ETV Bharat / state

शेतकर्‍याने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली गांजा लागवडीची परवानगी

author img

By

Published : Aug 26, 2021, 5:51 PM IST

Updated : Aug 26, 2021, 6:56 PM IST

मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील एका शेतकऱ्याने गांजाची शेती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (26 ऑगस्ट) निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

farmer
शेतकरी

सोलापूर - मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील एका शेतकऱ्याने गांजाची शेती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (26 ऑगस्ट) निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच सकून गायकवाड यांनीदेखील यापूर्वी टोमॅटोला मिळालेल्या भावाला कंटाळून गांजाचे पीक पिकवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.

माहिती देताना शेतकरी

शेतकऱ्यांना कधी कोणते पीक आर्थिक लाभ मिळवून देईल तर कधी कोणते पीक डोळ्यात अश्रू आणेल हे काही सांगता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राबून टोमॅटो पिकाची लागवड केली. परंतु, त्याच पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी टोमॅटोच्या पिकाने अडचणीत आला आहे. बाजारात टोमॅटोची विक्री कवडीमोल दराने होत असल्याने मार्केटमधून घराकडे येत असताना अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचे पाहायला मिळाले.

  • सोलापुरात टोमॅटोचे दर कोलमडले-

सोलापूर जिल्ह्यात टोमॅटोची लागवड जास्त प्रमाणात झाली आहे. या टोमॅटोच्या पिकाला चांगला भाव येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरले आहे. बाजारात या टोमॅटोची विक्री ३ ते ४ रुपये किलो दराने होत असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात न विकताच घराकडे परत आणत असताना रस्त्याच्या कडेला हजारो टन टोमॅटो फेकून दिली आहेत.

  • गांजा पिकाची लागवड करण्याची शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी -

शेती पिकाला हमी भाव नसल्याने शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला आहे. सोलापूरच्या एका शेतकऱ्याने गांजा पिकाची लागवड करण्याची परवानगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मागितली आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कोणते पीक घ्यावे त्याला हमी भाव मिळेल हे सांगता येत नसल्याने हमीभाव असलेला गांजा पिकवण्याची परवानगी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने मागितली आहे. माझ्या मालकीच्या शेतात दोन एकर गांजा लावण्यास परवानगी मिळावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना या शेतकऱ्याने दिल्याने याची एकच चर्चा सोलापूर जिल्ह्यातील गावागावात सुरू आहे. अनिल आबाजी पाटील यांची सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर येथे स्वत:च्या मालकीची जमीन गट नं १८१/४ असून, या क्षेत्रात दोन एकर गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी असे निवेदन जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला त्यांनी लेखी दिले आहे.

हेही वाचा - पुण्यात म्हैस उधळून दुचाकीवरील पती-पत्नी जखमी, घटना CCTVमध्ये कैद

  • लॉकडाऊनचा शेतकऱ्यांना जबरदस्त फटका -

गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टरबूज, कलिंगड कवडीमोल दराने विकल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी अनेक उभी पिके शेतात गाडून टाकली होती. लॉकडाऊनने शेतकरी अडचणीत आले असताना टोमॅटोच्या पिकाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

  • टोमॅटो तोडणाऱ्यांना मजुरी देखील देण्याचे पैसे नाहीत -

सुकून गायकवाड या शेतकऱ्याने माहिती देताना सांगितले की, मोहोळ-बार्शी रोडला माझी शेती असून एक एकर टोमॅटोची लागवड केली आहे. यासाठी मला सव्वा लाख रुपये खर्च आला आहे. बाजारात टोमॅटोची ३ ते ४ रुपये दराने विक्री होत असल्याने ती शेतातच खराब होत आहे. आमच्याकडे टोमॅटो तोडणाऱ्या मजुरांना देण्यासाठी पैसे देखील नाहीत, असे ते सांगतात.

  • गांजाची शेती केली तर पोलीस पकडतात -

रात्रंदिवस शेतात कष्ट करूनही शेतकऱ्यांना फळ मिळत नाही. शेतकऱ्यांना वालीच उरला नाही. व्यापाऱ्यांच्या टोमॅटोच्या एका कॅरेटला १० रुपये भाडे आहे. आम्ही शेतात केलेले कष्ट वायपट मातीत चालले आहे. लाख-सव्वा लाख रुपये मातीत गेले आहेत. नुसता भाव आला-आला म्हणतात पण ऊस, केळी, द्राक्ष याही पिकांची तीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी पीक घ्यावे कोणते असा प्रश्न निर्माण झाला आहे. गांजाची शेती करावे म्हटले तर पोलीस लगेच पकडायला येतात, अशी खंत मोहोळ येथील एका शेतकऱ्याने व्यक्त केली.

