ETV Bharat / state

चार दिवसात शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावण्या सुरू करणार - पालकमंत्री विजय शिवतारे

जिल्ह्यात शेळ्या मेंढ्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न शेतकरी व मेंढपाळांना समोर उभा राहिला आहे. यावरती जलसंपदा मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी प्रस्ताव आल्यास चार दिवसात शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी मंजूर करणार असल्याचे सांगितले.

author img

By

Published : Jun 9, 2019, 8:46 PM IST

पालकमंत्री विजय शिवतारे

सातारा- जिल्ह्यातील दुष्काळी भागात जनावरांच्या चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या. मात्र, आता शेळ्या मेंढ्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न शेतकरी व मेंढपाळांना समोर उभा राहिला आहे. यावरती जलसंपदा मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी प्रस्ताव आल्यास चार दिवसात शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी मंजूर करणार असल्याचे सांगितले.

तसेच शेळ्या मेढ्यांना लागणारे कडवळ, ओला चारा या सर्व बाबींचा विचार करून लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या प्रस्तावाची माहिती घेतली जाईल. त्यानंतर चारा छावण्या सुरू करण्यात येतील, अशी माहिती विजय शिवतारे यांनी दिली आहे.

ई-टीव्ही भारत सोबत चर्चा करताना जलसंपदा मंत्री विजय शिवतारे.

शासनाच्या परिपत्ररानुसार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची 'फी' माफी करण्यात आली आहे. मात्र, या संदर्भात विद्यापीठ प्रशासन व महाविद्यालय कोणतीही भूमिका घेत नाही. यासंदर्भात बोलताना शिवतारे यांनी सांगितले की शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भेटून यावरती चर्चा करणार आहे. तसेच ज्या मुलांनी आधीच जास्त फी आहे त्यांची 'फी' माघारी देण्यासाठी प्रयत्न करू असे शिवतारे यांनी सांगितले.

सातारा- जिल्ह्यातील दुष्काळी भागात जनावरांच्या चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या. मात्र, आता शेळ्या मेंढ्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न शेतकरी व मेंढपाळांना समोर उभा राहिला आहे. यावरती जलसंपदा मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी प्रस्ताव आल्यास चार दिवसात शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी मंजूर करणार असल्याचे सांगितले.

तसेच शेळ्या मेढ्यांना लागणारे कडवळ, ओला चारा या सर्व बाबींचा विचार करून लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या प्रस्तावाची माहिती घेतली जाईल. त्यानंतर चारा छावण्या सुरू करण्यात येतील, अशी माहिती विजय शिवतारे यांनी दिली आहे.

ई-टीव्ही भारत सोबत चर्चा करताना जलसंपदा मंत्री विजय शिवतारे.

शासनाच्या परिपत्ररानुसार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची 'फी' माफी करण्यात आली आहे. मात्र, या संदर्भात विद्यापीठ प्रशासन व महाविद्यालय कोणतीही भूमिका घेत नाही. यासंदर्भात बोलताना शिवतारे यांनी सांगितले की शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भेटून यावरती चर्चा करणार आहे. तसेच ज्या मुलांनी आधीच जास्त फी आहे त्यांची 'फी' माघारी देण्यासाठी प्रयत्न करू असे शिवतारे यांनी सांगितले.

Intro:सातारा दुष्काळी भागात जनावरांच्या चारा छावण्या मंजूर झाल्या मात्र शेळ्या मेंढ्यांच्या चारा-पाण्याचा काय...? असा प्रश्न शेतकरी व मेंढपाळांना समोर उभा राहिला आहे. यावरती जलसंपदा मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी प्रस्ताव आल्यास चार दिवसात शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी मंजूर करणार आहे. तसेच त्यांना लागणारे कडवळ, ओला चारा या सर्व बाबींचा विचार करून लवकरच जिल्हाअधिकारी कार्यलायत प्राप्त झालेल्या प्रस्तवाची माहिती घेऊन सुरू करणार आहे. अशी माहिती ई-टीव्ही भारत सोबत चर्चा करताना जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे.


Body:तसेच 'फी' माफी संदर्भात विद्यापीठ प्रशासन व महाविद्यालय कोणतीही भूमिका घेत नाही. यावरती बोलताना त्यांनी सांगितले की मुंबईला गेल्यावरती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भेटून या वरती चर्चा करून मुलांनी भरलेल्या जास्ती 'फी' मागारी देण्यासाठी प्रयत्न करू.



Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.