ETV Bharat / state

मायबाप सरकारने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडे लक्ष द्यावे, महिलांची मागणी

सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विधवांचे शासकीय कार्यालयातील काम रखडले आहे. वेगवेगळ्या योजनांमधून मिळणाऱ्या शासकीय मदतीसाठी कार्यालयातून कागदपत्रांसाठी तगादा लावण्याचे काम सुरू आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत व्हावी यासाठी शासकीय यंत्रणानी अडवणूक करू नये, अशी मागणी या विधवा महिलांनी केली आहे.

author img

By

Published : Dec 19, 2019, 10:57 AM IST

solapur
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाने मदत करण्याची मागणी करताना महिला

सोलापूर - आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडे सरकारने थोडे तरी लक्ष द्यावे, अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांनी केली आहे. सरकारच्या असलेल्या योजना विधवा शेतकरी महिलांना मिळाव्यात यासाठी शासकीय कार्यालयाच्या वारंवार चकरा माराव्या लागतात. तरीही काम होत नसल्याने शेतकरी विधवा महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाने मदत करण्याची मागणी करताना शेतकरी महिला

बार्शी तालुक्यातील राजश्री पाटील या विधवा शेतकरी महिला असून त्यांनी घरकुलासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यांच्या घरकुलाचा अर्ज मान्य होत नाही. गावपातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत अनेकदा चकरा मारून देखील त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. राजश्री पाटील यांच्या शेतकरी पतीने २०१५ मध्ये आत्महत्या केली. त्यांना २ एकर शेती आहे. मात्र, शेती असूनही ती उपयोगाची नसल्याने, पतीच्या निधनानंतर त्या दुसऱ्याच्या शेतावर जाऊन शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून कुटुंब, शाळा यांचा भार त्यांच्या डोक्यावर आहे. त्या सध्या दुसऱ्याच्या घरात राहतात. स्वतःचे घर मिळवण्यासाठी त्यांनी घरकुलासाठी अर्ज केला होता, मात्र त्यांचे घरकुल काही केल्या मंजूर होत नाही आहे.

हेही वाचा - शांतलिंगेश्वर महास्वामींच्या सानिध्यात 4 लमाण तांडे दारूमुक्त

राजश्री या एकट्या नाहीत तर सोलापूर जिल्ह्यातील अशा अनेक शेतकऱ्यांच्या विधवांचे शासकीय कार्यालयातील काम रखडले आहे. वेगवेगळ्या योजनांमधून मिळणाऱ्या शासकीय मदतीसाठी शासकीय कार्यालयातून कागदपत्रांसाठी तगादा लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप या विधवा महिलांनी केला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत व्हावी यासाठी शासकीय यंत्रणानी अडवणूक करू नये, अशी मागणी या विधवा महिलांनी केली आहे. सोलापुरातील प्रार्थना फाउंडेशन ही संस्था येथे काम करत आहे. या फाउंडेशनच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील समस्येवर एक अहवाल तयार करून तो प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. या विधवा महिलांना शासकीय योजना मिळाव्यात यासाठी प्रार्थना फाउंडेशन देखील काम करत आहेत.

हेही वाचा - ६३ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा : माऊली जमदाडे, अक्षय मंगवडे करणार सोलापूरचं प्रतिनिधित्व

सोलापूर - आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडे सरकारने थोडे तरी लक्ष द्यावे, अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांनी केली आहे. सरकारच्या असलेल्या योजना विधवा शेतकरी महिलांना मिळाव्यात यासाठी शासकीय कार्यालयाच्या वारंवार चकरा माराव्या लागतात. तरीही काम होत नसल्याने शेतकरी विधवा महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाने मदत करण्याची मागणी करताना शेतकरी महिला

बार्शी तालुक्यातील राजश्री पाटील या विधवा शेतकरी महिला असून त्यांनी घरकुलासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यांच्या घरकुलाचा अर्ज मान्य होत नाही. गावपातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत अनेकदा चकरा मारून देखील त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. राजश्री पाटील यांच्या शेतकरी पतीने २०१५ मध्ये आत्महत्या केली. त्यांना २ एकर शेती आहे. मात्र, शेती असूनही ती उपयोगाची नसल्याने, पतीच्या निधनानंतर त्या दुसऱ्याच्या शेतावर जाऊन शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून कुटुंब, शाळा यांचा भार त्यांच्या डोक्यावर आहे. त्या सध्या दुसऱ्याच्या घरात राहतात. स्वतःचे घर मिळवण्यासाठी त्यांनी घरकुलासाठी अर्ज केला होता, मात्र त्यांचे घरकुल काही केल्या मंजूर होत नाही आहे.