हेही वाचा - जुने व्हायरस पुन्हा आलेत, त्यांचा बंदोबस्त करावा लागेल - उद्धव ठाकरे

सोलापूर - मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील एका शेतकऱ्याने गांजाची शेती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (26 ऑगस्ट) निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच सकून गायकवाड यांनीदेखील यापूर्वी टोमॅटोला मिळालेल्या भावाला कंटाळून गांजाचे पीक पिकवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.

माहिती देताना शेतकरी

शेतकऱ्यांना कधी कोणते पीक आर्थिक लाभ मिळवून देईल तर कधी कोणते पीक डोळ्यात अश्रू आणेल हे काही सांगता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राबून टोमॅटो पिकाची लागवड केली. परंतु, त्याच पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी टोमॅटोच्या पिकाने अडचणीत आला आहे. बाजारात टोमॅटोची विक्री कवडीमोल दराने होत असल्याने मार्केटमधून घराकडे येत असताना अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचे पाहायला मिळाले.

  • सोलापुरात टोमॅटोचे दर कोलमडले-

सोलापूर जिल्ह्यात टोमॅटोची लागवड जास्त प्रमाणात झाली आहे. या टोमॅटोच्या पिकाला चांगला भाव येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरले आहे. बाजारात या टोमॅटोची विक्री ३ ते ४ रुपये किलो दराने होत असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात न विकताच घराकडे परत आणत असताना रस्त्याच्या कडेला हजारो टन टोमॅटो फेकून दिली आहेत.

  • गांजा पिकाची लागवड करण्याची शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी -

शेती पिकाला हमी भाव नसल्याने शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला आहे. सोलापूरच्या एका शेतकऱ्याने गांजा पिकाची लागवड करण्याची परवानगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मागितली आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कोणते पीक घ्यावे त्याला हमी भाव मिळेल हे सांगता येत नसल्याने हमीभाव असलेला गांजा पिकवण्याची परवानगी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने मागितली आहे. माझ्या मालकीच्या शेतात दोन एकर गांजा लावण्यास परवानगी मिळावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना या शेतकऱ्याने दिल्याने याची एकच चर्चा सोलापूर जिल्ह्यातील गावागावात सुरू आहे. अनिल आबाजी पाटील यांची सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर येथे स्वत:च्या मालकीची जमीन गट नं १८१/४ असून, या क्षेत्रात दोन एकर गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी असे निवेदन जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला त्यांनी लेखी दिले आहे.

हेही वाचा - पुण्यात म्हैस उधळून दुचाकीवरील पती-पत्नी जखमी, घटना CCTVमध्ये कैद

  • लॉकडाऊनचा शेतकऱ्यांना जबरदस्त फटका -

गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टरबूज, कलिंगड कवडीमोल दराने विकल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी अनेक उभी पिके शेतात गाडून टाकली होती. लॉकडाऊनने शेतकरी अडचणीत आले असताना टोमॅटोच्या पिकाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

  • टोमॅटो तोडणाऱ्यांना मजुरी देखील देण्याचे पैसे नाहीत -

सुकून गायकवाड या शेतकऱ्याने माहिती देताना सांगितले की, मोहोळ-बार्शी रोडला माझी शेती असून एक एकर टोमॅटोची लागवड केली आहे. यासाठी मला सव्वा लाख रुपये खर्च आला आहे. बाजारात टोमॅटोची ३ ते ४ रुपये दराने विक्री होत असल्याने ती शेतातच खराब होत आहे. आमच्याकडे टोमॅटो तोडणाऱ्या मजुरांना देण्यासाठी पैसे देखील नाहीत, असे ते सांगतात.

  • गांजाची शेती केली तर पोलीस पकडतात -

रात्रंदिवस शेतात कष्ट करूनही शेतकऱ्यांना फळ मिळत नाही. शेतकऱ्यांना वालीच उरला नाही. व्यापाऱ्यांच्या टोमॅटोच्या एका कॅरेटला १० रुपये भाडे आहे. आम्ही शेतात केलेले कष्ट वायपट मातीत चालले आहे. लाख-सव्वा लाख रुपये मातीत गेले आहेत. नुसता भाव आला-आला म्हणतात पण ऊस, केळी, द्राक्ष याही पिकांची तीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी पीक घ्यावे कोणते असा प्रश्न निर्माण झाला आहे. गांजाची शेती करावे म्हटले तर पोलीस लगेच पकडायला येतात, अशी खंत मोहोळ येथील एका शेतकऱ्याने व्यक्त केली.

हेही वाचा - जुने व्हायरस पुन्हा आलेत, त्यांचा बंदोबस्त करावा लागेल - उद्धव ठाकरे

Last Updated : Aug 26, 2021, 6:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.