ETV Bharat / state

सांगलीत पार पडला अनोखा "सत्यशोधक विवाह" सोहळा...

author img

By

Published : Nov 6, 2020, 11:54 AM IST

सांगलीत एक अनोखा लग्न सोहळा पार पडला. सत्यशोधक पद्धतीने आणि समाजसुधारकांना साक्षी ठेवून हा विवाह झाला.

Satyashodhak Vivah, Sangli
सत्यशोधक विवाह, सांगली

सांगली - लग्नाच्या सर्व रूढी परंपरांना फाटा देत सांगलीत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. फुलांच्या अक्षता, पुस्तकांचा आहेर, पुस्तकांसोबत रुखवत आणि लग्न मंडपात वीर सैनिकांच्या पत्नींचा सत्कार, असा आगळा-वेगळा सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा तासगाव तालुक्यातील करोली याठिकाणी झाला.

'लग्न' ही प्रत्येकाच्याच जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट. पण त्याचबरोबर अनेक चुकीच्या प्रथा, कालबाह्य रुढी आणि त्यातून होणारे शोषण यांचा प्रत्यय अनेक ठिकाणी येतो. कर्ज काढून केलेला वायफळ खर्च, दिखाऊपणा यामुळे अनेक विवाह समारंभांच्या आनंदाला गालबोट लागले आहे.

या सर्व अनिष्ट प्रकारांना महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळीचा सर्वोत्तम आणि समर्थ पर्याय दिला. त्यालाच अनुसरून तासगाव तालुक्यातल्या करोली याठिकाणी पुरोगामी विचारांचे ए.डी.पाटील यांच्या कुटुंबात अनोख्या पद्धतीने सत्यशोधक विवाह सोहळा झाला आहे.

सत्यशोधक विवाह, सांगली
उच्च शिक्षीत जोडप्याने निवडला सत्यशोधक विवाहाचा मार्ग
तासगाव तालुक्यातील करोली येथील महादेव धोंडीराम पाटील आणि स्नेहलता मारुती सावंत देशमुख यांचा विवाह निश्चित झाला. शाहू, फुले, आंबेडकर चळवळीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या उच्चशिक्षित जोडप्याने सर्व रूढी-परंपरांना बाजूला सारले. सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
असा पार पडला अनोखा लग्न सोहळा
डॉ. नरेंद्र दाभोलकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम यांचे फोटो लग्न मंडपाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. याशिवाय व्यासपीठावर संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये काही निमंत्रित उपस्थित होते. तुतारीच्या निनादात नवरा आणि नवरीचे लग्नमंडपात आगमन झाले. विशेष म्हणजे, नवरदेव आणि नववधू हातामध्ये 'भारतीय राज्यघटना' घेऊन दाखल झाले. फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन आणि वंदन करून लग्नविधीला सुरुवात झाली.
मंगलाष्टक आणि तांदळांच्या अक्षतेला फाटा
महात्मा जोतिबा फुले यांनी 134 वर्षांपूर्वी पुरोगामी विचारांची सुरुवात केली. सत्यशोधक पद्धतीने विवाहाची एक चळवळ सुरू केली होती. आणि त्याच विचारातून आपण आपल्या पुतण्याचा विवाह पुरोगामी आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराच्या सत्यशोधक पद्धतीने करायचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रूढी परंपरांना फाटा देऊन हा विवाह सोहळा केला आहे, असे नवरदेव महादेव पाटील यांचे चुलते ए.डी.पाटील यांनी सांगितले.
तांदळाच्या अक्षताऐवजी गुलाबांच्या फुलांचा वापर केला. जेणेकरून शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल आणि धान्याची नासाडीही होणार नाही. असा संदेश यामधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच वधू-वरांनी वृक्षांना पाणी घालून व निर्मिक पूजन करून शपथविधी घेतला. पारंपरिक मंगलाष्टकांऐवजी सत्यशोधिक मंगलाअष्टके यावेळी उच्चरण्यात आले, असे ए.डी.पाटील म्हणाले.
नवरीची अशी ही "ज्ञान रुपी" रुखवत
लग्नामध्ये रुखवत या विधीतून मुलीला माहेरच्या मंडळीकडून अनेक गोष्टी देण्यात येतात. त्यामध्ये त्यांच्या नव्या संसाराच्या साहित्याचा समावेश असतो. याठिकाणी नववधूचा रुखवत हा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. नवरदेव मंडळींकडून मुलींच्या कुटुंबीयांना रुखवतामध्ये पुस्तके देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार यावेळी नववधूच्या घरच्यांनी आणि आप्तेष्ट मंडळांनी अनेक थोर पुरुषांची पुस्तके यावेळी नववधूला रुखवत म्हणून दिली.