हेही वाचा - शांतलिंगेश्वर महास्वामींच्या सानिध्यात 4 लमाण तांडे दारूमुक्त

राजश्री या एकट्या नाहीत तर सोलापूर जिल्ह्यातील अशा अनेक शेतकऱ्यांच्या विधवांचे शासकीय कार्यालयातील काम रखडले आहे. वेगवेगळ्या योजनांमधून मिळणाऱ्या शासकीय मदतीसाठी शासकीय कार्यालयातून कागदपत्रांसाठी तगादा लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप या विधवा महिलांनी केला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत व्हावी यासाठी शासकीय यंत्रणानी अडवणूक करू नये, अशी मागणी या विधवा महिलांनी केली आहे. सोलापुरातील प्रार्थना फाउंडेशन ही संस्था येथे काम करत आहे. या फाउंडेशनच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील समस्येवर एक अहवाल तयार करून तो प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. या विधवा महिलांना शासकीय योजना मिळाव्यात यासाठी प्रार्थना फाउंडेशन देखील काम करत आहेत.

हेही वाचा - ६३ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा : माऊली जमदाडे, अक्षय मंगवडे करणार सोलापूरचं प्रतिनिधित्व

Intro:नोट- सोबत तयार पॅकेज पाठविले आहे.

mh_sol_01_farmer_widow_7201168
मायबाप सरकारने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडे लक्ष द्यावे, विधवा शेतकरी महिलाचे शासकीय कार्यालयात हेलपाटे
सोलापूर-
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडे मायबाप सरकारने थोडी तरी लक्ष द्यावे अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांनी केले आहे शासनाच्या असलेल्या योजना विधवा शेतकरी महिलांना मिळाव्यात यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबर्डे अजून देखील शेवटी मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे शेतकरी विधवा महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.






Body:शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला
बार्शी तालुक्यातील राजश्री पाटील या विधवा शेतकरी महिला असून त्यांनी घरकुलासाठी अर्ज केला आहे मात्र त्यांच्या घरकुलाचा अर्ज म्हणजे होत नाही गावपातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत अनेक येरझारा मारून देखील त्यांच्या पदरी निराशाच आली आहे राजश्री पाटील यांच्या शेतकरी पतीने 2015 मध्ये आत्महत्या केली त्यांना दोन एकर शेती आहे मात्र शेती असून ते शेतीचा उपयोग नाही पतीच्या निधनानंतर राजश्री पाटील या दुसऱ्याच्या शेतावर जाऊन शेतमजुरी करतात आणि उदरनिर्वाह चालवतात त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये असून कुटुंबाचा शाळा चालवत असताना त्या सध्या दुसऱ्याच्या घरात राहतात त्यांना स्वतःचे घर मिळवण्यासाठी त्यांनी घरकुलासाठी अर्ज केला मात्र त्यांचे घरकुल काहीकेल्या मंजूर होत नाही.
राजश्री पाटील या एकटेच नाहीत तर सोलापूर जिल्ह्यातील अशा अनेक शेतकऱ्यांच्या विधवांचे शासकीय कार्यालयात काम होत नाहीत वेगवेगळे योजनांमधून त्यांना काही शासकीय मदत पाहिजे असल्यास शासकीय कार्यालयातून कागदपत्रांसाठी तगादा लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप या शेतकऱ्यांच्या विधवा महिलांनी केला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत व्हावी यासाठी शासकीय यंत्रणानी अडवणूक करू नये अशी मागणी या विधवा महिलांनी केली आहे. सोलापुरातील प्रार्थना फाउंडेशन ही संस्था काम करत आहे. प्रार्थना फाउंडेशनच्या वतीने आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील समस्येवर एक अहवाल तयार करून तो प्रशासनाला सादर केला आहे. या विधवा महिलांना शासकीय योजना मिळाव्यात यासाठी प्रार्थना फाउंडेशन देखील काम करत आहेत.




Conclusion:बाईट- राज्यश्री पाटील, विधवा
बाईट- प्रसाद मोहिते, प्रार्थना फाउंडेशन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.