ETV Bharat / state

अवकाळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार - मंत्री जयंत पाटील

अवकाळी पवसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यात अवकाळीने नुकसान झालेल्या शेती आणि द्राक्ष बागांची मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

author img

By

Published : Dec 7, 2021, 3:05 AM IST

पाहणी करताना मंत्री जयंत पाटील
पाहणी करताना मंत्री जयंत पाटील

सांगली - अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यात अवकाळीने नुकसान झालेल्या शेती आणि द्राक्ष बागांची मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

बोलताना मंत्री जयंत पाटील

पालकमंत्र्यांनी घेतला नुकसानीचा आढावा

सांगली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतीच्या या नुकसानीची जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली आहे. वाळवा गावातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांना भेट देऊन मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा घेतला.

पंचनामा करणाच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या

सांगली जिल्ह्यातील अनेक द्राक्ष बागा अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनास यापूर्वीच दिलेल्या आहेत. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल,असा विश्वास यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा - अवकाळीचा कहर.. सांगली जिल्ह्यातील सुमारे 8 हजारहून अधिक द्राक्षबागा उद्ध्वस्त

सांगली - अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यात अवकाळीने नुकसान झालेल्या शेती आणि द्राक्ष बागांची मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

बोलताना मंत्री जयंत पाटील

पालकमंत्र्यांनी घेतला नुकसानीचा आढावा

सांगली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतीच्या या नुकसानीची जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली आहे. वाळवा गावातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांना भेट देऊन मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा घेतला.

पंचनामा करणाच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या

सांगली जिल्ह्यातील अनेक द्राक्ष बागा अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनास यापूर्वीच दिलेल्या आहेत. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल,असा विश्वास यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा - अवकाळीचा कहर.. सांगली जिल्ह्यातील सुमारे 8 हजारहून अधिक द्राक्षबागा उद्ध्वस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.