ETV Bharat / state

दबाव आणण्यासाठीच ठाकरे सरकारने विरोधीनेत्यांची सुरक्षा काढली - किरीट सोमय्या - चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात

महाराष्ट्रातील बंहुतांश नेत्याच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यावरून सोमैया यांनी टीका केली आहे.

kirit somaiya
दबाव आणण्यासाठीच ठाकरे सरकारने विरोधीनेत्यांची सुरक्षा काढली
author img

By

Published : Jan 11, 2021, 9:48 AM IST

ठाणे - एकामागून एक घोटाळे बाहेर पडत असल्याने ठाकरे सरकार घाबरले आहे. त्यामुळेच भाजपसह इतर विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. किरीट सोमैया हे एका घोटाळ्याचा पाठपुरावा करणासाठी टिटवाळ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली.

ठाकरे सरकारने विरोधीनेत्यांची सुरक्षा काढली - किरीट सोमय्या
ठाकरे सरकारची उडविली खिल्ली ..

यापूर्वी देखील त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भाजपचा कोणताही कार्यकर्ता ठाकरे सरकारला भीक घालत नाही, असे सांगत किरीट सोमैया यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडविली.

आमदार सरनाईक यांची जमीन ईडीने केली जप्त ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात समजला जाणाऱ्या आमदार प्रताप सरनाईक यांचा तिसरा घोटाळा समोर आला आहे. आमदार सरनाईक यांनी १०० कोटींचा जो घोटाळा केला. त्यामधून त्यांनी कल्याण तालुक्यात टिटवाळ्या नजीक 78.27 एकर जमीन खरेदी केली होती. आता ही संपूर्ण जमीन ईडीने जप्त केली आहे. तसेच देशातील नागरिकांची सुरक्षा आमच्या दृष्टीने महत्वाची असल्याचेही सोमैया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आमदार प्रताप सरनाईक यांची व त्यांच्या मुलांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. प्रताप सरनाईक यांनी कंगनाला थोबाडीत मारण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसातच प्रताप सरनाईक यांना ई़डीकडून नोटीस मिळाली होती.

ठाणे - एकामागून एक घोटाळे बाहेर पडत असल्याने ठाकरे सरकार घाबरले आहे. त्यामुळेच भाजपसह इतर विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. किरीट सोमैया हे एका घोटाळ्याचा पाठपुरावा करणासाठी टिटवाळ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली.

ठाकरे सरकारने विरोधीनेत्यांची सुरक्षा काढली - किरीट सोमय्या
ठाकरे सरकारची उडविली खिल्ली ..

यापूर्वी देखील त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भाजपचा कोणताही कार्यकर्ता ठाकरे सरकारला भीक घालत नाही, असे सांगत किरीट सोमैया यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडविली.

आमदार सरनाईक यांची जमीन ईडीने केली जप्त ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात समजला जाणाऱ्या आमदार प्रताप सरनाईक यांचा तिसरा घोटाळा समोर आला आहे. आमदार सरनाईक यांनी १०० कोटींचा जो घोटाळा केला. त्यामधून त्यांनी कल्याण तालुक्यात टिटवाळ्या नजीक 78.27 एकर जमीन खरेदी केली होती. आता ही संपूर्ण जमीन ईडीने जप्त केली आहे. तसेच देशातील नागरिकांची सुरक्षा आमच्या दृष्टीने महत्वाची असल्याचेही सोमैया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आमदार प्रताप सरनाईक यांची व त्यांच्या मुलांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. प्रताप सरनाईक यांनी कंगनाला थोबाडीत मारण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसातच प्रताप सरनाईक यांना ई़डीकडून नोटीस मिळाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.