ETV Bharat / state

परतीच्या पावसाचा फटका, तत्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी - Tanaji Katte Damage News Satara

तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. खरिपाची पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. अद्यापही पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या नाहीत. महसूल व कृषी विभाग यांनी वेळ न दवडता दोन दिवसात झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

सातार जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका
author img

By

Published : Nov 4, 2019, 7:51 PM IST

सातारा- परतीच्या पावसामुळे माण-खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे, फळबागांचे आणि अनेकांच्या जंगम मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच नुकसानीच्या पाहणीकरिता कृषी आणि महसूल विभागाचे तलाठी, सर्कल तसेच मंडल अधिकारी फिरकत देखील नसल्याचे समोर आले आहे.

सातार जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका

या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. खरिपाची पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. अद्यापही पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या नाहीत. कांदा, बाजरी, मका, बटाटा, आले या पिकांसह कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. पावसामुळे जीवापाड परिश्रम करून जगविलेल्या अनेक फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जंगम मालमत्तांचेही नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभाग यांनी वेळ न दवडता दोन दिवसात झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

हेही वाचा- दुष्काळी माण तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले; बंधारे गेले वाहून

सातारा- परतीच्या पावसामुळे माण-खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे, फळबागांचे आणि अनेकांच्या जंगम मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच नुकसानीच्या पाहणीकरिता कृषी आणि महसूल विभागाचे तलाठी, सर्कल तसेच मंडल अधिकारी फिरकत देखील नसल्याचे समोर आले आहे.

सातार जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका

या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. खरिपाची पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. अद्यापही पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या नाहीत. कांदा, बाजरी, मका, बटाटा, आले या पिकांसह कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. पावसामुळे जीवापाड परिश्रम करून जगविलेल्या अनेक फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जंगम मालमत्तांचेही नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभाग यांनी वेळ न दवडता दोन दिवसात झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

हेही वाचा- दुष्काळी माण तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले; बंधारे गेले वाहून

Intro:सातारा
माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे, फळबागांचे आणि अनेकांच्या जंगम मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाचे तलाठी, सर्कल तसेच मंडल अधिकारी फिरकत देखील नसल्याचे समोर आले आहे. यामुळे आधी दुष्काळ आणि अत्ता ओला दुष्काळ याचा सामना शेतकरी वर्गाला करावा लागतो आहे.

Body:तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. खरिपाची पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. अद्यापही पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या नाहीत. कांदा, बाजरी, मका, बटाटा, आले पिकासह कडधान्यांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. जीवापाड परिश्रम करुन जगविलेल्या अनेक फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जंगम मालमत्तांचेही नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभाग यांनी वेळ न दवडता दोन दिवसात झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत. अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे.

बाईट
1. तानाजी कट्टे, गोंदवले शेतकरी
2. मामुशेट वीरकर, रासप जिल्हा अध्यक्ष

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.