ETV Bharat / state

आमदार जयकुमार गोरेंनी दिला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा

author img

By

Published : Aug 31, 2019, 5:05 AM IST

जिल्ह्यात राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. माण मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूकीवेळी शेखर गोरे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेंनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

आमदार जयकुमार गोरेंनी दिला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा

सातारा- जिल्ह्यात राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. माण मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूकीवेळी शेखर गोरे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेंनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

आमदार गोरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. भाजपने सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला अगोदरच सुरुंग लावला आहे. आता काँग्रेस आमदरा जयकुमार गोरेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने माण मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आमदार गोरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माण तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभात गोरे भाजप प्रवेश करतील असेही बोलले जात आहे.

लोकसभा निवडणूकीदरम्यान काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपमध्ये पाठविण्यात तसेच त्यांना लोकसभा निवडणूकीत निवडून आणण्यात आमदार गोरेंनी मुख्य भूमिका पार पाडली होती. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशावेळीच आ. गोरेंचाही भाजप प्रवेश निश्चित झाला होता. त्यांच्याबरोबर जिल्ह्यातील काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीपाठोपाठ सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा गट आ. गोरेंबरोबर भाजपवासी होणार असल्याने जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.

आमदार गोरे यांच्या वरती अनेक गुन्हे दाखल आहेत. खंडणी, अपहरण, विनयभंग असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. हे गुन्हे मागे घेण्यासाठी आमदार गोरे हे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची उलट सुलट चर्चा सातारा जिल्ह्यात रंगली आहे.

सातारा- जिल्ह्यात राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. माण मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूकीवेळी शेखर गोरे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेंनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

आमदार गोरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. भाजपने सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला अगोदरच सुरुंग लावला आहे. आता काँग्रेस आमदरा जयकुमार गोरेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने माण मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आमदार गोरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माण तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभात गोरे भाजप प्रवेश करतील असेही बोलले जात आहे.

लोकसभा निवडणूकीदरम्यान काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपमध्ये पाठविण्यात तसेच त्यांना लोकसभा निवडणूकीत निवडून आणण्यात आमदार गोरेंनी मुख्य भूमिका पार पाडली होती. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशावेळीच आ. गोरेंचाही भाजप प्रवेश निश्चित झाला होता. त्यांच्याबरोबर जिल्ह्यातील काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीपाठोपाठ सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा गट आ. गोरेंबरोबर भाजपवासी होणार असल्याने जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.

आमदार गोरे यांच्या वरती अनेक गुन्हे दाखल आहेत. खंडणी, अपहरण, विनयभंग असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. हे गुन्हे मागे घेण्यासाठी आमदार गोरे हे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची उलट सुलट चर्चा सातारा जिल्ह्यात रंगली आहे.

Intro:माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर लोकसभा निवडणूकी वेळी शेखर गोरे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकला आणि ते आता शिवसेनेत गेले आहेत. तालुक्यातील अनेक सेनेचे नेते त्यांच्या प्रवेशाला विरोध करत होते.मात्र काही दिवसांतच त्यांचा अचानक विरोध मावळा गेला. तर आमदार गोरेंनी राजीनामा दिल्याने सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. आमदार गोरे १ सप्टेंबरला सोलापूर येथे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे बोले जात आहे. त्यामुळे आमदार गोरे हेच भाजपचे माण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असे ठामपणे समर्थकांकडून सांगितले जात आहे. मग भाजपच्या कार्यकर्त्यांनी तसेच सेनेच्या कार्यकर्त्यांनी करायची काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.Body:कारण अनेक वेळा हाणामारी भांडण कोर्ट कचऱ्यांच्या फेऱ्यात अडकलेल्या कार्यकर्त्यांनी आता एका ताटात जेवायला बसावं लागणार तर राहिला प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील नेत्यांचा एक ना धड सतरा कारभारी असणारे दोन्ही पक्ष मोकळे झाले आहेत. त्यामुळे इथे देशमुख,घार्गे आपली भूमिका काय घेणार तर आमचं ठरलंय हे बोलणारे भाजपाचे माजी आमदार दिलीप यळगावकर,अनिल देसाई, शिवसेनेचे नेते रणजित देशमुख, अनिल सुभेदार हे सेनेला राम राम ठोकणार का..? की पुन्हा ज्यांच्या सोबत राडा केला त्यांच्या सोबत पंगतीला बसणार हे पाहणे गरजेचे आहे. पक्षाच्या झेंड्यानी अनेकांची घरे देखील उधवस्त झाली. शेकडो कार्यकर्ते आज देखील कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत. त्यामुळे येणारा काळ काय करेल ते पाहणे गरजेचे बनले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.