ETV Bharat / state

कांदा दर पाडल्यामुळे शेतकरी संतप्त; शेतकऱ्यांची मीडिया आणि सोशल मीडियावर आगपाखड

author img

By

Published : Dec 8, 2019, 9:36 AM IST

सोलापूर बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

solapur
सोलापूर कांदा बाजार

सोलापूर- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचा दर पाडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. २० हजार रुपये प्रति क्विंटल कांदा विक्रीची बातमी माध्यमातून तसेच सोशल मीडियायात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. त्यामुळे कांद्याची आवक वाढली आणि कांद्याच्या दरात घट झाली. मात्र, दर कमी होण्यामागे व्यापाऱ्यांचा हात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर, शेतकऱ्यांनी याबाबत मीडियावरही आगपाखड केली आहे.

प्रतिक्रिया देताना शेतकरी

कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सरासरी ६ ते ८ हजारापर्यंत विकला गेलेला कांदा शनिवारी मात्र ४ ते ५ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला. सोलापूर बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच सोलापुरात २० हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कांदा विक्रीस गेल्याच्या बातम्या माध्यमातून तसेच सोशल मीडियातून पसरल्या. त्यामुळे कांद्याचे दर पडले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी माध्यम आणि सोशल मीडियावरही आग पाखड केली.

२० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याच्या बातमीने सोशल मीडियावर हाहाकार माजवला होता. त्यामुळे सोलापूरच्या बाजारात चक्क बेंगलोरचा कांदा देखील विक्रीसाठी आला होता. शनिवारी बाजारात कांद्याची प्रचंड आवक झाल्यामुळे कांदा उतरून घ्यायला देखील बराच वेळ लागला. बाजारातील कांद्याची आवक लक्षात घेता व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक दर पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गुरुवारी फक्त ३ क्विंटल कांद्याला २० हजार रुपयांचा दर देऊन त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा घडवून आणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढविण्यात आली. आणि नंतर बाजार पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

हही वाचा- लोकमंगल साहित्य पुरस्काराचे 'हे' आहेत यंदाचे मानकरी

सोलापूर- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचा दर पाडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. २० हजार रुपये प्रति क्विंटल कांदा विक्रीची बातमी माध्यमातून तसेच सोशल मीडियायात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. त्यामुळे कांद्याची आवक वाढली आणि कांद्याच्या दरात घट झाली. मात्र, दर कमी होण्यामागे व्यापाऱ्यांचा हात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर, शेतकऱ्यांनी याबाबत मीडियावरही आगपाखड केली आहे.

प्रतिक्रिया देताना शेतकरी

कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सरासरी ६ ते ८ हजारापर्यंत विकला गेलेला कांदा शनिवारी मात्र ४ ते ५ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला. सोलापूर बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच सोलापुरात २० हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कांदा विक्रीस गेल्याच्या बातम्या माध्यमातून तसेच सोशल मीडियातून पसरल्या. त्यामुळे कांद्याचे दर पडले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी माध्यम आणि सोशल मीडियावरही आग पाखड केली.

२० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याच्या बातमीने सोशल मीडियावर हाहाकार माजवला होता. त्यामुळे सोलापूरच्या बाजारात चक्क बेंगलोरचा कांदा देखील विक्रीसाठी आला होता. शनिवारी बाजारात कांद्याची प्रचंड आवक झाल्यामुळे कांदा उतरून घ्यायला देखील बराच वेळ लागला. बाजारातील कांद्याची आवक लक्षात घेता व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक दर पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गुरुवारी फक्त ३ क्विंटल कांद्याला २० हजार रुपयांचा दर देऊन त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा घडवून आणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढविण्यात आली. आणि नंतर बाजार पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

हही वाचा- लोकमंगल साहित्य पुरस्काराचे 'हे' आहेत यंदाचे मानकरी

Intro:mh_sol_05_farmer_on_onion_rate_7201168

व्यापाऱ्यांनी कांदा दर पाडल्यामुळे शेतकरी संतप्त,
मीडिया आणि सोशल मीडियावरही आगपाखड

सोलापूर-
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचा दर पाडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. 20 हजार रुपये प्रति क्विंटल कांदा विकला च्या बातम्या माध्यमातून तसेच सोशल मीडियावर ही ही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यामुळे कांद्याची आवक वाढली आणि त्याचा परिणाम कांद्याचे दर पावसाळ्यात झाला असल्यामुळे शेतकऱ्यांनी माध्यम आधी सोशल मीडियावर देखील आग पाखड केली आहे.





Body:सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शनिवारी कांद्याचे दर पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. गुरुवारी सरासरी सहा ते आठ हजारापर्यंत विकला गेलेला कांदा शनिवारी मात्र चार ते 5000 रुपये प्रति क्विंटल दराने विकलाय. सोलापूर बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तसेच सोलापुरात 20 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कांदा विकला गेल्याच्या बातम्या माध्यमातून आल्यामुळे तसेच सोशल मीडियामध्ये देखील 20000 रुपये दराची मोठी चर्चा झाल्यामुळे कांद्याचा दर पडले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत माध्यम आणि सोशल मीडियावर देखील आग पाखड केली आहे.
सोलापुरात कांद्याला सर्वाधिक 20 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याच्या बातमीने सोशल मीडियावर हाहाकार उडवून दिला. सोलापूरच्या बाजारात चक्क बेंगलोर चा कांदा देखील विक्रीसाठी आला शनिवारी बाजारात कांद्याची प्रचंड आवक झाल्यामुळे कांदा उतरून घ्यायला देखील बराच वेळ लागला होता बाजारातील कांद्याची आवक लक्षात घेता व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक दर पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे गुरुवारी फक्त तीन क्विंटल खांद्याला वीस हजार रुपयांचा दर देऊन या दराची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा घडवून आणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढवली आणि नंतर बाजार पाडल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

गुरुवारी सर्वसाधारण सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल विकला जाणारा कांदा शनिवारी मात्र चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आलो आहे मीडिया आणि सोशल मीडियावर सोलापुरात कांद्याचे दर वीस हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेले असल्याच्या बातम्या आल्यामुळे सोलापूर बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे आवक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी दर पाडल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलाय.



Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.