वीर जवानांच्या पत्नींचा सन्मान-

या पुरोगामी, सत्यशोधक पद्धतीच्या सोहळ्यानिमित्ताने देशसेवा बजावणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबीयांचा आणि त्यांच्या पत्नींचा गौरव करण्यात आला. देशसेवेबद्दल प्रेम व्यक्त करण्याच्या दृष्टीने आणि प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने यावेळी जिल्ह्यातील सुमारे दहा वीर जवानांच्या पत्नींच्या गौरव करण्यात आला.

इतिहास संशोधक कोकाटेनी लावली उपस्थिती

या सत्यशोधक विवाह सोहळ्यासाठी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते म्हणाले, आजच्या समाजाला फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. या पद्धतीने लग्न पार पडल्यास अनेक अनिष्ट चालीरीतींना मूठमाती मिळेल. याशिवाय खर्चात सुद्धा मोठी कपात होईल. त्यामुळे समाजाने सत्यशोधक विवाह पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे.

तरुणांनो सत्यशोधक विवाह करा-

सत्यशोधक पद्धतीच्या मार्गाने लग्नाच्या गाठी बांधल्यानंतर नवदाम्पत्याने लग्नसोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला. नववधू स्नेहलता म्हणाली, आपले लग्न धुमधडाक्यात व्हावं, असं प्रत्येक मुलीची इच्छा असतं, पण माझं सत्यशोधक पद्धतीने झालं. त्याचा मला अभिमान आणि खूप आनंद होत आहे.


नवरदेव महादेव म्हणाला, आपल्या भूमितील थोर समाजसुधारकांच्या प्रेरणेतून आपण सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. आपले काका ए. डी. पाटील आणि गायकवाड सर यांची प्रेरणा मिळाली. सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचा मला खूप आनंद होत आहे. प्रत्येक तरुणांनी सुद्धा आपल्या थोर पुरुषांनी आणि समाजसुधारकांनी जो संदेश दिला आहे, त्याप्रमाणे वागले पाहिजे आणि या थोर पुरुषांना व समाजसुधारकांना श्रद्धांजली म्हणून सत्यशोधक पद्धतीने विवाह केला पाहिजे, असे आवाहन यावेळी महादेव पाटील याने केले.

कोरोना संकटातील आदर्श लग्न..!

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या विवाहाच्या निमित्ताने कोरोना जागृतीचे सामाजिक संदेशही देण्यात आले. तसेच सत्यशोधक लग्न सोहळ्याच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात खर्चिक लग्नसोहळा टाळण्याचा एक आदर्शही निर्माण होऊ शकतो, असे पाटील कुटुंबाने दाखवून दिले.

सांगली - लग्नाच्या सर्व रूढी परंपरांना फाटा देत सांगलीत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. फुलांच्या अक्षता, पुस्तकांचा आहेर, पुस्तकांसोबत रुखवत आणि लग्न मंडपात वीर सैनिकांच्या पत्नींचा सत्कार, असा आगळा-वेगळा सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा तासगाव तालुक्यातील करोली याठिकाणी झाला.

'लग्न' ही प्रत्येकाच्याच जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट. पण त्याचबरोबर अनेक चुकीच्या प्रथा, कालबाह्य रुढी आणि त्यातून होणारे शोषण यांचा प्रत्यय अनेक ठिकाणी येतो. कर्ज काढून केलेला वायफळ खर्च, दिखाऊपणा यामुळे अनेक विवाह समारंभांच्या आनंदाला गालबोट लागले आहे.

या सर्व अनिष्ट प्रकारांना महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळीचा सर्वोत्तम आणि समर्थ पर्याय दिला. त्यालाच अनुसरून तासगाव तालुक्यातल्या करोली याठिकाणी पुरोगामी विचारांचे ए.डी.पाटील यांच्या कुटुंबात अनोख्या पद्धतीने सत्यशोधक विवाह सोहळा झाला आहे.

