ETV Bharat / state

कशाचं सरकार अन् कशाचं काय, 85 वर्षांच्या आजोबांनी सांगितली दुष्काळाची दाहकता

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी किती होरपळला जात आहे, हे आजोबा सांगत आहेत. पोरं चांगली आहेत, म्हणून सांभाळतात, नाहीतर भीक मागायची वेळ आली असती असेही त्यांनी सांगितले.

author img

By

Published : May 15, 2019, 1:38 PM IST

Updated : May 15, 2019, 2:27 PM IST

शेतकरी गणपत जाधव

सोलापूर - "कशाचं सरकार नं कशाचं काय... वाईट दिवस आहेत. शेतकऱ्याला वाईट दिवस आहेत" हे वाक्य आहेत, 85 वर्षांच्या शेतकरी आजोबांचे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी किती होरपळला जात आहे, हे आजोबा सांगत आहेत. पोरं चांगली आहेत, म्हणून सांभाळतात, नाहीतर भीक मागायची वेळ आली आहे, असे म्हणत अंजनगावच्या गणपत जाधव यांनी दुष्काळाची दाहकता मांडली.

शेतकरी गणपत जाधव


लोकसभा निवडणुकीने तापलेल्या राजकीय वातावरणात राज्यातील भीषण दुष्काळ दिसत जरी नसला, तरी या दुष्काळाचे चटके मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खोलवर बसत आहेत. दुष्काळात शेतकरी आणि ग्रामीण जनता भरडून निघत आहे.


प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनावरांची आकडेवारी घेऊन गेले. मात्र प्रत्यक्षात चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. वर्षानुवर्षे कायमच दुष्काळी असलेल्या सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावण्या सोडल्या, तर सोलापूर जिल्ह्यात इतर कुठेही जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या नाहीत, अशा परिस्थितीत माढा तालुक्यातील अंजनगाव येथील 85 वर्षे वयाचे गणपतराव जाधव हे दुष्काळाबद्दल त्यांची भावना व्यक्त करताना म्हणतात की "वाईट दिवस आहेत, शेतकऱ्यांना, फार वाईट दिवस आहेत. शहरातील नोकरदारांना नियमित पगार मिळतो. मात्र शेतकऱ्यांनी दुष्काळात करायचं काय ? दोन एकर शेतात आठ 8 पायल्या ज्वारी आणि दोनशे पेंढी कडबा झाला. इतक्यात खायचं काय यायचं काय, हाच मोठा प्रश्न आहे. कशाच सरकार अन् कशाचं काय, आम्ही जुनी माणसं आहोत, आमचा भरोसा हा मेघराजावरच आहे. नाही तर सरकारची मदत पुढारी आणि इतर लोकच गडप करतात. बँकाचे हेलपाटे मारूनही हातात काही मिळत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


गणपतराव जाधव 85 वर्षाचे असून यापूर्वीही दुष्काळाचे चटके त्यांनी सोसले आहेत. मात्र पूर्वीच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याची उपलब्धता होती. मात्र यावर्षी दुष्काळात पाण्याचीच मोठी अडचण झाल्याचे गणपतराव जाधव सांगतात. यापूर्वीच्या दुष्काळात पाण्याची उपलब्धता असल्यामुळे काही प्रमाणात जनावरांना चारा मिळायचा. मात्र चालू वर्षीच्या दुष्काळात पाणीही नाही आणि चाराही नाही, अशी वाईट परिस्थिती यापूर्वी पाहिली नसल्याचे जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

सोलापूर - "कशाचं सरकार नं कशाचं काय... वाईट दिवस आहेत. शेतकऱ्याला वाईट दिवस आहेत" हे वाक्य आहेत, 85 वर्षांच्या शेतकरी आजोबांचे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी किती होरपळला जात आहे, हे आजोबा सांगत आहेत. पोरं चांगली आहेत, म्हणून सांभाळतात, नाहीतर भीक मागायची वेळ आली आहे, असे म्हणत अंजनगावच्या गणपत जाधव यांनी दुष्काळाची दाहकता मांडली.

शेतकरी गणपत जाधव


लोकसभा निवडणुकीने तापलेल्या राजकीय वातावरणात राज्यातील भीषण दुष्काळ दिसत जरी नसला, तरी या दुष्काळाचे चटके मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खोलवर बसत आहेत. दुष्काळात शेतकरी आणि ग्रामीण जनता भरडून निघत आहे.


प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनावरांची आकडेवारी घेऊन गेले. मात्र प्रत्यक्षात चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. वर्षानुवर्षे कायमच दुष्काळी असलेल्या सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावण्या सोडल्या, तर सोलापूर जिल्ह्यात इतर कुठेही जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या नाहीत, अशा परिस्थितीत माढा तालुक्यातील अंजनगाव येथील 85 वर्षे वयाचे गणपतराव जाधव हे दुष्काळाबद्दल त्यांची भावना व्यक्त करताना म्हणतात की "वाईट दिवस आहेत, शेतकऱ्यांना, फार वाईट दिवस आहेत. शहरातील नोकरदारांना नियमित पगार मिळतो. मात्र शेतकऱ्यांनी दुष्काळात करायचं काय ? दोन एकर शेतात आठ 8 पायल्या ज्वारी आणि दोनशे पेंढी कडबा झाला. इतक्यात खायचं काय यायचं काय, हाच मोठा प्रश्न आहे. कशाच सरकार अन् कशाचं काय, आम्ही जुनी माणसं आहोत, आमचा भरोसा हा मेघराजावरच आहे. नाही तर सरकारची मदत पुढारी आणि इतर लोकच गडप करतात. बँकाचे हेलपाटे मारूनही हातात काही मिळत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


