वाघे कुटूंबातील जवळपास 15 हून अधिक जणांना उलट्या व जुलाब होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात व महेश्वरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांना अधिक बाधा झाली आहे.

मुकणे कुटूंबीयांनी घरीच जेवण तयार केले होते. मात्र, ही अन्न बाधा नक्की कशामुळे झाली हे मात्र समजले नसल्याचे मुकणे कुटूंबीयांनी सांगितले. आम्हाला कोणाविरूध्दही तक्रार दाखल करायची नसून आमच्याच कुटूंबातील हा कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले. विषबाधा झालेल्या काही जणांवर उपचार करुन घरी पाठविण्यात आले आहेत. तर काही रूग्णालयात उपचार घेत असल्याचे विक्की मुकणे व आनंद मुकणे यांनी सांगितले.

पूजेच्या जेवणात अन्न बाधा झालेल्यांमध्ये आरुषी विक्की मुकणे (वय - 6), निखील मुकणे (वय- 9), आशा मुकणे (वय -24), गुरूनाथ (वय -35) आणि इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Intro:kit 319Body:BREAKING माघी गणेशोत्सवातील पुजेच्या जेवणातून १५ हून अधिक जणांना अन्नबाधा

ठाणे : माघी गणेशोत्सवच्या गणपतीच्या पुजेच्या कार्यक्रमात घरात शिजवलेल्या अन्नातून बाधा झाल्याची घटना घडली आहे. हि घटना अंबरनाथ तालुक्यात दुर्गादेवीपाडा येथे घडली असून जवळपास १५ हून अधिक जणांना त्याची बाधा झाल्याने उपचारासाठी रूग्णालयात दााखाल करण्यात आले आहे.
पूजेच्या जेवणात अन्न बाधा झालेलांंमध्ये आरुषी विक्की मुकणे (६), निखील मुकणे( ९), आयुष (७),नवीन(७), सानिका(१२), आशा मुकणे (२४), चंद्रया (८), गुरूनाथ (३५), आनंद मुकणे (३२) आदींचा समावेश आहे. या सर्वाना उलटया जुलाब सुरू असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुना अंबरनाथ गाव दुर्गादेवीपाडा येथे मुकणे कुटूंबियांच्या नातेवाईकांच्या घरी माघी गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने त्या निमीत्ताने पुजा ठेवण्यात आली होती. या पुजेच्या (भांडारा ) जेवणासाठी विक्की मुकणे व त्यांच्या गावातील इतर कुटूंब जेवणासाठी आले होते. मात्र दुपारच्या सुमाराला जेवल्यानंतर मुकणे कुटूंबातील व वाघे कुटूंबातील जवळपास १५ हून अधिक जणांना उलटया व जुलाब होवू लागल्याने त्यांना उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयाल व महेश्वरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांना अधिक बाधा झाली आहे.
मुकणे कुटूंबियांनी घरीच जेवण तयार केले होते. मात्र ही अन्न बाधा नक्की कशामुळे झाली आहे हे मात्र समजले नसल्याचे मुकणे कुटूंबियांनी सांगितले असून आंम्हाला कोणाविरूध्द तक्रार नसून आमच्याच कुटूंबातील हा कार्यक्रम होता. अन्न बाधा झालेल्या काही जणांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहेत. तर काही रूग्णालयात उपचार घेत असल्याचे विक्की मुकणे व आनंद मुकणे यांनी सांगितले.

Conclusion:ambrnath
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.