सत्यशोधक विवाह, सांगली
उच्च शिक्षीत जोडप्याने निवडला सत्यशोधक विवाहाचा मार्ग
तासगाव तालुक्यातील करोली येथील महादेव धोंडीराम पाटील आणि स्नेहलता मारुती सावंत देशमुख यांचा विवाह निश्चित झाला. शाहू, फुले, आंबेडकर चळवळीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या उच्चशिक्षित जोडप्याने सर्व रूढी-परंपरांना बाजूला सारले. सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
असा पार पडला अनोखा लग्न सोहळा
डॉ. नरेंद्र दाभोलकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम यांचे फोटो लग्न मंडपाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. याशिवाय व्यासपीठावर संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये काही निमंत्रित उपस्थित होते. तुतारीच्या निनादात नवरा आणि नवरीचे लग्नमंडपात आगमन झाले. विशेष म्हणजे, नवरदेव आणि नववधू हातामध्ये 'भारतीय राज्यघटना' घेऊन दाखल झाले. फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन आणि वंदन करून लग्नविधीला सुरुवात झाली.
मंगलाष्टक आणि तांदळांच्या अक्षतेला फाटा
महात्मा जोतिबा फुले यांनी 134 वर्षांपूर्वी पुरोगामी विचारांची सुरुवात केली. सत्यशोधक पद्धतीने विवाहाची एक चळवळ सुरू केली होती. आणि त्याच विचारातून आपण आपल्या पुतण्याचा विवाह पुरोगामी आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराच्या सत्यशोधक पद्धतीने करायचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रूढी परंपरांना फाटा देऊन हा विवाह सोहळा केला आहे, असे नवरदेव महादेव पाटील यांचे चुलते ए.डी.पाटील यांनी सांगितले.
तांदळाच्या अक्षताऐवजी गुलाबांच्या फुलांचा वापर केला. जेणेकरून शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल आणि धान्याची नासाडीही होणार नाही. असा संदेश यामधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच वधू-वरांनी वृक्षांना पाणी घालून व निर्मिक पूजन करून शपथविधी घेतला. पारंपरिक मंगलाष्टकांऐवजी सत्यशोधिक मंगलाअष्टके यावेळी उच्चरण्यात आले, असे ए.डी.पाटील म्हणाले.
नवरीची अशी ही "ज्ञान रुपी" रुखवत
लग्नामध्ये रुखवत या विधीतून मुलीला माहेरच्या मंडळीकडून अनेक गोष्टी देण्यात येतात. त्यामध्ये त्यांच्या नव्या संसाराच्या साहित्याचा समावेश असतो. याठिकाणी नववधूचा रुखवत हा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. नवरदेव मंडळींकडून मुलींच्या कुटुंबीयांना रुखवतामध्ये पुस्तके देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार यावेळी नववधूच्या घरच्यांनी आणि आप्तेष्ट मंडळांनी अनेक थोर पुरुषांची पुस्तके यावेळी नववधूला रुखवत म्हणून दिली.

वीर जवानांच्या पत्नींचा सन्मान-

या पुरोगामी, सत्यशोधक पद्धतीच्या सोहळ्यानिमित्ताने देशसेवा बजावणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबीयांचा आणि त्यांच्या पत्नींचा गौरव करण्यात आला. देशसेवेबद्दल प्रेम व्यक्त करण्याच्या दृष्टीने आणि प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने यावेळी जिल्ह्यातील सुमारे दहा वीर जवानांच्या पत्नींच्या गौरव करण्यात आला.

इतिहास संशोधक कोकाटेनी लावली उपस्थिती

या सत्यशोधक विवाह सोहळ्यासाठी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते म्हणाले, आजच्या समाजाला फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. या पद्धतीने लग्न पार पडल्यास अनेक अनिष्ट चालीरीतींना मूठमाती मिळेल. याशिवाय खर्चात सुद्धा मोठी कपात होईल. त्यामुळे समाजाने सत्यशोधक विवाह पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे.

तरुणांनो सत्यशोधक विवाह करा-

सत्यशोधक पद्धतीच्या मार्गाने लग्नाच्या गाठी बांधल्यानंतर नवदाम्पत्याने लग्नसोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला. नववधू स्नेहलता म्हणाली, आपले लग्न धुमधडाक्यात व्हावं, असं प्रत्येक मुलीची इच्छा असतं, पण माझं सत्यशोधक पद्धतीने झालं. त्याचा मला अभिमान आणि खूप आनंद होत आहे.


नवरदेव महादेव म्हणाला, आपल्या भूमितील थोर समाजसुधारकांच्या प्रेरणेतून आपण सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. आपले काका ए. डी. पाटील आणि गायकवाड सर यांची प्रेरणा मिळाली. सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचा मला खूप आनंद होत आहे. प्रत्येक तरुणांनी सुद्धा आपल्या थोर पुरुषांनी आणि समाजसुधारकांनी जो संदेश दिला आहे, त्याप्रमाणे वागले पाहिजे आणि या थोर पुरुषांना व समाजसुधारकांना श्रद्धांजली म्हणून सत्यशोधक पद्धतीने विवाह केला पाहिजे, असे आवाहन यावेळी महादेव पाटील याने केले.

कोरोना संकटातील आदर्श लग्न..!

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या विवाहाच्या निमित्ताने कोरोना जागृतीचे सामाजिक संदेशही देण्यात आले. तसेच सत्यशोधक लग्न सोहळ्याच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात खर्चिक लग्नसोहळा टाळण्याचा एक आदर्शही निर्माण होऊ शकतो, असे पाटील कुटुंबाने दाखवून दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.