गणपतराव जाधव 85 वर्षाचे असून यापूर्वीही दुष्काळाचे चटके त्यांनी सोसले आहेत. मात्र पूर्वीच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याची उपलब्धता होती. मात्र यावर्षी दुष्काळात पाण्याचीच मोठी अडचण झाल्याचे गणपतराव जाधव सांगतात. यापूर्वीच्या दुष्काळात पाण्याची उपलब्धता असल्यामुळे काही प्रमाणात जनावरांना चारा मिळायचा. मात्र चालू वर्षीच्या दुष्काळात पाणीही नाही आणि चाराही नाही, अशी वाईट परिस्थिती यापूर्वी पाहिली नसल्याचे जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

Intro:नोट- ही बातमी विशेष बातमी म्हणून वापरावी ही विनंती.
विशेष चा टॅग लावावा ही विनंती....


R_MH_SOL_15_MAY_2019_DUSHKAL_HUMAN_INTEREST_S_PAWAR

कशाचं सरकार अनं कशाचं काय,
85 वर्षाचे आजोबा सांगतायेत दुष्काळाची दाहकता
सोलापूर-
"कशाचं सरकार नं कशाचं काय... वाईट दिवस आहेत शेतकऱ्याला वाईट दिवस आहेत" हे वाक्य आहेत 85 वर्षाच्या शेतकरी आजोबांचे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी किती होरपळून निघत चालला आहे हे आजोबा सांगत होते. पोरं चांगली आहेत म्हणून सांभाळतात नाहीतर भीक मागायची वेळ आली आहे भीक मागायची वेळ असे म्हणत अंजनगावच्या गणपत जाधव यांनी दुष्काळचे वास्तव मांडले. पाहू या स्पेशल रिपोर्ट .....




Body:लोकसभा निवडणुकीच्या तापलेल्या राजकीय वातावरणात राज्यातील भीषण दुष्काळ दिसत जरी नसला तरी या दुष्काळाचे चटके मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खोलवर बसत आहेत. दुष्काळात शेतकरी आणि ग्रामीण जनता भरडून निघत असताना या दुष्काळी परिस्थितीकडे कोणालाही ही गांभीर्याने पहावसं वाटते की नाही असा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुष्काळ पाहिल्यावर पडतो आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांनी जनावरांची ची आकडेवारी घेऊन गेले मात्र प्रत्यक्षात चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत वर्षानुवर्षे कायमच दुष्काळी असलेल्या सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावण्या सोडल्या तर सोलापूर जिल्ह्यात इतर कुठेही ही जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या नाहीत अशा परिस्थितीत माढा तालुक्यातील अंजनगाव येथील 85 वर्षे वयाचे गणपतराव जाधव हे दुष्काळाबद्दल त्यांची भावना व्यक्त करताना म्हणतात की "वाईट दिवस आहेत शेतकऱ्यांना फार वाईट दिवस आहेत शहरातील नोकरदारांना चार आणि का होईना पण नियमित मिळतात मात्र शेतकऱ्यांनी दुष्काळात करायचं काय दोन एकर शेतात आठ पहिले ज्वारी आणि दोनशे कडबा झालाय इतक्यात म्हातारी म्हातारी म्हातारी न खायचं काय यायचं काय हाच मोठा प्रश्न आहे. कशाचा सरकारनं कशाचं काय आम्ही जुनी माणस आहोत आमचा भरोसा हा मेघराजा वरच आहे नाहीतर कुठलं सरकार सरकारची मदत पुढारी आणि इतर जणच गडप करतात आणि बँकाचे हेलपाटे मारून हातात काही मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्याला वाईट दिवस आहेत. पोरं चांगली आहेत म्हणून सांभाळ करतात नाहीतर भीक मागायची वेळ आहे" असे सांगत गणपतराव जाधव यांनी दुष्काळाचे वास्तव मांडले.

गणपतराव जाधव 85 वर्षांच्या असून यापूर्वीही ही दुष्काळाची चटके त्यांनी सोसले आहेत मात्र पूर्वीच्या दुष्काळी परिस्थितीत तीत पाण्याची उपलब्धता होती मात्र यावर्षी दुष्काळात पाण्याचीच मोठी अडचण झाल्याचे गणपतराव जाधव सांगतात यापूर्वीच्या दुष्काळात पाण्याची उपलब्धता असल्यामुळे काही प्रमाणात जनावरांना चारा मिळायचा मात्र चालू वर्षीच्या दुष्काळात पाणीही नाही आणि चारही नाही ही अशी वाईट परिस्थिती यापूर्वी पाहिली नसल्याचे जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
शहरातल्या लोकांना दर महिन्याला चार आणे का होईना पण ठराविक रक्कम मिळते मात्र शेतकरी हा पूर्णपणे भरवशाचा झाला असून तो पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्याचेही ही या आजोबांनी सांगितले आहे.


Conclusion:बाईट- गणपतराव जाधव
Last Updated : May 15, 2019, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.