ETV Bharat / state

कोरोनाची लक्षणे आढळताच तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा - बाळासाहेब पाटील

author img

By

Published : Apr 20, 2021, 6:10 PM IST

नागरिकांनी शासनाने घातलेल्या निर्बंधांचे कोटोकरपणे पालन करण्याबरोबरच मास्क, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे. तसेच ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित आहे. अशा कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर फिरू नये, असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

बाळासाहेब पाटील
बाळासाहेब पाटील

सातारा - कोरोनाची लक्षणे असूनही काही रुग्ण दुर्लक्ष करीत आहेत. दुर्लक्षामुळे संपूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग होत आहे. तसेच रुग्ण उशिरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर उपचार करण्यास अडचणी येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

बाळासाहेब पाटील

'बाधिताच्या कुटुंबीयांनी बाहेर फिरू नये'
पाटील म्हणाले, की शासनाने 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली असून काही घटकांना मुभा देण्यात आली आहे. संचारबंदी असूनही काही जण बाहेर फिरत आहेत. नागरिकांनी शासनाने घातलेल्या निर्बंधांचे कोटोकरपणे पालन करण्याबरोबरच मास्क, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे. तसेच ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित आहे. अशा कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर फिरू नये, असेही पाटील यांनी सांगितले आहे.



'..तर नागरिकांनी संपर्क करावा'

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू नाही. अशा रुग्णालयामध्ये शासकीय दरापेक्षा जास्त आकारणी केलेल्या देयकासंदर्भात कामकाज नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी भूसंपादन संजय आसवले, डॉ. देविदास बागल जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, सातारा यांची नेमणूक केली आहे. सातारा जिल्ह्यांमध्ये कोणत्याही रुग्णांलयामध्ये बिलासंदर्भात काही शंका असल्यास नागरिकांनी कोरोना आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री क्र. 1077वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा- केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे सीरमकडून स्वागत

सातारा - कोरोनाची लक्षणे असूनही काही रुग्ण दुर्लक्ष करीत आहेत. दुर्लक्षामुळे संपूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग होत आहे. तसेच रुग्ण उशिरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर उपचार करण्यास अडचणी येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

बाळासाहेब पाटील

'बाधिताच्या कुटुंबीयांनी बाहेर फिरू नये'
पाटील म्हणाले, की शासनाने 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली असून काही घटकांना मुभा देण्यात आली आहे. संचारबंदी असूनही काही जण बाहेर फिरत आहेत. नागरिकांनी शासनाने घातलेल्या निर्बंधांचे कोटोकरपणे पालन करण्याबरोबरच मास्क, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे. तसेच ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित आहे. अशा कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर फिरू नये, असेही पाटील यांनी सांगितले आहे.



'..तर नागरिकांनी संपर्क करावा'

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू नाही. अशा रुग्णालयामध्ये शासकीय दरापेक्षा जास्त आकारणी केलेल्या देयकासंदर्भात कामकाज नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी भूसंपादन संजय आसवले, डॉ. देविदास बागल जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, सातारा यांची नेमणूक केली आहे. सातारा जिल्ह्यांमध्ये कोणत्याही रुग्णांलयामध्ये बिलासंदर्भात काही शंका असल्यास नागरिकांनी कोरोना आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री क्र. 1077वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा- केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे सीरमकडून स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.