ETV Bharat / state

जातीय हिंसाचाराविरोधात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

author img

By

Published : Jun 15, 2020, 7:42 PM IST

मागण्या मान्य न झाल्यास लॉकडाऊन उठवल्यानंतर आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल, असे निवेदनात म्हटले आहे. सध्या संघटनेचे ऑनलाइन आंदोलन सुरू आहे.

Satyashodhak Vidyarthi sanghatna
Satyashodhak Vidyarthi sanghatna

सिंधुदुर्ग - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वाढत चाललेली हिंसा व अत्याचार रोखण्याच्या अनुषंगाने सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि कणकवलीत तहसीलदार आर. जे. पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित पेडणेकर, राहुल कदम, सिद्धार्थ पेडणेकर, रितेश तांबे, समीर तांबे, विवेक ताम्हणकर, स्वाती तेली आदी उपस्थित होते.

देशात लॉकडाऊन असताना दलित, आदिवासी, स्त्रिया, भटकेविमुक्त, कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. हिंसा व अत्याचार प्रकरणी शासन यंत्रणेची व पोलिसांची भूमिका अत्याचारी जातीयवादी लोकांचे मनोबले वाढवणारी असते. हे रोखले गेले पाहिजे. पोलीस तपास व पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मुद्दामहून त्रुटी ठेवल्या जातात. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत गुन्हेगार मोकाट सुटतो, असे प्रकार रोखले गेले पाहिजेत. यासाठी कडक कायदा करण्यात यावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

भारतीय संविधान अनुच्छेद-15 नुसार कायद्याने जातीभेद करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. जातीय झुंडशाहित निर्माण होणारे 'ऑनर किल्लिंग' सारखे प्रकार रोखावेत. जातीय द्वेषावरून दलितांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबवावेत. शिक्षण प्रणालीमध्ये निर्माण झालेली फॅसिस्ट ब्राह्मणी भांडवली व्यवस्था नष्ट करावी. देविका बालकृष्णन यांची भांडवली शिक्षण व्यवस्थेने केलेल्या हिंसेची भरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

त्याचबरोबर, दिल्ली हिंसाचाराच्या खोट्या आरोपाखाली अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची त्वरीत सुटका करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास लॉकडाऊन उठवल्यानंतर आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल, असे निवेदनात म्हटले आहे. सध्या संघटनेचे ऑनलाइन आंदोलन सुरू आहे.

सिंधुदुर्ग - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वाढत चाललेली हिंसा व अत्याचार रोखण्याच्या अनुषंगाने सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि कणकवलीत तहसीलदार आर. जे. पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित पेडणेकर, राहुल कदम, सिद्धार्थ पेडणेकर, रितेश तांबे, समीर तांबे, विवेक ताम्हणकर, स्वाती तेली आदी उपस्थित होते.

देशात लॉकडाऊन असताना दलित, आदिवासी, स्त्रिया, भटकेविमुक्त, कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. हिंसा व अत्याचार प्रकरणी शासन यंत्रणेची व पोलिसांची भूमिका अत्याचारी जातीयवादी लोकांचे मनोबले वाढवणारी असते. हे रोखले गेले पाहिजे. पोलीस तपास व पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मुद्दामहून त्रुटी ठेवल्या जातात. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत गुन्हेगार मोकाट सुटतो, असे प्रकार रोखले गेले पाहिजेत. यासाठी कडक कायदा करण्यात यावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

भारतीय संविधान अनुच्छेद-15 नुसार कायद्याने जातीभेद करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. जातीय झुंडशाहित निर्माण होणारे 'ऑनर किल्लिंग' सारखे प्रकार रोखावेत. जातीय द्वेषावरून दलितांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबवावेत. शिक्षण प्रणालीमध्ये निर्माण झालेली फॅसिस्ट ब्राह्मणी भांडवली व्यवस्था नष्ट करावी. देविका बालकृष्णन यांची भांडवली शिक्षण व्यवस्थेने केलेल्या हिंसेची भरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

त्याचबरोबर, दिल्ली हिंसाचाराच्या खोट्या आरोपाखाली अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची त्वरीत सुटका करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास लॉकडाऊन उठवल्यानंतर आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल, असे निवेदनात म्हटले आहे. सध्या संघटनेचे ऑनलाइन आंदोलन सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.