ETV Bharat / state

दुष्काळी माण तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले; बंधारे गेले वाहून - माण तालुक्यात परतीचा जोरदार पाऊस

पावसाने माण तालुक्यातील सगळे तलाव, बंधारे भरून वाहिले आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसाने पिंगळी तलावाच्या खालच्या बाजूचे बंधारे खचले आहेत. काही ठिकाणी बंधारे वाहूनही गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

माण तालुक्यात परतीच्या पावसाने बंधारे गेले वाहून
author img

By

Published : Nov 4, 2019, 6:56 PM IST

सातारा - जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे बंधारे खचले आहेत. तर, काही ठिकाणी वाहूनही गेले आहेत. दोन ते तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील पाटण, कराड या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. तर पूर्व भागात 62 चारा छावण्या व 180 पाण्याचे टँकर चालू होते. त्यामुळे जिल्ह्यातील निसर्गाचा खेळ पहायला मिळाला होता.

माण तालुक्यात परतीच्या पावसाने बंधारे गेले वाहून

परतीच्या पावसाने दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.

या पावसाने माण तालुक्यातील सगळे तलाव, बंधारे भरून वाहिले आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसाने पिंगळी तलावाच्या खालच्या बाजूचे बंधारे खचले आहेत. काही ठिकाणी बंधारे वाहूनही गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच अनेक ठिकाणी तलाव व बंधारे कोणत्या विभागाचे आहेत, हे देखील नागरिकांना माहिती नाही. यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सातारा - जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे बंधारे खचले आहेत. तर, काही ठिकाणी वाहूनही गेले आहेत. दोन ते तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील पाटण, कराड या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. तर पूर्व भागात 62 चारा छावण्या व 180 पाण्याचे टँकर चालू होते. त्यामुळे जिल्ह्यातील निसर्गाचा खेळ पहायला मिळाला होता.

माण तालुक्यात परतीच्या पावसाने बंधारे गेले वाहून

परतीच्या पावसाने दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.

या पावसाने माण तालुक्यातील सगळे तलाव, बंधारे भरून वाहिले आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसाने पिंगळी तलावाच्या खालच्या बाजूचे बंधारे खचले आहेत. काही ठिकाणी बंधारे वाहूनही गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच अनेक ठिकाणी तलाव व बंधारे कोणत्या विभागाचे आहेत, हे देखील नागरिकांना माहिती नाही. यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Intro:सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हाजरे लावली आहे. यामध्ये बंधारे खचले आहेत तर काही ठिकाणी वाहून ही गेले आहेत. दोन ते तीन महिन्या पूर्वी जिल्ह्यातील पश्चिम भागात पाटण, कराड या भागात पूरस्थिती झाली होती. तर पूर्व भागात 62 चारा छावण्या व 180 पाण्याचे टँकर चालू होते. त्यामुळे जिल्ह्यातील निसर्गाचा असणारा खेळ पहिला मिळत होता. परतीच्या पावसाने दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्याला झोडपून काढले आहे. तर एवढ्या वर्ष दुष्काळ आणि अत्ता ओला दुष्काळी झाहिर करण्याची मागणी होत आहे.

Body:या पावसाने माण तालुक्यातील सगळे तलाव, बंधारे भरून वाहिले आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसाने पिंगळी तालावच्या खालच्या बाजूचे बंधारे खचले गेले आहेत. तर काही ठिकाणी वाहून ही गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा यामुळे अनेक ठिकाणी जमिनी खचून कोल्हापूर पद्धतीचे मोठे बंधारे खचले जाऊ शकतात. अनेक ठिकाणी तलाव व बंधारे कोणात्या विभागाचे आहेत. हे देखील नागरिकांना माहीत नसल्याने त्या ठिकाणी पाणी सोडणे व आढवणे शेतकरी वर्गासाठी अडचणीचे ठरू लागले आहे. यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.