ETV Bharat / state

'लोकसभेत बोलणारा उमेदवार अशी ठाण्याची परंपरा खासदार राजन विचारेंनी खंडीत केली'

author img

By

Published : Apr 4, 2019, 9:18 PM IST

लोकसभेत बोलणारा उमेदवार अशी ठाण्याची असेलेली परंपरा खासदार राजन विचारेंनी खंडीत केली. आनंद परांजपे यांची टीका.

आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे

ठाणे - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र जोरदार सुरू असताना ठाण्यात देखील चुरशीची लढाई रंगणार आहे. सेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी अविचारी खासदार असे म्हटले. लोकसभेत बोलणारा उमेदवार अशी ठाण्याची असेलेली परंपरा खासदार राजन विचारेंनी खंडीत केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

आनंद परांजपे यांच्याशी चर्चा करताना

आनंद परांजपे यांना राजकीय पार्श्वभूमी असून वडील प्रकाश परांजपे हे देखील सक्रिय राजकारणात होते. त्यामुळे लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या आनंद परांजपे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. आनंद परांजपे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून नरेंद्र मोदींच्या हुकूमशाही विरोधातील ही लढाई असल्याचे परांजपे यांनी सांगितले.

ही विचारांची लढाई असून ठाण्याच्या विकासावर लक्ष केंदीत करणाऱ्या अनेक मुद्यावरची ही लढाई असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही समस्या विद्यमान खासदरकडून सोडवण्यात आल्या नाहीत. या समस्या सोडवणार असल्याचे परांजपे म्हणाले. मतदारांना ठाण्यात १०० टक्के बदल हवा असल्याचे आनंद परांजपे यांनी सांगितले.

ठाणे - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र जोरदार सुरू असताना ठाण्यात देखील चुरशीची लढाई रंगणार आहे. सेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी अविचारी खासदार असे म्हटले. लोकसभेत बोलणारा उमेदवार अशी ठाण्याची असेलेली परंपरा खासदार राजन विचारेंनी खंडीत केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

आनंद परांजपे यांच्याशी चर्चा करताना

आनंद परांजपे यांना राजकीय पार्श्वभूमी असून वडील प्रकाश परांजपे हे देखील सक्रिय राजकारणात होते. त्यामुळे लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या आनंद परांजपे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. आनंद परांजपे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून नरेंद्र मोदींच्या हुकूमशाही विरोधातील ही लढाई असल्याचे परांजपे यांनी सांगितले.

ही विचारांची लढाई असून ठाण्याच्या विकासावर लक्ष केंदीत करणाऱ्या अनेक मुद्यावरची ही लढाई असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही समस्या विद्यमान खासदरकडून सोडवण्यात आल्या नाहीत. या समस्या सोडवणार असल्याचे परांजपे म्हणाले. मतदारांना ठाण्यात १०० टक्के बदल हवा असल्याचे आनंद परांजपे यांनी सांगितले.

Intro:ठाण्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार लढाई ला सज्ज उच्च शिक्षण आणि अनुभवाच्या जीवावर करणार सेनेची दोन हातBody:

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र जोरदार सुरू असताना ठाण्यात देखील चिरशीची लढाई रंगणार यात दुमत नाही, ठाणे लोकसभेत सेनेचे विध्यमान खासदार राजन विचारे यांची अविचारी खासदार अशी टीका करून आघाडीच्या आनंद परांजपे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. परांजपे यांना ठाणे लोकसभेचा गाढा अभ्यास असून सुशिक्षित विरुद्ध अशिक्षित अशी लढाई आता पाहायला मिळणार आहे.

आनंद परांजपे यांना राजकीय पार्श्वभूमी असुन वडील प्रकाश परांजपे हे देखील सक्रिय राजकारणात सहभागी होते. त्यामुळे लहानपणापासूनच बाळकडू मिळालेल्या आणि राजकीय वारसा लाभलेल्या आनंद परांजपे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. आनंद परांजपे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून नरेंद्र मोदींच्या हुकूमशाही विरोधातील ही लढाई असल्याचे परांजपे यांनी सांगितले.

ही विचारांची लढाई असून ठाण्याच्या विकासावर लक्ष केंदीत करणाऱ्या अनेक मुद्यावरची ही लढाई असल्याचे परांजपे यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही सम्यस्या विध्यमान खासदरकडून मांडण्यात आल्या नाही, याच सम्यस्या लोकांपर्यंत घेऊन जाणार असुन 100 टक्के मतदारांना बदल हवा असल्याचे यावेळी उमेदवार आनंद परांजपे यांनी बोलताना सांगितले.

तर मग पाहुयात काय म्हणाले ठाणे लोकसभा आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे
Byte आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार ठाणेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.