ETV Bharat / state

बालपण जागृत करणारे वारकऱ्यांचे दिंडीतील खेळ

देहू-आळंदीहून पंढरपूरला वारीला निघालेल्या दिंड्यांमध्ये अनेक खेळ खेळले जातात. त्यापैकीच एक म्हणजे रिंगण सोहळ्यातील अध्यात्मिक खेळ. या खेळांना वारकऱ्यांच्या पायी प्रवासात मोलाचं स्थान आहे. म्हणून रिंगण सोहळा संपल्यानंतर प्रत्येक पालखी तळावर वारकरी हे मनोरंजनाचे खेळ खेळतात.

author img

By

Published : Jul 9, 2019, 3:20 PM IST

Updated : Jul 9, 2019, 9:02 PM IST

पारंपारिक खेळाचा आनंद लुटताना वारकरी

सोलापूर- देहू-आळंदीहून पंढरपूरला वारीला निघालेल्या दिंड्यांमध्ये अनेक खेळ खेळले जातात. त्यापैकीच एक म्हणजे रिंगण सोहळ्यातील अध्यात्मिक खेळ. या खेळांना वारकऱ्यांच्या पायी प्रवासात मोलाचं स्थान आहे. म्हणून रिंगण सोहळा संपल्यानंतर प्रत्येक पालखी तळावर वारकरी हे मनोरंजनाचे खेळ खेळले जातात.

बालपण जागृत करणारे वारकऱ्यांचे दिंडीतील खेळ


रिंगणात धावा पार करून तळावर फुगड्या खेळणाऱ्या महिला वारकऱ्यांना संसाराची ना चिंता आहे, ना कुटुंबाची त्या वारीचा आनंद घेतात. वारीत आल्यावर त्यांना एकच माहीत असते विठ्ठल-रुक्मिणीचे नामस्मरण करणे आणि पंढरपुरात दर्शन घेणे. त्यासाठी त्या वर्षनुवर्षे पायी पंढरीला जातात. मग पायी प्रवासाचा शिण जावा म्हणून त्या बालपण जागृत करणारे विविध खेळ खेळतात. त्यामध्ये टाळ, मृदंग, तुळशी वृदांवन, ठेका, फुगडी, हातावरच्या फुगड्या, झिम्मा फुगडी, तीन फुगडी, भोई फुगडी, कमरेवर हात ठेवून ताल, असे नयनरम्य खेळात वारकरी रमतात. वारी असो कि वारीतील विविध खेळ यामध्ये गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, तरूण-वृद्ध असा कोणताच भेदभाव नसतो.

पायी प्रवास करून थकल्यानंतर वारकरी रिंगणस्थळी विसावा घेतात. त्याच ठिकाणी सर्व दिंड्यातील वारकरी एकत्र येतात. हरी नामाचा गजर करतात. रिंगण सोहळा संपल्यानंतर मनोरंजनाचे हे असे खेळ सुरू होतात.

सोलापूर- देहू-आळंदीहून पंढरपूरला वारीला निघालेल्या दिंड्यांमध्ये अनेक खेळ खेळले जातात. त्यापैकीच एक म्हणजे रिंगण सोहळ्यातील अध्यात्मिक खेळ. या खेळांना वारकऱ्यांच्या पायी प्रवासात मोलाचं स्थान आहे. म्हणून रिंगण सोहळा संपल्यानंतर प्रत्येक पालखी तळावर वारकरी हे मनोरंजनाचे खेळ खेळले जातात.

बालपण जागृत करणारे वारकऱ्यांचे दिंडीतील खेळ


रिंगणात धावा पार करून तळावर फुगड्या खेळणाऱ्या महिला वारकऱ्यांना संसाराची ना चिंता आहे, ना कुटुंबाची त्या वारीचा आनंद घेतात. वारीत आल्यावर त्यांना एकच माहीत असते विठ्ठल-रुक्मिणीचे नामस्मरण करणे आणि पंढरपुरात दर्शन घेणे. त्यासाठी त्या वर्षनुवर्षे पायी पंढरीला जातात. मग पायी प्रवासाचा शिण जावा म्हणून त्या बालपण जागृत करणारे विविध खेळ खेळतात. त्यामध्ये टाळ, मृदंग, तुळशी वृदांवन, ठेका, फुगडी, हातावरच्या फुगड्या, झिम्मा फुगडी, तीन फुगडी, भोई फुगडी, कमरेवर हात ठेवून ताल, असे नयनरम्य खेळात वारकरी रमतात. वारी असो कि वारीतील विविध खेळ यामध्ये गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, तरूण-वृद्ध असा कोणताच भेदभाव नसतो.

पायी प्रवास करून थकल्यानंतर वारकरी रिंगणस्थळी विसावा घेतात. त्याच ठिकाणी सर्व दिंड्यातील वारकरी एकत्र येतात. हरी नामाचा गजर करतात. रिंगण सोहळा संपल्यानंतर मनोरंजनाचे हे असे खेळ सुरू होतात.

Intro:सोलापूर : देहू-आळंदीहून पंढरपूरला वारीला निघालेल्या दिंड्यांचे अनेक रंग आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रिंगण सोहळ्यातील अध्यात्मिक खेळ. या खेळांना वारकऱ्यांच्या पायी प्रवासात मोलाचं स्थान आहे.म्हणून रिंगण सोहळा संपल्यानंतर प्रत्येक पालखी तळावर वारकरी हे मनोरंजनाचे खेळ खेळतात...


Body:रिंगणात धावा पार करून तळावर फुगड्या या महिला वारकऱ्यां ना संसाराची चिंता आहे ना कुटुंबाची.आता त्यांना एकच माहीत आहे आपण वारीच्या दिंडीत विठ्ठलाचं दर्शन घेणं. त्यासाठी त्या वर्षनुवर्षे पायी पंढरीला जातात. मग पायी प्रवासाचा शिण जावा म्हणून त्या अशा
बालपण जागृत करणारे खेळ खेळतात...मग त्या खेळाचे निरनिराळे प्रकार आहेत.त्यांची नावंसुद्धा आताच्या नव्या पिढीला सांगता येणार नाहीत.पण या आजीचा हा उत्साह पाहिल्यावर तरुणाईला सुद्धा हेवा वाटतो....


Conclusion:पायी प्रवास करून थकल्यानंतर वारकरी रिंगणस्थळी विसाव्याला पोहतात..त्याच ठिकाणी सर्व दिंड्यातील वारकरी एकत्र येत एकरूप होत हरी नामाचा गजर करतात...रिंगण सोहळा संपल्यावर मग हे मनोरंजनाचे हे असे खेळ सुरु होतात....अन मग पुन्हा सुरु होतो पंढरीचा प्रवास....
Last Updated : Jul 9, 2019, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.