ETV Bharat / state

आता कोरोना रुग्णांना व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांशी साधता येणार संवाद, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

author img

By

Published : May 5, 2021, 7:52 PM IST

कोरोना रूग्णांवर रूग्णालयात काय उपचार सुरू आहेत? त्यांची प्रकृती कशी आहे? याबाबतची काहीच माहिती रूग्णांच्या नातेवाईकांना मिळत नाही. पण आता ठाणे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांना व्हिडिओ कॉलिंगद्वारे नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे.

thane
ठाणे

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील सर्व खासगी आणि शासकीय रूग्णालयातील कोरोना रूग्णांना आता नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

आता कोरोना रुग्णांना व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांशी साधता येणार संवाद,

रुग्णांवर काय उपचार सुरु आहे? तो कितपत बरा झाला आहे? या प्रश्नांची उत्तरे रूग्णांच्या नातेवाईकांना मिळत नाहीत. त्यात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक संतापतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच खासगी आणि शासकीय रुग्णालयांनी कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांचा व्हिडिओ कॉलद्वारे संवाद घडवावा, असे आदेशच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

सामान्य कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या आणि प्राणवायूची गरज नसलेले रुग्णांना स्वत: जवळ मोबाइल ठेवण्याची मुभा असते. रुग्णांशी संपर्क साधून नातेवाईक त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत असतात. असे असले तरी अतिदक्षता विभागात आणि प्राणवायूवर असलेल्या रुग्णांना मोबाइलद्वारे संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेणे नातेवाईकांना शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्यावर काय उपचार सुरू आहेत? त्यांची प्रकृती कशी आहे? याविषयी नातेवाईक अनभिज्ञ असतात. त्यातच एखादा रुग्ण दगावला तर नातेवाईकांमधून संताप व्यक्त होतो आणि रुग्णालय परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. अशीच परिस्थिती ठाण्यातील वेदांत रुग्णालयातील दुर्घटनेदरम्यान निर्माण झाल्याची बाब समोर आली.

व्हिडिओ कॉल शक्य नसेल तर मोबाइलद्वारे संवाद

'वेदांत रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या प्रकृतीविषयी पुरेशी माहिती दिली नव्हती. असे याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने स्पष्ट केले आहे. आता अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खासगी आणि शासकीय रूग्णालयांना रूग्ण आणि नातेवाईकांचा व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद घडवून आणण्याचे आदेश दिले आहेत. व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधणे शक्य नसेल तर नातेवाईकांशी मोबाइलद्वारे सुसंवाद साधावा आणि नातेवाईकांना त्यांच्या रुग्णांच्या प्रकृतीची माहिती द्यावी. जिल्ह्यातील सर्व महापालिकांना अशा प्रकारचे आदेश दिले आहेत', अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

हेही वाचा - ओबीसी समावेशासाठी संभाजी ब्रिगेड लढा उभारणार; शिवानंद भानुसे यांची माहिती

हेही वाचा - उणिवा काय राहिल्या हे तपासून पुढील भूमिका घेऊ - मराठा क्रांती मोर्चा

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील सर्व खासगी आणि शासकीय रूग्णालयातील कोरोना रूग्णांना आता नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

आता कोरोना रुग्णांना व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांशी साधता येणार संवाद,

रुग्णांवर काय उपचार सुरु आहे? तो कितपत बरा झाला आहे? या प्रश्नांची उत्तरे रूग्णांच्या नातेवाईकांना मिळत नाहीत. त्यात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक संतापतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच खासगी आणि शासकीय रुग्णालयांनी कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांचा व्हिडिओ कॉलद्वारे संवाद घडवावा, असे आदेशच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

सामान्य कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या आणि प्राणवायूची गरज नसलेले रुग्णांना स्वत: जवळ मोबाइल ठेवण्याची मुभा असते. रुग्णांशी संपर्क साधून नातेवाईक त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत असतात. असे असले तरी अतिदक्षता विभागात आणि प्राणवायूवर असलेल्या रुग्णांना मोबाइलद्वारे संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेणे नातेवाईकांना शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्यावर काय उपचार सुरू आहेत? त्यांची प्रकृती कशी आहे? याविषयी नातेवाईक अनभिज्ञ असतात. त्यातच एखादा रुग्ण दगावला तर नातेवाईकांमधून संताप व्यक्त होतो आणि रुग्णालय परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. अशीच परिस्थिती ठाण्यातील वेदांत रुग्णालयातील दुर्घटनेदरम्यान निर्माण झाल्याची बाब समोर आली.

व्हिडिओ कॉल शक्य नसेल तर मोबाइलद्वारे संवाद

'वेदांत रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या प्रकृतीविषयी पुरेशी माहिती दिली नव्हती. असे याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने स्पष्ट केले आहे. आता अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खासगी आणि शासकीय रूग्णालयांना रूग्ण आणि नातेवाईकांचा व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद घडवून आणण्याचे आदेश दिले आहेत. व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधणे शक्य नसेल तर नातेवाईकांशी मोबाइलद्वारे सुसंवाद साधावा आणि नातेवाईकांना त्यांच्या रुग्णांच्या प्रकृतीची माहिती द्यावी. जिल्ह्यातील सर्व महापालिकांना अशा प्रकारचे आदेश दिले आहेत', अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

हेही वाचा - ओबीसी समावेशासाठी संभाजी ब्रिगेड लढा उभारणार; शिवानंद भानुसे यांची माहिती

हेही वाचा - उणिवा काय राहिल्या हे तपासून पुढील भूमिका घेऊ - मराठा क्रांती मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.